शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला झाले तब्बल 'इतक्या' कोटींचे नुकसान; भारतीय विमानांसाठी हवाई क्षेत्र बंद करणे पडले महागात!
2
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
3
गडकरींचे ३.५० लाख मतदार वगळले, कुटुंबीयांचाही समावेश; अजून पुरावे मागणार की माफी?; काँग्रेसचा सवाल
4
तुरुंगात असलेल्या सोनम रघुवंशीच्या आजीचे निधन; नातीच्या क्रूर कृत्यामुळे बसलेला धक्का
5
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
6
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
7
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
8
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
9
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
10
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
11
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
12
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
13
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
14
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
15
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
16
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
17
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
18
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
19
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
20
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा

वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये ‘तक्रारपेटी’चा नियम धाब्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:11 IST

वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले. 

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनबहुतांश शाळांमध्ये अंमलबजावणीच नाही तक्रार करण्याची सुविधा डावलली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले. विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रयत्न म्हणून तसेच काही अडचणी, दडपण किंवा अन्य प्रकारच्या तक्रारी असतील तर सदर तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ म्हणून प्रत्येक शाळेत दर्शनी भागात, प्रवेशद्वारानजीक किंवा सर्वांच्या नजरेत येईल अशा ठिकाणी तक्रार पेटी बसविण्यात यावी, असे आदेश शिक्षण विभागाने ५ मे २0१७ रोजी दिलेले आहेत. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळामध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे. या  अनुषंगाने  शाळा प्रशासन व व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही तसेच क्षेत्रीय यंत्रणांची जबाबदारीदेखील स्पष्ट केलेली आहे. शाळेच्या दर्शनी भागात बसविण्यात आलेली तक्रारपेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असणे आवश्यक आहे. तक्रारपेटी  प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी, तक्रारपेटी संबंधित शाळेचे  मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी,  विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी तसेच तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्यात याव्या, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश आहेत. सात महिन्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी वाशिम जिल्हय़ातील शाळांमध्ये केली जाते किंवा नाही, याची पडताळणी म्हणून ‘लोकमत’ चमूने पाहणी केली असता, बहुतांश शाळांमध्ये अद्याप तक्रार पेटी बसविली नसल्याचे दिसून आले. तक्रार पेटीच नसल्याने तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रियाच ठप्प असल्याचे स्पष्ट झाले. कारंजा तालुक्यातील जवळपास १२ शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. रिसोड तालुक्यातील १0 शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. राजुरा परिसरातील चार शाळा, वाशिम तालुक्यातील सहा शाळा, मंगरूळपीर तालुक्यातील तीन शाळा, मानोरा तालुक्यातील चार शाळा, शिरपूर परिसरातील दोन शाळांची पाहणी केली असता, कुठेही तक्रारपेटी बसविल्याचे दिसून आले नाही. 

शासन निर्णयानुसार प्रत्येक माध्यमाच्या शाळांनी दर्शनी भागात तक्रार पेटी बसविणे बंधनकारक आहे. शाळांनी तक्रार पेटी बसवावी, अशा सूचना दिलेल्या होत्या. याउपरही कुणी तक्रार पेटी बसविली नसेल तर खुलासा मागविण्यात येईल. तक्रार पेटी बसविण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाना दिल्या जातील.- डॉ. देवीदास नागरेशिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा