शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये ‘तक्रारपेटी’चा नियम धाब्यावर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2017 02:11 IST

वाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले. 

ठळक मुद्देस्टिंग ऑपरेशनबहुतांश शाळांमध्ये अंमलबजावणीच नाही तक्रार करण्याची सुविधा डावलली

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: विद्यार्थी-विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत करावयाच्या ठोस उपाययोजनांचा भाग म्हणून शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत तक्रार पेटी बसविण्याचे आदेश मे २0१७ मध्ये दिले होते. वाशिम जिल्हय़ातील बहुतांश शाळांमध्ये या आदेशाची अंमलबजावणी अद्यापही झाली नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ने शुक्रवार व शनिवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनवरून समोर आले. विद्यार्थी, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा प्रयत्न म्हणून तसेच काही अडचणी, दडपण किंवा अन्य प्रकारच्या तक्रारी असतील तर सदर तक्रारी मांडण्याचे व्यासपीठ म्हणून प्रत्येक शाळेत दर्शनी भागात, प्रवेशद्वारानजीक किंवा सर्वांच्या नजरेत येईल अशा ठिकाणी तक्रार पेटी बसविण्यात यावी, असे आदेश शिक्षण विभागाने ५ मे २0१७ रोजी दिलेले आहेत. सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळामध्ये तक्रारपेट्या बसविण्याची आवश्यक कार्यवाही तत्काळ करण्यात यावी, असे आदेशात नमूद आहे. या  अनुषंगाने  शाळा प्रशासन व व्यवस्थापनाने करावयाची कार्यवाही तसेच क्षेत्रीय यंत्रणांची जबाबदारीदेखील स्पष्ट केलेली आहे. शाळेच्या दर्शनी भागात बसविण्यात आलेली तक्रारपेटी पुरेशा मापाची व सुरक्षित असणे आवश्यक आहे. तक्रारपेटी  प्रत्येक आठवड्यात कामकाजाच्या शेवटच्या दिवशी उघडण्यात यावी, तक्रारपेटी संबंधित शाळेचे  मुख्याध्यापक, प्राचार्य, पोलीस प्रतिनिधी, पालक प्रतिनिधी,  विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या समक्ष उघडण्यात यावी तसेच तक्रारपेटीत प्राप्त झालेल्या सर्व तक्रारींची नोंद घेऊन तक्रार निवारण करण्याबाबत तत्काळ आवश्यक ती कार्यवाही व उपाययोजना करण्यात याव्या, असे शिक्षण विभागाचे स्पष्ट आदेश आहेत. सात महिन्याच्या कालावधीनंतर या आदेशाची अंमलबजावणी वाशिम जिल्हय़ातील शाळांमध्ये केली जाते किंवा नाही, याची पडताळणी म्हणून ‘लोकमत’ चमूने पाहणी केली असता, बहुतांश शाळांमध्ये अद्याप तक्रार पेटी बसविली नसल्याचे दिसून आले. तक्रार पेटीच नसल्याने तक्रार निवारणाची संपूर्ण प्रक्रियाच ठप्प असल्याचे स्पष्ट झाले. कारंजा तालुक्यातील जवळपास १२ शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. रिसोड तालुक्यातील १0 शाळांची पाहणी केली असता, एकाही शाळेत तक्रारपेटी आढळली नाही. राजुरा परिसरातील चार शाळा, वाशिम तालुक्यातील सहा शाळा, मंगरूळपीर तालुक्यातील तीन शाळा, मानोरा तालुक्यातील चार शाळा, शिरपूर परिसरातील दोन शाळांची पाहणी केली असता, कुठेही तक्रारपेटी बसविल्याचे दिसून आले नाही. 

शासन निर्णयानुसार प्रत्येक माध्यमाच्या शाळांनी दर्शनी भागात तक्रार पेटी बसविणे बंधनकारक आहे. शाळांनी तक्रार पेटी बसवावी, अशा सूचना दिलेल्या होत्या. याउपरही कुणी तक्रार पेटी बसविली नसेल तर खुलासा मागविण्यात येईल. तक्रार पेटी बसविण्याच्या नियमाची अंमलबजावणी करण्याच्या सूचना शाळा प्रशासनाना दिल्या जातील.- डॉ. देवीदास नागरेशिक्षणाधिकारी (माध्यमिक), वाशिम 

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा