शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

‘सुजलाम,सुफलाम’च्या कामांसाठी महिनाभराची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 14:20 IST

एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात गतवर्षी नोव्हेंबर महिन्यापासून राज्य शासन आणि भारतीय जैन संघटनेच्या (बीजेएस) सामंजस्य करारातून ‘सुजलाम, सुफलाम’ अभियान राबविण्यात आले. या अंतर्गत प्रशासनाने जलसंधारणाची विविध कामे केली. त्यापैकी एक शेततळे, दोन नदीचे खोलीकरण, समतल चर आणि नाला खोलीकरणाची कामे वगळता हजारांवर कामे पूर्णत्वास जाऊ शकली नाहीत. आता ही कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत. तथापि, या कामांसाठी ३१ डिसेंबरपर्यंतचीच मुदत असून, सद्यस्थितीत सर्वच जलस्त्रोतात पाणी असल्याने ही कामे करण्याचे आव्हानच प्रशासनासमोर उभे झाले आहे.वाशिम जिल्ह्यात १४ नोव्हेंबर २०१८ पासून सुजलाम, सुफलाम अभियानाला सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत जिल्हाभरात साठवण तळे, ढाळीचे बांध, दगडी नाला बांध, नाला खोलीकरण, समतल चर आदि मिळून ४०३८ कामे प्रस्तावित करण्यात आली होती. त्यासाठी बीजेएसच्यावतीने प्रशासनाच्या मागणीनुसार ३५ जेसीबी आणि १७ पोकलन मशीनही उपलब्ध करण्यात आल्या; परंतु विविध तांत्रिक अडचणींमुळे प्रस्तावित ४९ शेततळ्यांपैकी केवळ एक शेततळे पूर्ण करण्यात आले, तर इतर शेततळ्यांपैकी ४ शेततळे वगळता वाढत्या खर्चासह इतर अडचणींमुळे काही रद्द करावी लागली. त्यानंतर या अभियानातील सर्व मिळून जलसंधारणाची ७३५ कामे जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून करण्याचे निर्देश शासनाच्यावतीने देण्यात आले. तथापि, जुलै महिन्यानंतर पावसाळ्यामुळे ही कामे सुरुच होऊ शकली नाहीत, तर आता येत्या ३१ डिसेंबरपर्यंत ही कामे पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. त्यात ५८४ ढाळीचे बांध, १०७ नाला खोलीकरण आणि ४ साठवण शेततळ्यांसह इतर काही कामांचा समावेश आहे. तथापि, अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील नाले, नद्यांसह इतर जलस्त्रोता मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने ही कामे करणे शक्य नाही. त्यामुळे प्रशासनाला प्रतिक्षा करावी लागणार असून, आता महिनाभरात कामे होणार तरी कशी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.२९७ कामांतून ५६८ कोटीर लीटर जलसाठाजिल्ह्यात सुजलाम, सुफलाम अभियानांतर्गत गतवर्षी अनेक कामे विविध तांत्रिक कारणांमुळे अपूर्ण राहिली असली तरी, याच अभियानातून जलसंधारणाची विविध प्रकारची २९७ कामेही पूर्ण करण्यात आली असून, या कामांमुळे आता जिल्ह्यात ५६८ कोटी लीटरचा अतिरिक्त जलसाठाही निर्माण झाला आहे. त्याचा मोठा फायदा जिल्ह्यातील भुजल पातळीसाठी होणार आहेच शिवाय शेतकऱ्यांनाही सिंचनासाठी त्याचा लाभ होणार आहे.सुजलाम, सुफलाममधील प्रलंबित कामांपैकी काही कामे तांत्रिक अडचणींमुळे रद्द करावी लागली, तर काही कामे जलयुक्त शिवार अभियानातून केली जाणार आहेत. यातील अडचणींचा विचार न करता कामे कशी करता, येतील त्याचे नियोजन करण्यावरच भर दिला जात आहे.-एस. एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम