शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:45 IST

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे.

शिरपूर जैन (वाशिम) : अनेक वर्षांच्या प्रतिक्षेनंतर अस्तित्वात आलेल्या मालेगाव तालुक्यातील मिर्झापूर प्रकल्पातील पाण्याचा अपव्यय होत आहे. या ठिकाणी चौकीदार नसल्याने कुठलाही व्यक्ती पाणी सोडत आहे. गत आठवड्यात अज्ञात व्यक्तीने प्रकल्पातील भरमसाठ पाणी सोडल्याने लाखो लीटर पाणी बोराळा येथील आडोळ प्रकल्पात गेले. त्यामुळे येथे चौकीदार नेमणूक करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत.गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या मिर्झापूर प्रकल्पाची घळभरणी यंदा पूर्ण झाली आणि या लघू सिंचन प्रकल्पात ६५ टक्के जलसाठाही झाला. त्यामुळे मिर्झापूर, घाटा, पांगरखेडा, शिरपूर, दुधाळा, वाघी येथील काही शेतकºयांंना कालव्यातून, तर काही शेतकºयांना सिंचनासाठी प्रत्यक्ष प्रकल्पातून पाणी मिळत आहे. या प्रकल्पावर दुधाळा, वाघी येथील शेतकºयांसाठी आडोळ नदीत कालवे निर्माण केले. त्या कालव्यांद्वारे गरजेनुसार मिर्झापूर प्रकल्पातून सिंचनासाठी पाणी सोडले जाते. त्याचा लाभ शेतकºयांना होत आहे, परंतु प्रकल्पावर चौकीदार नसल्याने कोणताही व्यक्ती वाटेल तेव्हा पाणी सोडत आहे. गत आठवड्यात एका अज्ञात व्यक्तीने विनाकारण प्रकल्पातील पाणी मोठ्या प्रमाणात सोडून दिले.  परिणामी आडोळ नदीतून पाणी थेट बोराळा येथील सिंचन प्रकल्पात गेले. याबाबत लघू पाटबंधारे विभागाच्यावतीने शिरपूर पोलिसांत अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रारसुद्धा  देण्यात आली होती. प्रकल्पाची आरक्षीत पाण्याचे मुल्य लक्षात घेता मिर्झापूर सिंचन प्रकल्पावर लवकरात लवकर कायम स्वरूपी चौकीदार देण्याची मागणी या प्रकल्पावर अवलंबून असजेल्या शेतकºयांकडून करण्यात येत आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प