शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

पोटापाण्यासाठी भटकंती: घरांना टाळे , वस्त्या पडल्या ओस 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 15:26 IST

आसेगाव (वाशिम): खरीपाचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेकडो शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी राज्यातील मोठ्या जिल्ह्यांसह परराज्यात स्थलांतर केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कआसेगाव (वाशिम): खरीपाचा हंगाम संपल्यानंतर रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने आसेगाव पोलीस स्टेशनअंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेकडो शेतमजुरांनी पोटापाण्यासाठी राज्यातील मोठ्या जिल्ह्यांसह परराज्यात स्थलांतर केले आहे. त्यामुळे संबंधित परिसरातील घरांना टाळे दिसत असून, वस्त्या ओस पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातील मजुरांचा उदरनिर्वाह प्रामुख्याने कृषी उत्पादनावर आधारीत रोजगारावर अवलंबून असतो. त्यातच जिल्ह्यात खरीपाचे क्षेत्र अर्थात कोरडवाहू शेती मोठ्या प्रमाणात आहे.  साहजिकच पावसाचे प्रमाण त्यावर प्रभाव टाकते. यंदा जिल्ह्यात पावसाची सरासरी ९० टक्क्यांच्यावर दिसत असली तरी, त्यात सातत्य नव्हते. आवश्यक वेळी पावसाची दांडी आणि नको त्यावेळी अतिवृष्टी, असा प्रकार यंदा पाहायला मिळाला. त्यामुळे खरीपाच्या उत्पादनात मोठी घट आली आणि रोजगारावर परिणाम झाला. आता खरीप हंगाम संपल्यानंतर मजुरांना कामे मिळेनासी झाली आहेत. त्यामुळे शेतमजुरांनी मुलाबाळांसह परराज्याची वाट धरली आहे. आसेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येणाºया शेंदुरजना आढावसह ५२ गावांतील शेतमजुर ऊसतोडणीसाठी कनार्टक, आंध्रप्रदेश सारख्या राज्यात किंवा मुंबई, पुणे यासारख्या जिल्ह्यात रोजगाराच्या शोधात गेले आहेत. त्यामुळे या गावातील अनेक घरांना टाळे ठोकल्याचे चित्र दिसत असून, वस्त्या ओस पडल्या आहेत. शासनाने यंदा दुष्काळाची घोषणा करताना वाशिम जिल्ह्यातील स्थितीचा वस्तूनिष्ठ विचार केला नसल्याने जिल्हा दुष्काळग्रस्त घोषीत होऊ शकला नाही रिसोड तालुक्यासह चार महसूल मंडळात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहीर करून इतर भागांकडे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. प्रत्यक्षात स्थिती अगदी विपरित आहे.

मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीरदरवर्षी जिल्ह्यातून हजारो मजूर ऊसतोडणीसाठी परराज्यात मुलाबाळांसह धाव घेत असल्याने त्यांच्या पाल्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. याची नोंद मात्र शिक्षण विभाग ठेवत नाही. त्यातच परराज्यात स्थलांतर करणाºया मजुरांच्या संख्येचीही संबंधित प्रशासनाकडून नोंद घेतली जात नाही. त्यामुळे मजुरांच्या स्थलांतराची कारणे आणि भीषणताच स्पष्ट होत नसल्याने वरिष्ठस्तरावरून त्याची दखल घेतली जात नाही.

टॅग्स :washimवाशिम