शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:31 IST

एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गंत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून डिसेंबर २०१९ या महिन्यात १० पथकांमार्फत चौकशी करण्यात आली; मात्र ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीच्या काही दिवसांत बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचलेच नाही. हा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’नेच प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केला. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सोबतच चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील नियोजित तारखांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचून चौकशी करण्यात आली.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेच्या कामांची नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार चौकशी करून तसा अहवाल वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले होते. असे असताना चौकशी प्रक्रिया संपून ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.मालेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाºया १० पथकांपैकी काहींचे चौकशी अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. सर्व पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रीतरित्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.- शंकर तोटावारसंनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम१२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पथकांना रोहयोच्या कामांची चौकशी करून तसे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत एकाही पथकाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.- डी.पी. गव्हाळेकार्यकारी अभियंता, रोहयो विभाग, आयुक्त कार्यालय, अमरावती

 

टॅग्स :washimवाशिम