शहरं
Join us  
Trending Stories
1
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
2
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
3
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
4
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
5
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
6
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
7
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
8
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
9
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
10
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
11
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
12
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
13
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
14
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
15
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)
16
"घासीराम कोतवाल'च्या प्रयोगासाठी देशभर...", संजय मिश्रांचं ३० वर्षांनंतर रंगभूमीवर पुनरागमन
17
तिवारी, शुक्ला, थरुर..; मोदी सरकारविरोधात राहुल गांधींना स्वकीयांनीच दिला घरचा आहेर
18
'निराधार आणि बेजबाबदार'; राहुल गांधींच्या आरोपांवर निवडणूक आयोगाने सोडले मौन, काय दिले उत्तर?
19
IND vs ENG 5th Test: Gus Atkinson चा 'पंजा'! टीम इंडियानं २० धावांत गमावल्या ४ विकेट्स! अन्...
20
सेबीच्या नियमांना फाटा देऊन शेअर्सची खरेदी-विक्री, पण धोकाही मोठा! 'ग्रे मार्केट'ची Inside Story

रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:31 IST

एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गंत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून डिसेंबर २०१९ या महिन्यात १० पथकांमार्फत चौकशी करण्यात आली; मात्र ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीच्या काही दिवसांत बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचलेच नाही. हा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’नेच प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केला. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सोबतच चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील नियोजित तारखांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचून चौकशी करण्यात आली.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेच्या कामांची नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार चौकशी करून तसा अहवाल वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले होते. असे असताना चौकशी प्रक्रिया संपून ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.मालेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाºया १० पथकांपैकी काहींचे चौकशी अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. सर्व पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रीतरित्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.- शंकर तोटावारसंनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम१२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पथकांना रोहयोच्या कामांची चौकशी करून तसे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत एकाही पथकाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.- डी.पी. गव्हाळेकार्यकारी अभियंता, रोहयो विभाग, आयुक्त कार्यालय, अमरावती

 

टॅग्स :washimवाशिम