शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

रोहयो घोटाळा; चौकशी अहवाल सादर करण्यात दिरंगाई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 12:31 IST

एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात असलेल्या ८६ ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेंतर्गंत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमितता झाली. याप्रकरणी विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून डिसेंबर २०१९ या महिन्यात १० पथकांमार्फत चौकशी करण्यात आली; मात्र ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी उलटला असताना एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात आलेला नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्याची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. त्यानुसार, १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील संबंधित ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र सुरूवातीच्या काही दिवसांत बहुतांश ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचलेच नाही. हा प्रकार सर्वप्रथम ‘लोकमत’नेच प्रकाशित केलेल्या वृत्ताच्या माध्यमातून उघड केला. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या. सोबतच चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे पुढील नियोजित तारखांना त्या-त्या ग्रामपंचायतींमध्ये पथक पोहचून चौकशी करण्यात आली.दरम्यान, मालेगाव तालुक्यातील संबंधित सर्व ग्रामपंचायतींमधील रोजगार हमी योजनेच्या कामांची नियोजनबद्ध कार्यक्रमानुसार चौकशी करून तसा अहवाल वेळेत विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करावा, असे स्पष्ट निर्देश विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी दिले होते. असे असताना चौकशी प्रक्रिया संपून ४० दिवसांपेक्षा अधिक कालावधी होऊनही एकाही ग्रामपंचायतीचा चौकशी अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर झाला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.मालेगाव तालुक्यातील रोजगार हमी योजनेच्या कामांची चौकशी करणाºया १० पथकांपैकी काहींचे चौकशी अहवाल जिल्हास्तरावर प्राप्त झाले आहेत. सर्व पथकांचे अहवाल प्राप्त झाल्यानंतर ते एकत्रीतरित्या आयुक्त कार्यालयाकडे पाठविण्यात येतील.- शंकर तोटावारसंनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम१२ ते ३१ डिसेंबर या कालावधीत पथकांना रोहयोच्या कामांची चौकशी करून तसे अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास वेळेत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र अद्यापपर्यंत एकाही पथकाचा अहवाल प्राप्त झालेला नाही.- डी.पी. गव्हाळेकार्यकारी अभियंता, रोहयो विभाग, आयुक्त कार्यालय, अमरावती

 

टॅग्स :washimवाशिम