शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणूक २०२५: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
2
'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
3
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली
4
पंतप्रधान, मुख्यमंत्री असो अथवा मंत्री...; ३० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात राहिल्यास खुर्ची जाणार! आज संसदेत ३ विधेयकं सादर होणार
5
आजचे राशीभविष्य, २० ऑगस्ट २०२५: नवीन कार्याच्या प्रारंभात अडचणी; व्यवसायात अपेक्षित सहकार्य
6
थकबाकी तिप्पट, व्याज चार पट; सरकारवर वाढतोय कर्जाचा डोंगर; सध्याची रक्कम २०० लाख कोटींवर
7
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
8
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
9
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
10
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
11
सोन्याचे दागिने ‘एसआयपी’वर घ्यावे का? पैसे भरताना ज्वेलरची बाजारातील पतही तपासा
12
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
13
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
14
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
15
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
16
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
17
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
18
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
19
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
20
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा

संवादाची दरी बिघडवू शकते मानसिक स्वास्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:45 IST

कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास ...

कोरोनामुळे अनेक कारणांनी ताणतणाव, कलह वाढले आहेत. रोजगार गेल्याने कौटुंबिक कलह तर काही ठिकाणी नोकरी असुरक्षित असल्याची भावनाही ताणतणावास कारणीभूत ठरते. इतरही काही कारणांनी आलेले नैराश्य, नकारात्मक भावना आणि त्यासोबतच अव्यक्त होण्याचे प्रकार वाढत आहेत. परिणामी, घराघरात संवाद अत्यल्प होत असून, अनेक जण मानसिक तणावाखाली वावरत असल्याचे समोर येत आहे. कामाचा ताण, घराचे हप्ते, हाती पैसे नसणे यामुळे कुटुंबाचे कसे होणार, जबाबदाऱ्या कशा पूर्ण होणार, याचा मनावर ताण असतो. योग्य वेळी योग्य व्यक्तीकडे याबाबत व्यक्त न झाल्यास समस्या वाढतात. या समस्या टाळण्यासाठी व्यक्त व्हा, मोकळे व्हा, बोलते व्हा, जवळच्या व्यक्तीसोबत संवाद वाढवा, असा सल्ला मानसोपचार तज्ज्ञांनी दिला.

०००००

मन हलके करणे हाच उपाय

नकारात्मक काढून टाकण्यासाठी स्वत:वर आत्मविश्वास ठेवणे.

नियमित व्यायाम, योग व प्राणायाम करणे.

रागावर नियंत्रण मिळविणे, रागाला शांत ठेवणे.

जवळच्या व्यक्तीजवळ व्यक्त होणे.

बोलून मन हलके करणे.

सकारात्मक विचार करणे.

संयमी, सहनशीलता वाढीस लावणे.

सकस आहार घेणे.

पुरेशी झोप घेणे.

चिडचिड न करणे.

...................

कोरोनाकाळात कुठेतरी संवादाची दरी वाढत असल्याचे दिसून येते. रोजगार, नोकरी हिरावल्यामुळे नैराश्य येते. मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी संवाद वाढविणे आवश्यक आहे. कोणताही ताण मनावर न घेता व्यक्त व्हायला शिकणे गरजेचे आहे.

- डॉ.नरेश इंगळे, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.

................

मानसिक स्वास्थ टिकविण्यासाठी सदैव चिंतामुक्त राहणे आवश्यक आहे. एखाद्या विषयाचा ताण असेल, तर त्याबाबत जवळच्या व्यक्तीला, कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधला पाहिजे. संवादातून मार्ग निघतो.

- डॉ.मंगेश राठोड, मानसोपचार तज्ज्ञ, वाशिम.