शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

मानोरा शहरात शेतकऱ्यांनी काढला बैलबंडी मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:16 IST

मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा  : शेतकऱ्यांना दुबार पेरणीसाठी प्रति हेकटर पंचविस हजार रुपये मदत करण्यात यावी या प्रमुख मागणीसाह मानोरा येथील तहसील कार्यालत शेतकऱ्यांचा बैलबंडी मोर्चा  परिवर्तन शेतकरी संघटनेच्यावतीने १३ जुलै रोजी काढण्यात आला होता. तहसील परिसरात सर्वत्र बैलबंडी व शेतकऱ्यांची एकच गर्दी झालेली दिसून आलीत्र                                                            कारंजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी  पहिल्या जोरदार पावसाच्या काळात केलेल्या पेरणीनंतर पावसाने दडी मारल्यामुळे दुबार पेरणीची वेळ आली. कोरोनातील लॉकडाउन संकटामुळे शेतकऱ्यांच्या, अल्पभूधारक शेतकरी मजुरांच्या हाताला काम नाही. आस्मानी व सुलतानी अशा दोन्ही संकटाना शेतकरी सामोरे जात आहे.आधीच आत्महत्या ग्रस्त जिल्हा व त्यात हे महाभयंकर संकटामुळे कात्रीत सापडलेल्या शेतकº्यांना वेळीच मदत देण्याच्या मागणीसाठी सदर आंदोलन करण्यात आले होते.परिवर्तन शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकरी नेते मनोहर राठोड यांच्या नेतृत्वात सोमवार,  दिनांक १३ जुलै २०२० ला  सदर मोर्चा प्रमुख मार्गदर्शक  उद्योजक संजय महाराज, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे यवतमाळ जिल्हा अध्यक्ष मनीष जाधव  तांडा सुधार समितीचे नामा बंजारा, समाज प्रभोधनकार पंकजपाल महाराज  अ‍ॅड.बाळा चव्हाण आदिंच्या उपस्थितीत काढण्यात आला.  शेतकºयांच्या बैलबंडी मोर्चामुळे तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते. कोणतीही अनुचित घटना घडू  नये याकरिता पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त     ठेवण्यात आला होता.

-मोर्चात विविध संघटनांचा सहभाग या मोर्चामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटना, अखिल भारतीय विमुक्त, घुमन्तु जनजाती वेलफेअर संघ, अखिल भारतीय तांडा सुधार समिती, बंजारा क्रांतिदल महाराष्ट्र प्रदेश, परिवर्तन फाउंडेशन, शिवसंग्राम संघटना, कर्मचारी आघाडी, प्रहार जनशक्ती पक्ष, धनगर समाज संघटना, वसंतराव नाईक मित्र मंडळ व अनेक शेतकºयांनी सहभाग घेतला होता. मोर्चा तहसील कार्यालयामध्ये पोहचल्यानंतर तहसील परिसराला यात्रेचे स्वरुप प्राप्त झाले होते.-शेतकऱ्यांच्या न्यायासाठी मोर्चाचे आयोजन भूमिपुत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यशवंतरराव चव्हाण व वसंतराव नाईक यांच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे शासनाचे सतत दुर्लक्षच होत राहिले आहे.अशा विपरीत परिस्थितीत शेतकऱ्यांना मदत न मिळाल्यास शेतकरी दुबार पेरणी करू शकणार नाही त्यामुळे त्याच जीवनच गणितच बिघडून जाईल व शेवटी आत्महत्या करण्यास प्रवृत्त होईल अशी भीती निर्माण झाल्यामुळे यामोचार्चे आयोजन करण्यात आल्याचे मनोहर राठोड या शेतकरी नेते यांनी  कळविले आहे.

शेतकऱ्यांनी व्यक्त केला रोषशेतकºयांना त्वरित मदत देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयात गेलेल्या शेतकºयांनी शासनाविरुध्द रोष व्यक्त करीत प्रशासनाने शेतकºयांचा आवाज शासनापर्यंत पोहचविण्याची मागणी केली. यावेळी संतप्त असलेल्या शेतकºयांकडून फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होवू शक ले नसले तरी सर्वांनी तोंडाला मास्क लावून आंदोलनात सहभाग नोंदविला होता. यावेळी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. तसेच शेतकºयांच्या मागण्यांची त्वरित दखल घेण्याची मागणी शेतकºयांनी यावेळी केली.

टॅग्स :ManoraमानोराFarmerशेतकरी