शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

सत्ताधा-यांनीच ठोकले मालेगाव नगर पंचायतला कुलूप

By admin | Updated: May 24, 2016 02:00 IST

कायमस्वरूपी मुख्याधिका-यांचे पद रिक्त असल्यामुळे कामे खोळंबली.

मालेगाव (जि. वाशिम): कायमस्वरूपी मुख्याधिकार्‍यांअभावी शहरवासीयांची कामे खोळंबली आहेत. शहरातील विकासात्मक कामांना चालना मिळण्यासाठी मालेगाव नगर पंचायतला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याच्या मागणीसाठी सत्ताधार्‍यांसह नगरसेवकांनी २३ मे रोजी नगर पंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले.मालेगाव नगरपंचायत अस्तित्वात येऊन चार महिन्यांचा अवधी झाला आहे. अद्याप कायमस्वरूपी मुख्याधिकारी मिळाला नाही. त्यामुळे जनतेची कामे ठप्प झाली आहेत. शहरात भीषण पाणीटंचाईची समस्या असूनदेखील पाणी टँकर मंजूर नाही. नगर पंचायतला तीन महिन्यांमध्ये तीन प्रभारी मुख्याधिकारी लाभले आहेत. कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने शहर विकासाची अनेक कामे ठप्प पडली आहेत. शहरातील पथदिवे अनेक दिवसांपासून बंद असून, कर्मचारीसुद्धा याचा गैरफायदा घेऊन कर्तव्यात कसूर करताना दिसत आहेत. प्रभारी मुख्याधिकारीे आठवड्यातील एक किंवा दोन दिवसच येत असल्याने अनेकांचे मालमत्ता कार्डबाबतचे दाखले, इतर कामे ठप्प झाले आहेत. शहरात तीव्र पाणीटंचाई असताना टंचाई नसल्याचा अहवाल वरिष्ठांकडे पाठविल्याने याबाबत कोणत्याही प्रकारची मदत नगर पंचायतला मिळत नाही. शहरवासीयांपर्यंत पाणी पोहोचविण्याचे काम काही वार्डातील नगरसेवक स्वखर्चातून करीत आहेत. एवढे असूनसुद्धा जिल्हा प्रशासन नगर पंचायतींच्या अनेक मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप पदाधिकार्‍यांनी केला. सत्ताधारी नगरसेवकांनी जिल्हाधिकार्‍यांना २0 मे रोजी पत्र पाठवून २३ मेपर्यंत कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्याची मागणी केली. मुख्याधिकारी मिळाले नसल्याने २३ मे रोजी कुलूप ठोकून ठोकून लोकशाही मार्गाने आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी नगराध्यक्ष मीनाक्षी बाळा सावंत, गोपाल मानधने, बबनराव चोपडे, सबनुरबी सत्तार, रूपाली शशी टनमने, रेखा अरुण बळी, शीतल खुळे, गजानन सारस्कर, अफसानाबी तसलीम आदी नगर सेवक उपस्थित होते.