यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक बोंद्रे, निवासी उपजिल्हाधिकारी तथा रोहयोचे उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, दांगट, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा परिषद लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता मापारी यांच्यासह तालुकास्तरीय अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
नंदकुमार म्हणाले, जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्याचे उद्दिष्ट ठेवून ‘मनरेगा’च्या माध्यमातून कामे करावीत. वाशिम हा आकांक्षित जिल्हा असून, शेती हा येथील प्रमुख व्यवसाय आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंब लखपती बनविण्यासाठी शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढविण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. ‘मनरेगा’ अंतर्गत जलसंधारणाची कामे करून गावात पडणारा पावसाचा प्रत्येक थेंब गावातच थांबविण्याचे नियोजन करावे. जेणेकरून प्रत्येक शेतीला सिंचनाची सुविधा निर्माण होऊन उत्पन्नवाढीस मदत होईल. या अनुषंगाने गावनिहाय ‘जीएसआय’ आधारित आराखडा तयार करावा. पहिल्या टप्प्यात ‘क्लस्टर फॅसिलिटेशन प्रोजेक्ट’ अंतर्गत निवड झालेल्या मानोरा व मालेगाव तालुक्यातील गावांचे सर्वेक्षण करून आराखडे तयार करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.