शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

शेतात जाण्यासाठी रस्ता करा, नाहीतर जमिनी परत द्या!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 19:05 IST

चिखली-पेडगाव रस्ता प्रकरण : शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

संतोष वानखडे, वाशिम : प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत चिखली ते पेडगाव (ता.रिसोड) या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम असून, शेतात जाण्यासाठी महत्वपूर्ण असलेला हा रस्ता पूर्ण करावा अन्यथा रस्त्यासाठी विनामुल्य दिलेल्या आमच्या जमिनी परत करा, असे साकडे चिखली येथील शेतकऱ्यांनी १० जून रोजी जिल्हाधिकाऱ्यांना घातले. निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे यांनी शेतकऱ्यांचे निवेदन स्विकारले.

रिसोड तालुक्यातील चिखली ते पेडगाव हा रस्ता सन २०२१-२२ मध्ये मंजूर झालेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या शेतकऱ्यांनी या रस्त्यासाठी विनामुल्य जमिनी दिल्या. पेडगाव येथून रस्ता कामाला सुरूवात होऊन चिखलीपासून अंदाजे एक ते दीड किमी अंतराअगोदर रस्ता काम येवून थांबले आहे. काही शेतकऱ्याने या रस्ता कामास विरोध केल्यामुळे रस्ता काम थांबल्याचे निवेदनात नमूद आहे. या रस्त्याचे काम पूर्ण व्हावे म्हणून प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्यांनी पोलिस संरक्षणासाठी रिसोड पोलिस स्टेशन तसेच संबंधितांशी पत्रव्यवहारदेखील केला. परंतू, अद्यापही पोलिस संरक्षण मिळाले नसल्याने रस्ता काम रखडले आहे.

या पार्श्वभूमीवर चिखलीच्या शेतकऱ्यांनी १० जून रोजी जिल्हाधिकारी कार्यालय गाठून निवेदन दिले. पोलिस संरक्षणात रस्ता काम पूर्ण करावे, रस्ता काम पूर्ण न झाल्यास, न्याय न मिळाल्यास रस्त्यासाठी आम्ही दिलेल्या जमिनी परत कराव्या, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली. 

टॅग्स :washimवाशिम