शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

सिंचन अनुशेष कायम; शेतक-यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:43 IST

वाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देकृषी सभापतीचे जलसंपदा विभागाला निवेदन निधी उपलब्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.शेतीला सिंचनाची जोड मिळावी, यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जातात. वाशिम जिल्ह्यात काही प्रकल्प निर्माण करण्यात आले. तथापि, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा प्रश्न अद्याप शासनाने हाती घेतला नाही. रिसोड व मालेगाव तालुक्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. शेतीला सिंचनाची जोड नसल्याने अपेक्षीत उत्पादन घेण्यात अडथळे निर्माण होत आहे. वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्याच्या दृष्टिने जलसंपदा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध असून अधिकांश शेतजमिन यामुळे सिंचनापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, हे तीन मध्यम आणि इतर १२२ सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकºयांना रबी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. ३ लाख ९२ हजार हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रावर सिंचनाची प्रभावी सोय होणे क्रमप्राप्त आहे. पूर्ण झालेले आणि बांधकामाधिन, अशा १६१ प्रकल्पांपासून ८४ हजार २४२ हेक्टरवर सिंचन क्षमता प्रस्तावित होती. प्रत्यक्षात १३६ प्रकल्पांपासून केवळ ६० हजार ६३३ हेक्टरवरच सिंचन क्षमता निर्माण झाली. आजमितीस सिंचन अनुशेष तब्बल ५०२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. जलसंपदा विभागाने सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना मान्यता द्यावी, पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करावा आणि रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा मुद्दा हाती घ्यावा, अशी मागणी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी