शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

सिंचन अनुशेष कायम; शेतक-यांची दैना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2017 22:43 IST

वाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.

ठळक मुद्देकृषी सभापतीचे जलसंपदा विभागाला निवेदन निधी उपलब्ध करण्याची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्याचा सिंचन अनुशेष कमी होण्याऐवजी वर्षागणिक वाढत चालला आहे. सिंचनाचा अनुशेष भरून काढावा, अशी मागणी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप यांनी जलसंपदा विभागाकडे शुक्रवारी केली.शेतीला सिंचनाची जोड मिळावी, यासाठी शासनातर्फे प्रयत्न केले जातात. वाशिम जिल्ह्यात काही प्रकल्प निर्माण करण्यात आले. तथापि, रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा प्रश्न अद्याप शासनाने हाती घेतला नाही. रिसोड व मालेगाव तालुक्यात सिंचनाचा सर्वाधिक अनुशेष असल्याने शेतकºयांच्या पदरी निराशा पडत आहे. शेतीला सिंचनाची जोड नसल्याने अपेक्षीत उत्पादन घेण्यात अडथळे निर्माण होत आहे. वाशिम जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष कमी करण्याच्या दृष्टिने जलसंपदा विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. वाशिम जिल्ह्यात गरजेच्या तुलनेत केवळ २५ टक्के क्षेत्रावरच सिंचनाची सोय उपलब्ध असून अधिकांश शेतजमिन यामुळे सिंचनापासून वंचित राहत आहे. जिल्ह्यात एकबुर्जी, सोनल आणि अडाण, हे तीन मध्यम आणि इतर १२२ सिंचन प्रकल्पांव्दारे शेतकºयांना रबी हंगामात सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून दिले जाते. ३ लाख ९२ हजार हेक्टर निव्वळ पेरणी क्षेत्रावर सिंचनाची प्रभावी सोय होणे क्रमप्राप्त आहे. पूर्ण झालेले आणि बांधकामाधिन, अशा १६१ प्रकल्पांपासून ८४ हजार २४२ हेक्टरवर सिंचन क्षमता प्रस्तावित होती. प्रत्यक्षात १३६ प्रकल्पांपासून केवळ ६० हजार ६३३ हेक्टरवरच सिंचन क्षमता निर्माण झाली. आजमितीस सिंचन अनुशेष तब्बल ५०२ कोटी रुपयांवर पोहचला आहे. जलसंपदा विभागाने सिंचन अनुशेष कमी करण्यासाठी प्रलंबित प्रकल्पांना मान्यता द्यावी, पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध करावा आणि रिसोड तालुक्यातील पैनगंगा नदीवरील बॅरेजेसचा मुद्दा हाती घ्यावा, अशी मागणी सभापती विश्वनाथ सानप यांनी केली. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी