शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

वाशिम जिल्ह्यात ‘महाराजस्व अभियान’ थंडावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 13:58 IST

वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून या अभियानाचे कामकाज मंदावले असून प्रचार-प्रसारालाही प्रशासनाकडून ‘कोलदांडा’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

ठळक मुद्दे सर्वसामान्यांची कामे प्रलंबित प्रचार-प्रसाराला कोलदांडा

वाशिम : महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि पारदर्शक करण्यासाठी ‘महाराजस्व अभियान’ राबविले जाते. यामाध्यमातून सर्वसामान्यांची रेंगाळलेली, प्रलंबित असलेली कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न होणे क्रमप्राप्त आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या ६ महिण्यांपासून या अभियानाचे कामकाज मंदावले असून प्रचार-प्रसारालाही प्रशासनाकडून ‘कोलदांडा’ मिळत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. महाराजस्व अभियानास जिल्ह्यात १ आॅगस्ट २०१५ पासून सुरूवात झाली असून ३१ जुलै २०१८ पर्यंत याअंतर्गत प्रशासनाने कुठली कामे करायची आहेत, यासंदभार्तील निर्देश शासनाने पारीत केले आहेत. त्यानुसार, जिल्हा, तालुका, गावाच्या भूसंपत्तीचे अचूक व्यवस्थापन व नियमन करण्यासाठी शिवारफेरीचे आयोजन करणे, गटनिहाय पोट खराब क्षेत्र सर्वेक्षण नोंदी घेणे, पोत सुधारलेल्या गटांच्या जमिनींचे सर्वेक्षण करणे व नोंदी घेणे, सिंचीत क्षेत्राचे सर्वेक्षण, पिके व फळबागांच्या वस्तूनिष्ठ नोंदी घेणे, पाणीपुरवठा साधनांच्या नोंदी घेणे, नदी-नाले-ओढ्यांवर झालेल्या अतिक्रमणाची माहिती संकलित करणे यासह इतरही विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. असे असताना गेल्या ६ महिन्यांपासून यातील कुठलेच काम व्यवस्थितरित्या होत नसल्याने सर्वसामान्य नागरिकांची गैरसोय होत आहे. 

 

काही महिन्यांपासून निश्चितपणे महाराजस्व अभियानाचे कामकाज जिल्ह्यात थंडावले आहे. मात्र, जानेवारी महिन्यापासून या अभियानाला गती दिली जाईल. यासंदर्भात महसूल यंत्रणेतील अधिकारी, कर्मचाºयांनाही सक्त निर्देश दिले जातील.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र