शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

महाबीजकडे गव्हाच्या बियाण्यांचा तुटवडा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2019 17:21 IST

नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा वाशिम जिल्ह्यात आॅक्टोबरच्या अखेरनंतर आठवडाभर कोसळलेल्या पावसामुळे जलाशय तुडूंब भरले असून, विहिरी, कूपनलिकांची पातळी वाढली आहे. त्यामुळे रब्बी हंगामात गहू पिकाला पाणी देणे शक्य असल्याने शेतकरी याच पिकाच्या पेरणीवर भर देत आहेत. तथापि, पेरणीची वेळ संपत येत असतानाही महाबीजकडे या पिकाच्या बियाण्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. वाशिम जिल्ह्यात महाबीजच्या प्रकल्पांतर्गत १५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पिकाची पेरणी केली जाते. या क्षेत्रासाठी प्रति हेक्टर १ क्विंटलप्रमाणे १५ हजार क्विंटल बियाण्यांची गरज असते. त्यानुसार महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाने नियोजन करून वरिष्ठस्तरावर बियाणे उपलब्ध करण्याची मागणीही केली आहे. तथापि, नोव्हेंबर महिना संपत आला तरी, अपेक्षीत आणि आवश्यक प्रमाणापेक्षा खुप कमी बियाणे महाबीजच्या जिल्हा व्यवस्थापनाकडे उपलब्ध झाले आहे. महाबीजच्यावतीने प्रामुख्याने लोकवन, ६२२२, फुले नेत्रावती, त्र्यंबक, एचडी २१८९, डीब्ल्यू ४९६, या वाणांचा बिजोत्पादन प्रकल्पासाठी वापर केला जातो; परंतु गतवर्षी राज्यभरात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पातील बियाणे तपासणीदरम्यान नापास झाले अर्थात, गतवर्षी गहू बियाण्यांची क्षमता आवश्यकतेपेक्षा कमी आढळून आली. त्यामुळे महाबीजला आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध करता आले नाही. त्यामुळे महाबीजला इतर बियाण्यांचा आधार घ्यावा लागत आहे. त्यासाठी नियोजनही केले असले तरी, वेळेवर बियाणे उपलब्ध होण्यास विलंब लागत आहे. वाशिम जिल्ह्यात साधारण डिसेंबरच्या मध्यंतरापर्यंत गहू पिकाची पेरणी केली जात असते. तथापि, अद्याप आवश्यक प्रमाणात बियाणे उपलब्ध झाले नाहीत. अद्यापही महाबीजकडे साधारण सहा हजार क्विंटल गहू बियाण्यांचा तुटवडा असून, आता वेळ निघून गेल्यावर बियाणे उपलब्ध झाल्यास महाबीजला ते बियाणे बाजारात लिलावाद्वारे विकावे लागण्याची शक्यता आहे.  हार्वेस्टरच्या वापराचा परिणाममहाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पात गहू पिकाची पेरणी करणारे शेतकरी गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर अधिक करतात. या पद्धतीमुळे गहू पिकाची काढणी झपाट्याने आणि कमी खर्चात होत असली तरी, या पद्धतीमुळे गहू बियाण्यांचा दर्जा खालावतो. गव्हाच्या नख्या हार्वेस्टरमुळे तुटल्यानंतर त्याची उगवण क्षमता कमी होते. याच पद्धतीचा वापर गतवर्षी बहुतांश शेतकºयांनी केल्यामुळे त्यांचे बियाणे तपासणीत सदोष आढळून आले आणि महाबीजकडे गहू बियाण्यांचा यंदा तुटवडा निर्माण झाला.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज