शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
5
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
6
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
7
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
8
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
9
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
10
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
11
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
12
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
13
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
14
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
15
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
16
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
17
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
18
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
19
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
20
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा

वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे ८५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:45 IST

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज चमूतर्फे पंचनाम्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

जिल्हयात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपीटही झाली. मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारासदेखील वाशिम शहरासह रिसोड व मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती वाढली असून, शेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात आहेत. गारपिट व अवकाळी पावसामुळे रिसोड व मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अंतिम अहवाल हाती आल्यानंतर यामध्ये बदलही होऊ शकतो, असे गावसाने यांनी स्पष्ट केले. 

लेखी आदेशच नाहीतदरम्यान, काही ठिकाणच्या तलाठी व कृषी सहायकांना पंचनाम्यासंदर्भात अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे. लेखी आदेश नसल्याने सोमवारी अनेक ठिकाणी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भागांची केवळ पाहणी करण्याचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांना विचारणा केली असता, तालुका स्तरावरून तहसिलदार व तालुका कृषी अधिका-यांकडून सोमवारी सायंकाळपर्यंत लेखी आदेश दिले जातील,  असे सांगितले.

मुंगळा परिसरातही प्रचंड नुकसानमालेगाव तालुक्यातील मूंगळा, खेर्डी, रेगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. १२ फेब्रुवारी रोजी मुंगळा परिसराला भेट देऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी केली. मात्र, पंचनामा केला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखी आदेश प्राप्त होताच, पंचनामे केली जातील, असे तलाठी गजानन उमाळे, कृषी सहायक संजय जहागीरदार, भारत लहाने यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम