शहरं
Join us  
Trending Stories
1
२४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, दुबार मतदारावरही उचललं पाऊल
2
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
3
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
4
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
5
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
6
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
7
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
8
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
10
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
11
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
12
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
13
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
14
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
15
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
16
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले
17
"हा देश राम-सीता यांचा, लादेनचा नाही; या छोट्या ओसामाला..."; बिहारमध्ये हिमंत बिस्वा सरमा यांचा हल्लाबोल
18
Election: निवडणुकीच्या प्रचारात शब्द जपून वापरा नाही तर...; केंद्रीय मंत्र्याविरोधात गुन्हा दाखल
19
Demat अकाऊंटमध्ये ४३ कोटी ठेवणारे डॉक्टर व्हायरल; झिरोदाला म्हटलं स्कॅम; कामथ काय म्हणाले?
20
देशातील १ टक्के श्रीमंत लोकांच्या संपत्तीत ६२ टक्क्यांनी वाढ; हैराण करणारा रिपोर्ट आला समोर

वाशिम जिल्ह्यात गारपिटीमुळे ८५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2018 19:45 IST

वाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

ठळक मुद्देकृषी विभागाचा प्राथमिक अंदाज चमूतर्फे पंचनाम्यास प्रारंभ

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अवकाळी पाऊस व गारपिटीने वाशिम जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पीक व फळबागांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला आहे. दरम्यान, सोमवार १२ फेब्रुवारीपासून स्थानिक पातळीवरील चमूतर्फे नुकसानग्रस्त भागांच्या पंचनाम्यास प्रारंभ झाला आहे.

जिल्हयात रविवार, ११ फेब्रुवारीला सकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात अवकाळी पाऊस झाला. रिसोड व मालेगाव तालुक्यात गारपीटही झाली. मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार परिसरातील अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा पिकांचे नुकसान झाले. रविवारी रात्री १० वाजताच्या सुमारासदेखील वाशिम शहरासह रिसोड व मालेगाव तालुक्यात अवकाळी पाऊस झाला. यामुळे पीक नुकसानाची व्याप्ती वाढली असून, शेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी या दृष्टिकोनातून तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवक यांच्यामार्फत नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे केले जात आहेत. गारपिट व अवकाळी पावसामुळे रिसोड व मालेगाव तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले असून, पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे, अशी माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी दिली. प्राथमिक अंदाजानुसार, जिल्ह्यातील ८५०९ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, अंतिम अहवाल हाती आल्यानंतर यामध्ये बदलही होऊ शकतो, असे गावसाने यांनी स्पष्ट केले. 

लेखी आदेशच नाहीतदरम्यान, काही ठिकाणच्या तलाठी व कृषी सहायकांना पंचनाम्यासंदर्भात अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याची माहिती आहे. लेखी आदेश नसल्याने सोमवारी अनेक ठिकाणी तलाठी, कृषी सहायक व ग्रामसेवकांनी नुकसानग्रस्त भागांची केवळ पाहणी करण्याचे सोपस्कार पार पाडल्याची माहिती आहे. यासंदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गावसाने यांना विचारणा केली असता, तालुका स्तरावरून तहसिलदार व तालुका कृषी अधिका-यांकडून सोमवारी सायंकाळपर्यंत लेखी आदेश दिले जातील,  असे सांगितले.

मुंगळा परिसरातही प्रचंड नुकसानमालेगाव तालुक्यातील मूंगळा, खेर्डी, रेगाव परिसरात अवकाळी पाऊस व गारपिटीने गहू, हरभरा, संत्रा पिकांचे अतोनात नुकसान झाले. १२ फेब्रुवारी रोजी मुंगळा परिसराला भेट देऊन कृषी सहायक व तलाठ्यांनी पाहणी केली. मात्र, पंचनामा केला नाही. यासंदर्भात विचारणा केली असता, अद्याप लेखी आदेश मिळाले नसल्याचे त्यांनी सांगितले. लेखी आदेश प्राप्त होताच, पंचनामे केली जातील, असे तलाठी गजानन उमाळे, कृषी सहायक संजय जहागीरदार, भारत लहाने यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिम