शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

 लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:53 IST

वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अडोळी गावात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. गावाचा विकास साधण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधी पुरविला जातो. तसेच अन्य शासकीय योजनांतून निधी मिळतो. परंतू, अडोळी येथील समस्यांवर नजर टाकली असता, शासनाचा निधी गावात पोहचतो की नाही, असा प्रश्न  गावकºयांनी उपस्थित केला. गावातील मुख्य रस्त्यावर चिखल व पाणी साचले आहे. रस्त्यावरून चालायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानचा  हा रस्ता गावाचा प्रमुख असुन मुलांना शाळेत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ठाणेदार भारद्वाज यांनी अडोळी गाव गाठून सरपंच व ग्रामसेवकांना रस्ता कामासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरु झाले आहे, अशी माहिती निवेदनकर्ते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत