शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
2
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
3
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
4
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
5
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
6
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
7
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
8
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
9
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
10
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
11
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
12
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
13
एफडी विसरा, हायवेमध्ये करा गुंतवणूक! १०% पर्यंत मिळेल परतावा; 'राजमार्ग इनविट'ला सेबीची मंजुरी
14
सुरक्षा दलांची मोठी कारवाई; ओडिशातील गुम्मा जंगलात कुख्यात गणेश उइकेसह 4 माओवाद्यांचा खात्मा
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलमधून शर्मन जोशीचा पत्ता कट?, अभिनेता म्हणाला- "मला तर..."
16
मी नाराज कधीच नव्हतो, भाजप हा माझा पक्ष; बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांनी...- सुधीर मुनगंटीवार
17
ख्रिसमसच्या सकाळी PM नरेंद्र मोदींनी लावली ऐतिहासिक चर्चमध्ये हजेरी; प्रार्थनेत सहभागी
18
नाशिक भाजपात मोठा राडा! पक्षप्रवेशावरून २ गटांमध्ये तणाव; फरांदे समर्थकांकडून घोषणाबाजी
19
"आज 'महाप्रलय' येणार...!"; स्वतःला अवतार म्हणवणाऱ्या Eboh Noah च्या भविष्यवाणीला घाबरून एकत्र आले हजारो लोक
20
खळबळजनक रिपोर्ट! रशिया, भारत आणि फिलीपिन्स...कोणकोणत्या देशांच्या जमिनीवर चीनची करडी नजर?
Daily Top 2Weekly Top 5

 लोकमत इफेक्ट : अडोळी येथे रस्त्याच्या कामाला सुरुवात  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2019 13:53 IST

वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानच्या रस्त्यावर पाणी व चिखल असल्याने ये-जा करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत असल्यासंदर्भात ९ ऑगस्ट रोजी वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनच्या ठाणेदार भारद्वाज यांनी सरपंच,  सचिवांना सूचना देताच रस्ता कामाला सुरूवात झाली.पाच हजारापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या अडोळी गावात मुलभूत सुविधांचा बोजवारा उडत आहे. गावाचा विकास साधण्यासाठी चौदाव्या वित्त आयोगाच्या माध्यमातून लोकसंख्या व क्षेत्रफळानुसार निधी पुरविला जातो. तसेच अन्य शासकीय योजनांतून निधी मिळतो. परंतू, अडोळी येथील समस्यांवर नजर टाकली असता, शासनाचा निधी गावात पोहचतो की नाही, असा प्रश्न  गावकºयांनी उपस्थित केला. गावातील मुख्य रस्त्यावर चिखल व पाणी साचले आहे. रस्त्यावरून चालायचे झाल्यास मोठी कसरत करावी लागत आहे. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते बुध्द विहार या दरम्यानचा  हा रस्ता गावाचा प्रमुख असुन मुलांना शाळेत जाण्याचा एकमेव मार्ग आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या अगदी प्रवेशद्वाराजवळच पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते. यासंदर्भात लोकमतने सचित्र वृत्त प्रकाशित केले होते. याची दखल घेत ठाणेदार भारद्वाज यांनी अडोळी गाव गाठून सरपंच व ग्रामसेवकांना रस्ता कामासंदर्भात सूचना दिल्या. त्यानुसार काम सुरु झाले आहे, अशी माहिती निवेदनकर्ते तथा डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजकुमार पडघान यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत