शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

Lok Sabha Election 2019 : मंगरुळपीर येथील दोन केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:14 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.  तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या.

वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे. त्यामुळे या केंद्रावरील मतदारांना उन्हात ताटकळत बसावे लागले. जवळपास तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली. यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसह मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाळा. तासभर उन्हात मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर या ठिकाणी पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने मतदारांना दिलासा मिळाला.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम