शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
2
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
3
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
4
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
5
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
6
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
7
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
8
सुधाकर बडगुजरांच्या भाजप प्रवेशाला लागणार मुहूर्त; पदाधिकाऱ्यांचा विरोध मावळला
9
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 
10
बाबांसोबत खेळणाऱ्या 'या' चिमुरड्याला ओळखलंत का? आज करतोय क्रिकेटविश्वावर राज्य
11
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
12
मैत्रीला धोका? ७३% मित्र पैसेच परत करत नाहीत; तुम्हीही 'या' चुकीला बळी पडलाय का?
13
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
14
Mumbai: मुंब्रा दुर्घटनेची माहिती असल्यास रेल्वेला कळवा, प्रशासनाचे नागरिकांना आवाहन!
15
सोमनाथसोबत खरंच लग्न केलं? अखेर राजेश्वरी खरातचा मोठा खुलासा, म्हणाली- "लवकरच मी गुड न्यूज.."
16
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
17
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
18
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
19
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!

Lok Sabha Election 2019 : मंगरुळपीर येथील दोन केंद्रावरील ईव्हीएममध्ये बिघाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2019 15:14 IST

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.

ठळक मुद्देयवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे.  तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या.

वाशिम - यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात येणाऱ्या मंगरुळपीर येथील दोन मतदान केंद्रांवरील ईव्हीएम मशीनमध्ये मतदान प्रक्रियेच्या सुरुवातीलाच बिघाड झाला आहे. त्यामुळे या केंद्रावरील मतदारांना उन्हात ताटकळत बसावे लागले. जवळपास तासाभरानंतर येथे पर्यायी मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली. 

लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यात विदर्भातील ७ मतदारसंघात मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू झाली. यात यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाचाही समावेश होता. या मतदारसंघातील वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या मंगरुळपीर शहरातील मतदान कक्ष क्रमांक ७८ आणि मतदान कक्ष क्रमांक २३ मधील ईव्हीएम मशीन प्रक्रियेदरम्यानच बंद पडल्या. त्यामुळे मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांसह मतदारांचा चांगलाच गोंधळ उडाळा. तासभर उन्हात मतदारांना ताटकळत उभे राहावे लागले. अखेर या ठिकाणी पर्यायी ईव्हीएम मशीन उपलब्ध करून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आल्याने मतदारांना दिलासा मिळाला.

लोकशाहीच्या महापर्वातील पहिल्या अध्यायाला आज सुरुवात झाली आहे. त्यामुळे, मतदारांनी अपना टाईम आ गया असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण, देशाच्या संसदेत आपला लोकप्रतिनिधी पाठविण्यासाठी सर्वसामान्य नागरिक आज मतदानाचा हक्क बजावत आहेत. 17 व्या लोकसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यासाठी देशाच्या विविध राज्यातील 91 मतदारसंघात आज मतदान होत आहे. या मतदानला सकाळी 7 वाजल्यापासून सुरुवात झाली आहे. राज्यात विदर्भातील 7 मतदारसंघात आज मतदान होत आहे. त्यामध्ये, नागपूर, रामटेक, गोंदिया-भंडारा, चंद्रपूर, यवतमाळ-वाशिम, गडचिरोली-चिमूर या सात मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे. नागरिकांमध्ये निवडणुकांचा उत्साह दिसत असून मतदान केंद्रावर रांगा लागत आहेत. 

17 व्या लोकसभेसाठी भारतातील 29 राज्यांमध्ये सात टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल. पहिल्या टप्प्यातील मतदानाला 11 एप्रिल रोजी सुरुवात झाली असून मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. आयोगाने निवडणुकांची घोषणा करताच आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे, आदर्श आचारसंहितेचा कालावधी हा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यापासून ते निवडणुकीचे निकाल लागेपर्यंत असणार आहे. 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिम