शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
6
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
7
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
8
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
10
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
11
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
12
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
13
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
14
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
15
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
16
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
17
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
18
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
19
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
20
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...

Lok Sabha Election 2019 : समाजातील गठ्ठा ‘वोटींग’साठी उमेदवारांची धडपड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2019 14:03 IST

वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे.

- सुनील काकडे  वाशिम : वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघासाठी येत्या ११ एप्रिल रोजी होऊ घातलेल्या निवडणूकीचा ज्वर आता चांगलाच वाढला असून आपापल्या समाजातील गठ्ठा ‘वोटिंग’ पदरात पाडून घेण्यासाठी काँग्रेस, शिवसेना या प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह अन्य उमेदवारांनीही ‘चोटी का दम’ लावणे सुरू केले आहे. त्यानुषंगाने ४१ ‘डिग्री सेल्सीयस’च्या कडक उन्हात मतदारसंघातील प्रत्येक गाव पिंजून काढत मतदारांचे उंबरठे झिजवून मतांची खैरात मागितली जात असल्याचे दिसून येत आहे.मराठा समाजाच्या असलेल्या शिवसेनेच्या भावना गवळी यांनी २००९ आणि त्यानंतर २०१४ मध्ये वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघात सलग दोनवेळा विजयश्री मिळवत खासदारकीचा बहुमान पटकाविला. अर्थात दोन्हीवेळा पक्षातील स्थानिक पातळीवरील नेत्यांची भक्कम साथ आणि गवळी ज्या मराठा-कुणबी समाजाच्या आहेत, त्या समाजासोबतच बंजारा व अन्य समाजातील मतदारांचेही त्यांना पाठबळ मिळाले. त्यामुळेच भावना गवळी यांनी २००९ मध्ये काँग्रेसचे हरिसिंह राठोड यांचा ५६ हजार ९५१ मतांनी; तर २०१४ च्या लोकसभा निवडणूकीत काँग्रेसचेच शिवाजीराव मोघे यांचा ९३ हजार ८१६ मतांनी पराभव केला. दोन्हीवेळा भावना गवळी यांना दमदार मताधिक्य मिळाले. असे असताना त्यांनी गेल्या १० वर्षाच्या प्रदिर्घ कारकिर्दीत मतदारसंघात खासदारकी उपभोगताना पदाला साजेशी कामगिरी केलेली नाही. त्यामुळेच यवतमाळातील चार विधानसभा मतदारसंघ आणि वाशिममधील दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये विकासकामांचा आलेख कमालीचा खालावला आहे. त्यांच्याच मराठा-कुणबी समाजात बेरोजगारांची भली मोठी फौज तयार झालेली आहे. केवळ लग्नसोहळे आणि मरणधरणाच्या कार्यक्रमांना हजेरी लावून जमणार नाही; तर बदलत्या काळासोबत स्वत:तही बदल घडवून विकासकामांच्या जोरावर मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलावा लागणार, मतदारांच्या मुलभूत गरजा जाणून त्या पूर्ण करण्यासाठी काम करावे लागणार, याकडे भावना गवळी यांचे कमालीचे दुर्लक्ष झाले. त्यामुळेच यंदाच्या लोकसभा निवडणूकीत त्यांच्यासमोर खडतर आव्हाने उभी ठाकली आहेत. त्याचा सामना त्या कशाप्रकारे करतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.एकाच समाजाच्या दोन उमेदवारांमुळे तगडी ‘फाईट’!२०१४ च्या लोकसभा निवडणूकीत भाजपाच्या कडव्या आव्हानांसमोर गारद झालेल्या काँग्रेसकडून यंदा वाशिम-यवतमाळ लोकसभा मतदारसंघातून निवडणूकीत उतरलेले माणिकराव ठाकरे हे देखील मराठा-कुणबी समाजाचेच असून त्यांनीही अन्य समाजातील मतदारांसोबतच दोन्ही जिल्ह्यांमधील मराठ्यांच्या गावांकडे प्रामुख्याने आपला मोर्चा सद्या वळविला आहे. खासदारकीच्या ‘हॅटट्रीक’वर असलेल्या भावना गवळींचा वारू रोखण्याचे मोठे आव्हान माणिकरावांना पेलावे लागणार आहे. त्यात ते कशापद्धतीने यशस्वी ठरतात, याकडे मतदारांचे लक्ष लागले आहे. दोन्ही प्रमुख राजकीय पक्षांच्या तथा एकाच समाजाच्या या दोन उमेदवारांमुळे मराठा समाजातील मतांचे विभाजन होणार असून तगडी ‘फाईट’ होईल, असा राजकीय तज्ज्ञांचा सूर आहे.बंजारा समाजाची निर्णायक मते कुणाकडे?भाजपात वलय निर्माण करूनही उमेदवारी न मिळाल्याने शेवटच्या क्षणी बंडखोरी करून अपक्ष उमेदवारी दाखल करणारे बंजारा समाजाचे पी.बी. आडे यांनीही प्रामुख्याने आपल्या समाजातील ‘गठ्ठा’ मतांवर एकहाती ‘कब्जा’ मिळविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न चालविले आहेत. अर्थात समाजातील प्रतिष्ठित मंडळी आडे यांच्या बाजूने असल्याने बंजारा समाजाची निर्णायक समजली जाणारी मते आडे शेवटपर्यंत अडवून ठेवतील, अशी खमंग चर्चा होत आहे.

टॅग्स :washimवाशिमyavatmal-washim-pcयवतमाळ-वाशिमLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक