शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

Lockdown : वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजुरांची वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 11:30 IST

वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : परराज्य व महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांमध्ये अडकलेले मजूर गेल्या काही दिवसांपासून मिळेल त्या वाहनांनी आपापल्या गावी परतत आहेत; मात्र सर्वच वाहनांमधून क्षमतेपेक्षा अधिक मजूरांची वाहतूक होत असून त्यास पोलिसांकडूनही मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे. विशेष गंभीर बाब म्हणजे दाटीवाटीने वाहनांमध्ये कोंबून बसणारे अनेक मजूर ना तोंडाला मास्क लावत आहेत, ना ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चा नियम पाळत आहेत.जगभरात धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी केंद्र शासनाने २५ मार्चपासून देशभरात ‘लॉकडाऊन’ लागू केला. सोबतच रेल्वे, बस यासह इतर सार्वजनिक वाहतूकीवर बंदी लादली. परिणामी, मोलमजूरीसाठी देशभरातील विविध राज्यांमध्ये स्थलांतरीत झालेले कामगार, मजूरांचे कुटूंब त्याचठिकाणी अडकून पडले. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शासनाने ‘लॉकडाऊन’मधून शिथिलता देत मजूर, कामगारांना आपापल्या गावी परतण्याची परवानगी दर्शविली. यामुळे एकाचवेळी अनेक राज्यांमधून तसेच महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून मजूरांचे जथ्थेच्या जथ्थे मिळेल त्या वाहनांमध्ये बसून आपापल्या गावी रवाना होताना दिसत आहेत; मात्र कोरोना विषाणू संसर्गाचा धोका झपाट्याने बळावत असतानाच ट्रक, कंटेनर यासह इतर वाहनांच्या आत व टपावर बसून क्षमतेपेक्षा अधिक मजूर प्रवाशांची वाहतूक केली जात असल्याचा गंभीर प्रकार जिल्ह्यातील कारंजा, मालेगाव, केनवड मार्गावर दिसून येत आहे. याहीपेक्षा भयावह स्थिती ही आहे, की दाटीवाटीने वाहनांमध्ये बसणाºया अनेक मजूर, कामगारांकडून ‘फिजीकल डिस्टन्सिंग’चे पालन होत नसून अनेकजण तोंडाला मास्क देखील लावत नसल्याचे पाहावयास मिळत आहे. मजूर प्रवाशांनी खचाखच भरून धावणाºया वाहनांना अपघात झाल्यास मोठ्या प्रमाणात जिवीतहानी होण्याची शक्यता यामुळे बळावली आहे. असे असताना पोलिस प्रशासनाकडून मात्र या प्रकाराला मूकसंमती मिळत असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या संकट काळात त्रस्त झालेले मजूर आपापल्या गावी पोहचणे महत्वाचे आहे; मात्र नियमापेक्षा अधिक वाहतूक करण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. पोलिस प्रशासनाकडूनही याबाबत कारवाई करण्यात येईल.- वसंत परदेशीजिल्हा पोलिस अधीक्षक, वाशिम

 

टॅग्स :washimवाशिमLabourकामगार