शहरं
Join us  
Trending Stories
1
Kedarnath Helicopter Crash : चारधाम यात्रेची हेलिकॉप्टर सेवा स्थगित; गौरीकुंडमधील दुर्घटनेनंतर नवा आदेश
2
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
3
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
4
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार
5
केदारनाथला जाण्यासाठी हेलिकॉप्टरचं तिकीट किती? अपघात झाल्यास कोण देतं भरपाई?
6
Bhiwandi Fire: भिवंडीत भीषण आगीत, १२ केमिकल गोदामे जळून खाक!
7
मोठी बातमी: पुणे पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कुख्यात गुन्हेगार ठार; सोलापूर जिल्ह्यातील घटना
8
चंद्रपूर: 'फादर्स डे'च्या दिवशी पाच मुले झाली पोरकी! दोन रानटी हत्तीनी सोंडेने आपटून एकाला केले ठार
9
मोठा दिलासा! आधार मोफत अपडेट करण्याची शेवटची संधी? UIDAI ने तारीख बदलली!
10
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
11
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
12
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
13
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
14
वाशिमच्या मेडशी बायपासवर भीषण अपघात; दोन ठार, एक जखमी, दोघे थोडक्यात बचावले
15
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
16
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
17
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
18
हायकू हायकू हायकू... म्हणजेच...; पुस्तकाच्या जन्माची गोष्ट!
19
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
20
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:34 IST

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कारंजातील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, ना. संजय कुटे, प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार नीलक नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार राजगुरू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली. शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत पीककर्ज माफी सुरूच राहणार असून, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात ठिंबक सिंचन देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिचंनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले. त्यातुन हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधुन गावांना शहरांशी जोडले. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत शासनाने राबविलेल्या विविध आरोग्यविषयक योजनेचा जनतेला चांगलाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी अडाण यासह जिल्हयात अन्य बॅरेजेसची मागणी केली. सभेला ३० हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. ईव्हीएमवर आरोप न करता जनतेच्या मनाचा कौल घ्यावा !विरोधी पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही बाब चुकीची असून, ईव्हीएमवर आरोप न करता विरोधकांची जनतेच्या मनाचा कौल घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आम्ही ईव्हीएममूळे नव्हे; तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्यानेच बहुमताने कौल मिळाला, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३७० कलमाबाबत भाष्य टाळलेकेंद्र सरकारने कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयावर कारंजा येथील जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपा-सेना युतीचे दिले संकेतपाच वर्षात भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेसमोर मांडून भाषणाच्या अखेरीस आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपा-सेनेचीच सत्ता येणार असे सांगत भाजपा-सेना युतीचे संकेत दिले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राwashimवाशिमKaranjaकारंजाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस