शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
2
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
3
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
4
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
5
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
6
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या
7
France Gen-Z Protest: फ्रान्समध्ये Gen- Z चा संताप! लिमामध्ये DINA विरोधात बंड, दगडफेक आणि पोलिसांशी झटापट
8
...तर पतीच्या प्रेयसीकडून पत्नीला मिळेल भरपाई; हायकोर्टानं नोंदवली निरीक्षणे
9
आजचे राशीभविष्य- २२ सप्टेंबर २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास! आर्थिक लाभ होणार
10
ट्रम्प हे मित्र की शत्रू..अमेरिकेच्या २ निर्णयांनी भारताला बसला मोठा फटका; पुढे काय करायला हवं?
11
घोडबंदर भागातील धुमसता असंतोष राजकीय? शिंदेसेनेची कोंडी करण्यासाठी भाजपा घालतंय खतपाणी
12
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
13
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
14
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
15
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
16
पाकिस्तानी ‘खेळाडूंना’ जपानमध्ये अटक; परदेशात जाण्यासाठी वापरला वेगळाच अन् अफलातून फंडा
17
राज्य सहकारी बँकेत पती-पत्नीला एकत्र नोकरीला असेल बंदी; विवाहानंतर ६० दिवसांत राजीनामा बंधनकारक
18
जनाब, आपल्या पायाखाली काय जळते ते पाहा...अमेरिकेची चाल, भारताभोवती तयार होतोय धोकादायक त्रिकोण
19
विशिष्ट समुदायासाठी उभारली जाते इमारत; गृहनिर्माण संस्थांना सदस्य निवडीचा अधिकार आहे का?
20
धगधगत्या ज्वालेतून आली जगन्माता, भक्ती दाटते नाव घेता...; कुलस्वामिनीच्या उत्सवाचे विविध रंग

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:34 IST

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कारंजातील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, ना. संजय कुटे, प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार नीलक नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार राजगुरू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली. शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत पीककर्ज माफी सुरूच राहणार असून, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात ठिंबक सिंचन देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिचंनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले. त्यातुन हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधुन गावांना शहरांशी जोडले. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत शासनाने राबविलेल्या विविध आरोग्यविषयक योजनेचा जनतेला चांगलाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी अडाण यासह जिल्हयात अन्य बॅरेजेसची मागणी केली. सभेला ३० हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. ईव्हीएमवर आरोप न करता जनतेच्या मनाचा कौल घ्यावा !विरोधी पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही बाब चुकीची असून, ईव्हीएमवर आरोप न करता विरोधकांची जनतेच्या मनाचा कौल घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आम्ही ईव्हीएममूळे नव्हे; तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्यानेच बहुमताने कौल मिळाला, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३७० कलमाबाबत भाष्य टाळलेकेंद्र सरकारने कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयावर कारंजा येथील जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपा-सेना युतीचे दिले संकेतपाच वर्षात भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेसमोर मांडून भाषणाच्या अखेरीस आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपा-सेनेचीच सत्ता येणार असे सांगत भाजपा-सेना युतीचे संकेत दिले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राwashimवाशिमKaranjaकारंजाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस