शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
4
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
5
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
6
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
7
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
8
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
9
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
10
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
11
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
12
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
13
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
14
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
15
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
16
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
17
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
18
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
19
पंचक २०२५: सावधान! २४ ते २९ डिसेंबर दरम्यान 'पंचक' काळ; 'या' ७ राशींनी राहावे अधिक सतर्क!
20
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होईपर्यंत कर्जमाफी सुरूच राहणार  - मुख्यमंत्री  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2019 17:34 IST

शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पाच वर्षांच्या कालखंडात धोरणात्मक निर्णय घेऊन प्रभावी अंमलबजावणी केल्याने राज्याच्या सर्वच क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे. शासनाने शेतकऱ्यांचादेखील गांभीर्याने विचार केला असून, सातबारा कोरा होईपर्यंत पीक कर्जमाफी योजना सुरूच राहणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. महाजनादेश यात्रेचे मंगळवारी कारंजातील विद्याभारती महाविद्यालयाच्या प्रांगणात आगमन झाल्यानंतर आयोजित जाहिर सभेत ते बोलत होते.यावेळी वाशिम जिल्ह्याचे सहपालकमंत्री मदन येरावार, गृहराज्य मंत्री डॉ. रणजित पाटील, ना. संजय कुटे, प्रविण पोटे, आमदार राजेंद्र पाटणी, आमदार लखन मलिक, आमदार नीलक नाईक, माजी आमदार विजयराव जाधव, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजू पाटील राजे, माजी आमदार राजगुरू यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, राज्यातील जनतेच्या हितासाठी अनेक निर्णय घेतले. शेतकºयांच्या आर्थिक विकासासाठी कोट्यवधी रुपयांची तरतुद केली. शेतकºयांचा सातबारा कोरा होईपर्यंत पीककर्ज माफी सुरूच राहणार असून, प्रत्येक शेतकºयाच्या शेतात ठिंबक सिंचन देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. सिचंनाचे रखडलेले अनेक प्रकल्प पूर्ण केले. त्यातुन हजारो हेक्टर सिंचन क्षमता वाढली. ग्रामीण भागातील हजारो किमी अंतराचे रस्ते बांधुन गावांना शहरांशी जोडले. समृद्धी महामार्गामुळे वाशिम जिल्ह्याच्या विकासातही भर पडेल, असा विश्वास व्यक्त करीत शासनाने राबविलेल्या विविध आरोग्यविषयक योजनेचा जनतेला चांगलाच फायदा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी यांनी अडाण यासह जिल्हयात अन्य बॅरेजेसची मागणी केली. सभेला ३० हजारावर जनसमुदाय उपस्थित होता. ईव्हीएमवर आरोप न करता जनतेच्या मनाचा कौल घ्यावा !विरोधी पक्षांकडून ईव्हीएमचा मुद्दा उपस्थित केला जात आहे. ही बाब चुकीची असून, ईव्हीएमवर आरोप न करता विरोधकांची जनतेच्या मनाचा कौल घ्यावा, असा टोलाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी लगावला. आम्ही ईव्हीएममूळे नव्हे; तर जनतेच्या मनापर्यंत पोहोचल्यानेच बहुमताने कौल मिळाला, असे म्हणताच उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट केला. ३७० कलमाबाबत भाष्य टाळलेकेंद्र सरकारने कश्मिरमधील ३७० कलम रद्द करण्याचा ऐतिहासीक निर्णय सोमवारी घेतला. या निर्णयावर कारंजा येथील जाहिर सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणतेही भाष्य केले नाही. भाजपा-सेना युतीचे दिले संकेतपाच वर्षात भाजपा सरकारने राबविलेल्या कल्याणकारी योजना जनतेसमोर मांडून भाषणाच्या अखेरीस आगामी विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने भाजपा-सेनेचीच सत्ता येणार असे सांगत भाजपा-सेना युतीचे संकेत दिले.

टॅग्स :Maha Janadesh Yatraमहाजनादेश यात्राwashimवाशिमKaranjaकारंजाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस