शहरं
Join us  
Trending Stories
1
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
2
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
3
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
4
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
5
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
6
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
7
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
8
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
9
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
10
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
11
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
12
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
13
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
14
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
15
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
16
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
17
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
18
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
19
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
20
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा

वाशिम जिल्ह्यातील पशुधन संकटात !

By admin | Updated: December 9, 2014 00:58 IST

चारा व पाणीटंचाईचा फटका : पशुधन विक्रीसाठी गुरांच्या बाजारात गर्दी, जनावरांची मातीमोल भावात विक्री.

वाशिम : यंदाच्या दुष्काळी परिस्थितीमुळे तालुक्यातील पशुपालक शेतकरीही चिंतेच्या गर्तेत सापडले असून, संभाव्य चारा व पाणीटंचाई लक्षात घेता पशुपालकांनी जनावरे विक्रीला काढल्याने आठवडी बाजारात गुरांची आवक मोठय़ा प्रमाणात वाढल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बाजारात विक्रीस आणलेल्या जनावरांनाही पाहिजे तसा भाव मिळत नसल्याने पशुपालकांना ते मातीमोल भावात विकण्याची पाळी येत आहे.वाशिम येथील बाजारात मराठवाड्यातील पशुपालकही मोठय़ा प्रमाणात जनावरे विक्रीस आणत असल्याचे चित्र आहे. जनावरांना पाणी व चारा कोठून द्यावा, असा प्रश्न पशुपालकांकडे निर्माण झाल्याने चक्क जनावरे विक्रीस काढल्याने जिल्हय़ातील पशुधन धोक्यात आले असल्याचे चित्र आहे. बाजारात खरेदीदार कमी व विक्रेतेच जास्त असल्याने शेतीयोग्य बैलही कत्तलखान्यावर जात असल्याचे विदारक चित्र जिल्हय़ातील आठवडी बैल बाजारात दिसत आहे. वाशिम जिल्हय़ामध्ये वाशिम, रिसोड, मालेगाव, शेलूबाजार, मालेगाव, कारंजा येथे गुरांचे मोठे आठवडी बाजार आहेत; मात्र आजघडीला या बाजारात खरेदीदार कमी व विक्रेते जास्त असल्यामुळे बळीराजाची येथेही घुसमटच होत आहे; मात्र लोकांची देणी, येणारा भीषण काळ याचा विचार करून १ लाखापर्यंतची बैलजोडी ६0 ते ७0 हजार, ६0 हजार रुपयापर्यंतची बैलजोडी ३0 ते ३५ हजार रु. पर्यंत, ४0 हजार रु. पर्यंतची बैलजोडी १५ ते २५ हजार रु. पर्यंतची विकली जात असल्याचे बाजारात दिसून येत आहे. परिणामी मोठय़ा प्रमाणात शेतीयोग्य बैलही कत्तलखान्यासाठी ट्रकच्या ट्रक भरून जात असल्यचे विदारक चित्र बळीराजाच्या डोळय़ादेखत घडत आहे.