शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

मुदतवाढ मिळूनही पशुगणना लांबणीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2019 14:48 IST

विविध स्वरूपातील अडचणींमुळे मुदतीनंतरही वाशिम जिल्ह्यातील पशुगणनेचे काम पूर्ण झाले नसून ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी ३ मे रोजी दिली.

- सुनील काकडे   वाशिम : केंद्र शासनाच्या पशूसंवर्धन विभाग संचालकांनी परिपत्रकाव्दारे दिलेल्या निर्देशानुसार २० व्या पशुगणनेला जानेवारी २०१९ पासून सुरूवात करण्यात आली. ठरल्यानुसार मार्च २०१९ अखेर पशुगणना पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, ते शक्य न झाल्याने ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. याऊपरही विविध स्वरूपातील अडचणींमुळे मुदतीनंतरही वाशिम जिल्ह्यातील पशुगणनेचे काम पूर्ण झाले नसून ही प्रक्रिया लांबणीवर पडल्याची माहिती सूत्रांनी ३ मे रोजी दिली.प्रत्येक पाच वर्षानंतर आॅक्टोबर महिण्यात संदर्भदिनाचे औचित्य साधून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पशुगणनेला सुरूवात केली जाते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये करण्यात आली होती. या पशुगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात ३ लाख १७ हजार जनावरांची नोंद झाली होती. दरम्यान, २० वी पशुगणना पाच वर्षानंतर अर्थात आॅक्टोबर २०१७ पासून होेणे क्रमप्राप्त होते. प्रत्यक्षात मात्र पशुसंवर्धन विभागाने याकडे लक्षच पुरविले नाही. यामुळे पशुगणनेची प्रक्रिया राबविण्यास प्रचंड विलंब झाला.अखेर जानेवारी २०१९ मध्ये त्यास मुहूर्त सापडून पशुगणनेला सुरूवात करण्यात आली. जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमधील गावांमध्ये पशुगणना करण्यासाठी ग्रामीण भागात ५४ आणि शहरी भागात ८ असे एकूण ६२ प्रगणक नेमण्यात आले. संबंधितांना दोनवेळा पशुगणनेसंबंधीचे प्रशिक्षणही देण्यात आले. तसेच पशुगणनेची माहिती दैनंदिन ‘आॅनलाईन’ पाठविण्यासाठी ‘टॅब’ पुरविण्यात आले. मात्र, संपूर्ण भारतातील जिल्ह्यांमधून प्राप्त होणारी माहिती साठविण्याकरिता दिल्ली येथेच मुख्य ‘सर्व्हर’ असल्याने ते वारंवार ‘डाऊन’ राहणे, ग्रामीण भागातील दुर्गम, अतीदुर्गम भागात ‘इंटरनेट’ची गती कमी असणे यासह अन्य स्वरूपातील तांत्रीक अडचणी उद्भवत असल्याने पशुगणनेच्या कामात अडथळे निर्माण होत आहेत. पर्यायाने ३० एप्रिल ही अंतीम मुदत असताना ६२ प्रगणकांकडून वाशिम जिल्ह्यातील २ लाख १९ हजार घरांचाच सर्वे आतापर्यंत पूर्ण झाला असून अद्याप अनेक घरांना भेटी देवून त्याठिकाणी नेमके पशुधन किती, याची माहिती गोळा करण्याचे काम अपूर्ण असल्याची माहिती सूत्रांनी दिली. त्यामुळे २० व्या पशुगणनेनुसार वाशिम जिल्ह्यात नेमके पशुधन किती, याची आकडेवारी येण्यास जून महिना उजाडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात ६२ प्रगणकांमार्फत २० व्या पशुगणनेचे काम युद्धपातळीवर केले जात आहे. याअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील २ लाख १९ हजार घरांना भेटी देवून पशुधनाची माहिती गोळा करण्यात आलेली आहे. सदर माहिती दिल्ली येथील मुख्य ‘सर्व्हर’मध्ये साठविण्याकरिता पाठविण्यात येत असून अंतीम आकडेवारी हाती यायला आणखी बराच अवधी लागणार आहे.- डॉ. गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम