शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:22 IST

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : समाजातील अनिष्ट चालिरीती, परंपरांना मोडीत काढून परिवर्तनशिल विचारांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची सद्या नितांत गरज निर्माण झाली आहे. ही ताकद केवळ साहित्यीकांच्या लेखनीत आहे. त्यासाठी समाजातील साहित्यीकांच्या सहकार्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी तीन युवा साहित्य संमेलन घेऊन आता जानेवारीत वाशिममध्ये हे संमेलन आयोजित करण्याची तयारी करणारे तथा त्यानुषंगाने शनिवारी वाशिममध्ये आलेले युवा साहित्यीक संतोष इंगळे यांच्याशी साधलेला संवाद...

आतापर्यंतच्या युवा साहित्य संमेलनांविषयी काय सांगाल?

युवा साहित्यीकांची तळमळ, त्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहचावा, या उद्देशाने अकोला शहरात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथे १२ जानेवारी २०१८ ला दुसरे; तर खामगाव (जि.बुलडाणा) येथे २० जानेवारी २०१९ ला तिसरे युवा साहित्य संमेलन पार पडले. तीनही संमेलनास राज्यातील प्रख्यात विचारवंतांना बोलावून त्यांची आणि स्थानिक युवा साहित्यीकांची वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनाची नाळ जोडून देण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. आगामी युवा साहित्य संमेलन वाशिममध्ये प्रा. हरीभाऊ क्षीरसागर यांच्या सहकार्याने येत्या जानेवारीत घेण्याचे नियोजन केले जात आहे.

युवा साहित्य संमेलन घेण्यासाठी निधीची तरतूद कशी केली जाते ?

यापूर्वी झालेल्या तीनही साहित्य संमेलनांसाठी कुठलाही शासकीय निधी घेतलेला नाही. समाजातील काही दानशूर तथा साहित्याची जाण असणाºयांच्या सहकार्यानेच ही संमेलने यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे संमेलनांमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आजवर बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांनाही कुठलेच मानधन दिले नाही.

तसेही जिथे ह्रदयापासून ह्रदयापर्यंतच्या माणसाला मान दिला जातो, तिथे धनाची अपेक्षा कशासाठी?

साहित्य संमेलने आयोजित करण्यातून तुमचा काय लाभ? समाजात परिवर्तनाच्या विचारांची प्रबोधनातून पेरणी करायची असेल तर त्यातून कुठला लाभ पदरात पडणार, याची अपेक्षा करणेच मूळात चुकीचे आहे. मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील असून मी आजवर आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनात्मक साहित्यसेवेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्षेत्रातील मातब्बरांचा मिळणारा आशिर्वादच आपणास स्वर्गसुखाची अनुभूती करून देतो.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत