शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पणत्या, मेणबत्त्यांवर खर्च कशाला? नाताळाकडून शिका’, अयोध्येतील दीपोत्सवावरून अखिलेश यादवांचा टोला 
2
Fake News: रेल्वेबद्दल 'फेक न्यूज' पोस्ट करताय? सावधान! रेल्वेने उचलले मोठे पाऊल
3
"हा भ्याड हल्ला!" अफगाण क्रिकेटपटूंच्या मृत्युवर बीसीसीआयची संतप्त प्रतिक्रिया
4
Ind Vs Aus: पर्थवर विराट-रोहित कमाल दाखवणार? रेकॉर्ड रचणार? हे ७ विक्रम RO-KOच्या निशाण्यावर
5
काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या कारला अपघात, एस्कॉर्ट वाहनावर आदळली कार
6
Mumbai Crime: तुम्ही खरेदी केलेलं सोनं पितळ तर नाही ना? मुंबईतील घटनेनं सर्वांना हादरवून सोडलं!
7
Diwali Sale: दिवाळी ऑफर! मारुतीच्या गाड्यांवर दीड लाखांपर्यंत सूट; येथे पाहा संपूर्ण लिस्ट
8
Nagpur Railway: विघातक शक्तींवर सूक्ष्म नजर; नागपूर स्थानकावर 'वॉर रूम'
9
'बापजाद्यांची पायवाट मोडू नका!'; मनोज जरांगेंचा पंकजा मुंडे,अजित पवारांना आपुलकीचा सल्ला!
10
दिवाळीसाठी गावी निघाले अन् एका क्षणात संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त! 'थार'च्या धडकेत पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू
11
ICC Women’s World Cup 2025 : PAK vs NZ मॅचमध्ये पावसाची बॅटिंग! दक्षिण आफ्रिकेला मिळालं सेमीचं तिकीट
12
Bihar Election 2025 India Alliance: हेमंत सोरेन यांचा इंडिया आघाडीला 'टाटा', 'या' जागा स्वबळावर लढणार
13
नाशिकमधील भयंकर घटना! डोक्यात फरशी, तोंडात बंदूक घालून युवकास ठार मारण्याचा प्रयत्न
14
Bihar Election: म्हशीवरून मिरवणूक आणि भरला उमेदवारी अर्ज, तेज प्रताप यादवांच्या उमेदवाराची चर्चा
15
'अदीना मशीद नाही, आदिनाथ मंदिर', खासदार युसूफ पठाणच्या पोस्टवर भाजपचा निशाणा; प्रकरण काय?
16
Bihar Election: ती चूक  भोवली, मतदानापूर्वीच एक जागा गमावली, बिहारमध्ये NDA ला मोठा धक्का
17
Gold News: भारतीय महिला आहेत हजारो टन सोन्याच्या 'मालक', अमेरिकेसह पाच देशांकडेही नाही इतका साठा
18
भाजपाने देव आणि महापुरुषांचा मांडला बाजार, मेट्रो स्टेशनच्या नावांवरून काँग्रेसची बोचरी टीका
19
Kalyan Crime: गर्लफ्रेंडचा मोबाईल हॅक केला, अश्लील व्हिडीओ अन् आईवडिलांना धमक्या, २९ वर्षीय तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार
20
कोर्टाची नोटीस नाकारणे भोवले! IAS सुजाता सौनिक यांच्याविरुद्ध जामीनपात्र वॉरंट; २६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:22 IST

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : समाजातील अनिष्ट चालिरीती, परंपरांना मोडीत काढून परिवर्तनशिल विचारांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची सद्या नितांत गरज निर्माण झाली आहे. ही ताकद केवळ साहित्यीकांच्या लेखनीत आहे. त्यासाठी समाजातील साहित्यीकांच्या सहकार्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी तीन युवा साहित्य संमेलन घेऊन आता जानेवारीत वाशिममध्ये हे संमेलन आयोजित करण्याची तयारी करणारे तथा त्यानुषंगाने शनिवारी वाशिममध्ये आलेले युवा साहित्यीक संतोष इंगळे यांच्याशी साधलेला संवाद...

आतापर्यंतच्या युवा साहित्य संमेलनांविषयी काय सांगाल?

युवा साहित्यीकांची तळमळ, त्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहचावा, या उद्देशाने अकोला शहरात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथे १२ जानेवारी २०१८ ला दुसरे; तर खामगाव (जि.बुलडाणा) येथे २० जानेवारी २०१९ ला तिसरे युवा साहित्य संमेलन पार पडले. तीनही संमेलनास राज्यातील प्रख्यात विचारवंतांना बोलावून त्यांची आणि स्थानिक युवा साहित्यीकांची वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनाची नाळ जोडून देण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. आगामी युवा साहित्य संमेलन वाशिममध्ये प्रा. हरीभाऊ क्षीरसागर यांच्या सहकार्याने येत्या जानेवारीत घेण्याचे नियोजन केले जात आहे.

युवा साहित्य संमेलन घेण्यासाठी निधीची तरतूद कशी केली जाते ?

यापूर्वी झालेल्या तीनही साहित्य संमेलनांसाठी कुठलाही शासकीय निधी घेतलेला नाही. समाजातील काही दानशूर तथा साहित्याची जाण असणाºयांच्या सहकार्यानेच ही संमेलने यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे संमेलनांमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आजवर बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांनाही कुठलेच मानधन दिले नाही.

तसेही जिथे ह्रदयापासून ह्रदयापर्यंतच्या माणसाला मान दिला जातो, तिथे धनाची अपेक्षा कशासाठी?

साहित्य संमेलने आयोजित करण्यातून तुमचा काय लाभ? समाजात परिवर्तनाच्या विचारांची प्रबोधनातून पेरणी करायची असेल तर त्यातून कुठला लाभ पदरात पडणार, याची अपेक्षा करणेच मूळात चुकीचे आहे. मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील असून मी आजवर आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनात्मक साहित्यसेवेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्षेत्रातील मातब्बरांचा मिळणारा आशिर्वादच आपणास स्वर्गसुखाची अनुभूती करून देतो.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत