शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:22 IST

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : समाजातील अनिष्ट चालिरीती, परंपरांना मोडीत काढून परिवर्तनशिल विचारांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची सद्या नितांत गरज निर्माण झाली आहे. ही ताकद केवळ साहित्यीकांच्या लेखनीत आहे. त्यासाठी समाजातील साहित्यीकांच्या सहकार्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी तीन युवा साहित्य संमेलन घेऊन आता जानेवारीत वाशिममध्ये हे संमेलन आयोजित करण्याची तयारी करणारे तथा त्यानुषंगाने शनिवारी वाशिममध्ये आलेले युवा साहित्यीक संतोष इंगळे यांच्याशी साधलेला संवाद...

आतापर्यंतच्या युवा साहित्य संमेलनांविषयी काय सांगाल?

युवा साहित्यीकांची तळमळ, त्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहचावा, या उद्देशाने अकोला शहरात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथे १२ जानेवारी २०१८ ला दुसरे; तर खामगाव (जि.बुलडाणा) येथे २० जानेवारी २०१९ ला तिसरे युवा साहित्य संमेलन पार पडले. तीनही संमेलनास राज्यातील प्रख्यात विचारवंतांना बोलावून त्यांची आणि स्थानिक युवा साहित्यीकांची वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनाची नाळ जोडून देण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. आगामी युवा साहित्य संमेलन वाशिममध्ये प्रा. हरीभाऊ क्षीरसागर यांच्या सहकार्याने येत्या जानेवारीत घेण्याचे नियोजन केले जात आहे.

युवा साहित्य संमेलन घेण्यासाठी निधीची तरतूद कशी केली जाते ?

यापूर्वी झालेल्या तीनही साहित्य संमेलनांसाठी कुठलाही शासकीय निधी घेतलेला नाही. समाजातील काही दानशूर तथा साहित्याची जाण असणाºयांच्या सहकार्यानेच ही संमेलने यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे संमेलनांमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आजवर बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांनाही कुठलेच मानधन दिले नाही.

तसेही जिथे ह्रदयापासून ह्रदयापर्यंतच्या माणसाला मान दिला जातो, तिथे धनाची अपेक्षा कशासाठी?

साहित्य संमेलने आयोजित करण्यातून तुमचा काय लाभ? समाजात परिवर्तनाच्या विचारांची प्रबोधनातून पेरणी करायची असेल तर त्यातून कुठला लाभ पदरात पडणार, याची अपेक्षा करणेच मूळात चुकीचे आहे. मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील असून मी आजवर आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनात्मक साहित्यसेवेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्षेत्रातील मातब्बरांचा मिळणारा आशिर्वादच आपणास स्वर्गसुखाची अनुभूती करून देतो.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत