शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

साहित्य हेच वैचारिक परिवर्तनाचे सक्षम माध्यम - संतोष इंगळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2019 11:22 IST

सद्या अन्य क्षेत्रांप्रमाणेच साहित्य क्षेत्रातही स्पर्धा लागली असली तरी वैचारिक परिवर्तन घडविण्यासाठी या क्षेत्राशिवाय पर्याय नाही - संतोष इंगळे

लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम : समाजातील अनिष्ट चालिरीती, परंपरांना मोडीत काढून परिवर्तनशिल विचारांना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहचविण्याची सद्या नितांत गरज निर्माण झाली आहे. ही ताकद केवळ साहित्यीकांच्या लेखनीत आहे. त्यासाठी समाजातील साहित्यीकांच्या सहकार्याने विदर्भातील जिल्ह्यांमध्ये यापूर्वी तीन युवा साहित्य संमेलन घेऊन आता जानेवारीत वाशिममध्ये हे संमेलन आयोजित करण्याची तयारी करणारे तथा त्यानुषंगाने शनिवारी वाशिममध्ये आलेले युवा साहित्यीक संतोष इंगळे यांच्याशी साधलेला संवाद...

आतापर्यंतच्या युवा साहित्य संमेलनांविषयी काय सांगाल?

युवा साहित्यीकांची तळमळ, त्यांचा आवाज तळागाळापर्यंत पोहचावा, या उद्देशाने अकोला शहरात १५ जानेवारी २०१७ रोजी पहिले युवा साहित्य संमेलन आयोजित केले होते. दर्यापूर (जि.अमरावती) येथे १२ जानेवारी २०१८ ला दुसरे; तर खामगाव (जि.बुलडाणा) येथे २० जानेवारी २०१९ ला तिसरे युवा साहित्य संमेलन पार पडले. तीनही संमेलनास राज्यातील प्रख्यात विचारवंतांना बोलावून त्यांची आणि स्थानिक युवा साहित्यीकांची वैचारिक, साहित्यिक, सांस्कृतिक व परिवर्तनाची नाळ जोडून देण्यात यशस्वी झालो, याचे समाधान आहे. आगामी युवा साहित्य संमेलन वाशिममध्ये प्रा. हरीभाऊ क्षीरसागर यांच्या सहकार्याने येत्या जानेवारीत घेण्याचे नियोजन केले जात आहे.

युवा साहित्य संमेलन घेण्यासाठी निधीची तरतूद कशी केली जाते ?

यापूर्वी झालेल्या तीनही साहित्य संमेलनांसाठी कुठलाही शासकीय निधी घेतलेला नाही. समाजातील काही दानशूर तथा साहित्याची जाण असणाºयांच्या सहकार्यानेच ही संमेलने यशस्वीरित्या पार पडली. विशेष म्हणजे संमेलनांमध्ये विचार व्यक्त करण्यासाठी आजवर बोलाविण्यात आलेल्या वक्त्यांनाही कुठलेच मानधन दिले नाही.

तसेही जिथे ह्रदयापासून ह्रदयापर्यंतच्या माणसाला मान दिला जातो, तिथे धनाची अपेक्षा कशासाठी?

साहित्य संमेलने आयोजित करण्यातून तुमचा काय लाभ? समाजात परिवर्तनाच्या विचारांची प्रबोधनातून पेरणी करायची असेल तर त्यातून कुठला लाभ पदरात पडणार, याची अपेक्षा करणेच मूळात चुकीचे आहे. मी अत्यंत सर्वसामान्य कुटूंबातील असून मी आजवर आयोजित केलेल्या साहित्य संमेलनांच्या माध्यमातून वैचारिक परिवर्तनात्मक साहित्यसेवेच्या कार्याला वाहून घेतलेल्या या क्षेत्रातील मातब्बरांचा मिळणारा आशिर्वादच आपणास स्वर्गसुखाची अनुभूती करून देतो.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत