शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

भागवत कथा श्रवणाने काम, क्रोध, अहंकार नष्ट होतो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:47 IST

वाशिम : स्थानिक ओंकारेश्वर धाममध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सोमवारी प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचे प्रबोधन ...

वाशिम : स्थानिक ओंकारेश्वर धाममध्ये श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला सोमवारी प्रारंभ झाला. या सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य विजयप्रकाश दायमा यांनी भागवत कथा श्रवण केल्याने काम क्रोध अहंकार नष्ट होते, असे प्रतिपादन केले.

श्री चरखा परिवार व गायत्री सत्संग मंडळाच्यावतीने श्रावण मासानिमित्त दरवर्षीप्रमाणे आचार्य विजय प्रकाश दायमा यांच्या वाणीतून स्थानिक ओंकारेश्वर धाम चरखा यांच्या निवास्थानी गुरुद्वारा रोड येथे श्रीमद् भागवत कथा सप्ताहाला प्रारंभ झाला आहे. यात भाविकांचे प्रबोधन करताना आचार्य दायमा म्हणाले की, मनुष्याने आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवणे जरुरी आहे. जीवनात पाणी व वाणीचा सदुपयोग करावा, असे सांगतानाच भागवत कथा श्रवण केल्याने काम क्रोध अहंकार नष्ट होत असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक श्री ओंकारेश्वर धाम येथे आयोजित श्रीमद भागवत सप्ताहाचे मुख्य यजमान ज्योती चरखा, पप्पूभाऊ चरखा असून त्यांनी सर्वप्रथम आचार्य दायमा यांचे पूजन केले. यावेळी पुढे दायमा म्हणाले की, आज ठिकठिकाणी भागवत सप्ताह आयोजित केल्या जात आहे. मात्र मनुष्याला मानसिक शांती मिळत नाही. याचे कारण मनुष्य हा भागवत कथा ऐकतो मात्र त्याचे चिंतन मनन अनुसरण करत नाही. आईवडिलांची सेवा केल्याने ईश्वराची प्राप्ती होते. मनुष्य प्राप्तीसाठी संयम, सदाचार, सेवा व स्नेह हे चार गुण अंगी आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

------

दरदिवशी १२ ते ५ दरम्यान कथा वाचन

श्रीमत भागवत कथा दररोज दुपारी बारा ते पाच वाजताच्या दरम्यान होत आहे. शासकीय नियमाचे पालन करीत भागवत कथा यू ट्यूब व फेसबुकवर लाईव्ह दाखविण्यात येत आहे. भाविक भक्तांनी कोरोना नियमाचे पालन करून कथा श्रवण करण्याचे आवाहन चरखा परिवार व आनंद दायमा, सत्यनारायण अग्रवाल, कचरूलाल भांगडिया, नीलेश सोमानी आदींनी केले आहे.