वाशिम: जिल्ह्यात तब्बल २२९ पोलीस पाटलांची पदे रिक्त असून, एकाच पोलीस पाटलांवर दोन ते तीन गावांचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे पोलीस पाटीलच नव्हे, तर ग्रामस्थांनाही कमालीचा अडचणी येत असून, कायदा-सुव्ववस्था विस्कळीत होत आहे.
महसूल आणि पोलीस यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणून पोलीस पाटील गाव पातळीवर काम करीत असतात. जिल्हा आणि पोलीस विभागाला वेळोवेळी गावातील घटना, घडामोडींची माहिती देण्याचे काम पोलीस पाटील करीत असतात मात्र, रिक्त जागा भरण्याचा शासन आणि गृह विभागाला चार वर्षांपासून मुहूर्त सापडत नाही. वाशिम जिल्ह्यात एकूण ६६३ पोलीस पाटलांची पदे मंजूर आहेत. यापैकी ४३४ पदे भरली; तर २२९ पदे रिक्त आहेत. ही रिक्त पदे चार वर्षांपासून भरण्यात आली नसल्याने सध्या एकाच पोलीस पाटलांकडे तीन ते चार गावांचा कारभार आहे. यामुळे त्यांची चांगली तारांबळ उडत आहे. पोलीस पाटलांची सर्वाधिक पदे ही वाशिम उपविभागात रिक्त आहेत.
००००००००००००
बॉक्स:
तुटपुंज्या मानधनावर बोळवण
ग्रामीण भागात गावातील तंटे गावातच सोडवून शांतता आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची पोलीस पाटलांची मोलाची भूमिका असते. मात्र, अवघ्या ६५०० रुपये देऊन तुटपुंज्या मानधनावर सरकार पोलीस पाटलांची बोळवण करीत आहे.
००००००००००००
बॉक्स:
सेवानिवृत्तीमुळे रिक्त पदांचा आलेख चढताच
जिल्ह्यात २०१५-१६ मध्ये पोलीस पाटील पदभरतीतून अनेक रिक्त पदांची समस्या निकाली लागली होती. आता सेवानिवृत्तीमुळे पदे रिक्त होत असताना पद भरती बंद असल्याने रिक्त पदांचा आलेख चढताच आहे.
०००००००००००००००००
चार महिन्यांपासून मानधनही नाही
पोलीस पाटलांची २२९ पदे रिक्त असल्याने या गावांचा अतिरिक्त प्रभार इतर पोलीस पाटलांना देण्याचे काम प्रशासनाकडून करण्यात आले, परंतु हे काम करीत असताना त्यांना आवश्यक असलेले मानधन मात्र वेळेत देण्याची तसदी घेण्यात आली नसून, जिल्हाभरातील पोलीस पाटलांचे मे, जून, जुलै, ऑगस्ट या चार महिन्यांचे मानधन रखडले आहे.
०००००००००००००००००