शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करा - स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2018 19:30 IST

मालेगाव : नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. 

ठळक मुद्देस्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तहसिलदारांना निवेदन 

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू नसल्याने शेतक-यांची आर्थिक लूट सुरू आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष  दामोदर इंगोले यांनी सोमवारी केली. यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन दिले. नाफेडद्वारा तुर खरेदीसाठी आॅनलाईन प्रक्रिया दोन महिन्यापासून सुरू करूनही अद्यापही कुठल्याच प्रकारे तुर खरेदी नाफेडद्वारा सुरू करण्यात आली नाही. यामुळे शेतक-यांवर अस्मानी व सुलतानी संकटाचा सामना करीत शेती पिकवावी लागते. नाफेड केंद्र सुरू नसल्याने शेतकरी कमी  भावात तूर विक्री करीत आहे. घरामध्ये तुरीचे पीक येऊन पडले की बाजारभाव कोलमडतात, याचा प्रत्यय शेतक-यांना येत आहे. नाफेड तूर खरेदी केंद्र सुरू न झाल्यास स्वाभीमानी शेतकरी संघटनेतर्फे आक्रमक आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला. या निवेदनाची प्रत जिल्हाधिका-यांना सुद्धा पाठविण्यात आली.नाफेड तूर खरेदी कधी सुरु होणार याकडे सर्व  तालुक्यातील शेतक-यांचे लक्ष लागून आहे. ही खरेदी दोन दिवसांत  नाफेडद्वारा न झाल्यास स्वाभिमानी संघटना आंदोलन करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष दामोदर इंगोले यांनी सांगितले. यावेळी जिल्हा संघटक ओमप्रकाश गायकवाड़, जिल्हा सचिव राजुभाऊ गायकवाड़, शहराध्यक्ष अजय इंगोले आदींची उपस्थिती होती.

टॅग्स :Swabimani Shetkari Sanghatnaस्वाभिमानी शेतकरी संघटनाwashimवाशिम