शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

सूट असतानाही जमीन महसुलाची वसुली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2020 15:46 IST

रिसोड तालुक्यासह अन्यत्र काही ठिकाणी तलाठ्यांतर्फे सन २०१९-२० या वर्षात जमिन महसुलाची वसुली केली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात २०१९ च्या आॅक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात 'क्यार' व 'महा' या चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील शेतपिके व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे जिल्ह्यातील ७९३ गावांतील शेतकऱ्यांना जमीन महसुलात सूट देणे व परीक्षा शुल्क माफी या दोन सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिलेले आहेत. तथापि, रिसोड तालुक्यासह अन्यत्र काही ठिकाणी तलाठ्यांतर्फे सन २०१९-२० या वर्षात जमिन महसुलाची वसुली केली जात आहे.अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील २ लाख ५० हजार ३५० शेतकऱ्यांच्या एकूण २ लाख ८७ हजार १६५ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले. या नुकसानापोटी शेतकºयांना १९७ कोटी ९८ लाख ३९ हजार ८६२ रुपयांच्या निधीच्या मागणीचा अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला होता. पहिल्या व दुसºया टप्प्यातील निधी मिळालेला आहे. दरम्यान, जिल्ह्यातील ७९३ गावांतील नुकसानग्रस्त शेतकºयांना दिलासा म्हणून जमीन महसुलात सूट आणि शेतपिकांचे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या पाल्यांना शाळा व महाविद्यालयीन परीक्षा शुल्कात माफी या दोन सवलती लागू करण्यात आल्या आहेत. वाशिम तालुक्यातील १३१, मालेगाव तालुक्यातील १२२, रिसोड तालुक्यातील १००, मंगरुळपीर तालुक्यातील १३७, कारंजा तालुक्यातील १६७ व मानोरा तालुक्यातील १३६ गावांचा यामध्ये समावेश आहे. जमिन महसूलात सूट असताना, रिसोड तालुक्यासह जिल्हयात अनेक ठिकाणी शेतकºयांकडून जमिन महसूल वसूल केला जात आहे. या प्रकारामुळे शेतकºयांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.  

 

सवलत लागू झाल्याने जमिन महसूल वसुल करता येत नाही. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन संबंधितांना योग्य ते निर्देश दिले जातील. शेतकºयांवर अन्याय होणार नाही.- शैलेश हिंगेनिवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभाग