शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘लालपरी’ला लागले तांत्रिक बिघाडाचे ग्रहण!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 14:52 IST

वाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसगाड्यांना तांत्रिक बिघाडाचे जणू ग्रहणच लागले आहे. या बसगाड्या वारंवार प्रवासादरम्यान मार्गावरच बंद पडत आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत असून, बसफेरी सोडण्यापूर्वी तपासणी होत नसल्याने हे प्रकार घडत असल्याचे स्पष्ट होत आहे. रविवारीही मंगरुळपीर आगाराची मंगरुळपीर-शिर्डी ही बस १२ किलोमीटर धावल्यानंतर रस्त्यातच बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना अमरावती-बार्शी या बसमध्ये वाशिमपर्यंत जावे लागले.वाशिम जिल्ह्यात वाशिम, मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड, हे चार आगार आहेत. या चारही आगारात मिळून दरदिवशी शेकडो बस विविध ठिकाणी धावत असतात; परंतु यातील अनेक बसगाड्यांची अवस्था गंभीर आहे. त्यामुळे या बसगाड्या आगारातून निघाल्यानंतर मार्गावर मध्येच बंद पडतात. जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांत १५ पेक्षा अधिक वेळा बसगाड्या मार्गावर बंद पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे प्रवाशांना रस्त्यावर ताटकळत बसावे लागले. रविवारीही मंगरुळपीर आगाराची एमएच=४०, वाय-५६१२ क्रमांकाची मंगरुळपीर-शिर्डी ही बस आगारातून वाशिमकडे निघाली. तथापि, धानोरा खु. येथून थोडी पुढे आल्यानंतर अचानक तांत्रिक बिघाडामुळे बंद पडली. त्यामुळे प्रवाशांना खाली उतरावे लागले. सुदैवाने १० मिनिटांतच अमरावती आगाराची अमरावती-बार्शी ही बस तेथे आल्यानंतर प्रवाशांना त्यात बसून वाशिमकडे येणे शक्य झाले.

प्रवाशांसह एसटीच्या आर्थिक हानीची जबाबदारी कोणाची ?राज्य परिवहन महामंडळाच्या बसफेऱ्या मार्गावर बंद पडत असल्याने महत्त्वाचे शासकीय कामकाज, परिक्षेसाठी जाणाऱ्यांचे नुकसान होण्याची भिती असते, तसेच उपचारासाठी जाणाºया रुग्णाचा जीवही धोक्यात येण्याची शक्यता असते. त्याशिवाय बसफेरी बंद पडल्याने संबंधित आगाराचे आणि पर्यायाने एसटीचे आर्थिक नुकसानही होते. या सर्व गंभीरबाबींची दखल घेतली जात नाही. त्यामुळे या हानीची जबाबदारी कोणाची हा प्रश्न येथे उपस्थित होत आहे.

आमच्या आगारात ५५ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. तथापि, गिअर बॉक्समधील बिघाड किंवा इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- विनोद ईलामेआगार व्यवस्थापक,वाशिम

आमच्या आगारात ४६ बसगाड्या आहेत. सर्व गाड्यांची स्थिती चांगली असून, या बस सोडण्यापूर्वी आगारात तपासणी होेते. रस्त्यांची अवस्था वाईट असल्याने गाड्यांत बिघाडोत आहेत. त्याशिवाय इतर आकस्मिक तांत्रिक कारणांमुळे मार्गावर बस बंद पडू शकतात.- अकिल मिर्झाआगार व्यवस्थापक, मंगरुळपीर

टॅग्स :washimवाशिमstate transportएसटी