शहरं
Join us  
Trending Stories
1
"विधानभवनात आमदारांचे खून पडले तरी...", राज ठाकरे भडकले, महाराष्ट्रातील जनतेला संतप्त सवाल
2
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटू आपटू मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
3
Mumbai: मालवणी परिसरातून अपहरण झालेल्या तीन मुलींची सुखरूप सुटका
4
५ वर्षांनंतर पाकिस्तानला यूके उड्डाणाची मुभा मिळाली! पण 'बनावट पायलट' घोटाळ्याचा शिक्का अजूनही कायम?
5
६ महिन्यांपूर्वी लग्न मोडलं, मुलीने दुसरीकडे स्थळ बघायला सुरुवात केली; रागाने तरुण ऑफिसमध्ये पोहोचला अन्...
6
Mumbai Chawl Collapsed: वांद्र्यात तीन मजली चाळ कोसळली, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकले, बचावकार्य सुरू
7
Share Market Today: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; 'या' शेअर्समध्ये दिसली मोठी घसरण
8
'शोले'मधील गब्बरचा अड्डा आहे या ठिकाणी, शूटिंगसाठी निर्मात्यांनी बनवलेला रस्ता, आता बनलंय पर्यटन स्थळ
9
१८ जुलै ते ११ ऑगस्ट बुधाचे वक्री भ्रमण; डोक्याचा ताप वाढणार, सगळ्या राशींनी घ्या 'ही' काळजी!
10
Ola-Uber Strike: "संप मागे घ्या नाही तर...; बंदूक दाखवून कॅब चालकांना धमकावले, व्हिडीओ व्हायरल!
11
दूध गरम करताना सिलेंडर फुटला, २० घरांची राखरांगोळी; महिलेचा होरपळून मृत्यू
12
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
13
तुमची मुलगी बनेल लखपती; महिन्याला वाचवा १००० रुपये, २१ व्या वर्षी मिळतील ₹५.५ लाख
14
Padalkar Awhad: विधान भवनात देशमुखांना मारहाण, पडळकरांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले कोण?
15
पहलगाम हल्ल्यानंतर अमेरिकेने ‘TRF’बद्दल घेतला मोठा निर्णय; पाकिस्तानच्या कुरापतींना चाप बसणार!
16
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
17
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
18
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
19
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
20
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ

वृक्षांवर चालणार ‘कुऱ्हाड’!

By admin | Updated: April 14, 2017 20:42 IST

वाशिम- नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणी व आखणीमुळे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत.

रस्ता रुंदीकरण व सौदर्यीकरण : वृक्ष कायम ठेवण्यासाठी संघटनांचा पुढाकारनंदकिशोर नारे - वाशिमशहर सौदर्यीकरण, रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली वाशिम शहरातील काही झाडांवर ‘कुऱ्हाड’ चालणार आहे. १३ एप्रिल रोजी नगरपरिषद प्रशासनाच्यावतीने करण्यात आलेल्या पाहणी व आखणीमुळे, रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या वृक्षांची कत्तल रोखण्यासाठी शहरातील विविध संघटना सरसावल्या आहेत. शहराचे सौंदर्यीकरण व भरभरून विकास ही बाब प्रत्येकाच्या मनाला पटणारी आहे. मात्र, अनेक वर्षांपासून उभी असलेली झाले कापून तो शहराचा विकास होत असेल, तर तो न झालेला बरा असा पवित्रा ‘ऋणानुबंध’ बहुउदेशिय संस्थेद्वारा संचालित ‘वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना’ व ‘मानद वन्यजिव रक्षक समिती’ने घेतला असून, जिल्हाधिकाऱ्यांना भेटून ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’ला दिली. गत दोन वर्षांपूर्वी आंबेडकर चौक ते नगरपरिषद चौक दरम्यान करण्यात आलेल्या रस्तारूंदीकरणादरम्यान ४0 ते ५0 वृक्षांची कत्तल करण्यात आली. त्यानंतर या मार्गाच्या कडेला वृक्षारोपण होणे अपेक्षित होते, मात्र तसे झाले नाही. हे उदाहरण समोर असताना, आता आंबेडकर चौक ते सिव्हिल लाईन मार्गावरील वृक्षांवर ‘कुऱ्हाड’ चालविली जाणार आहे. एकीकडे शासनद्वारे कोटयवधी झाडे लावण्याचा उपक्रम राबविला जातो, तर दुसरीकडे शहर विकास आणि सौंदर्यीकरणाच्या नावाखाली वृक्ष तोड केली जात आहे. अनेक वर्षांपासून वाशिमकरांना छाया देणाऱ्या वृक्षांचा शहर विकासादरम्यान बळी जाऊ नये यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून, ही बाब त्यांच्या लक्षात आणून देणार असल्याची माहिती वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटनेचे सचिव प्रविण जोशी व मानद वन्यजिव रक्षकचे प्रशांत जोशी यांनी ‘लोकमत’ला दिली. यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी वाशिम नगरपरिषद नगरअभियंता विजय घुगरे (श्रेणी क) यांच्याशी संपर्क साधला असता, रस्ता रूंदीकरणादरम्यान या मार्गावरील केवळ वाहतुकीला अथडळा निर्माण करणारी झाडेच काढली जाणार असून, अन्य झाडे कायम ठेवली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या मार्गाच्या दुतर्फा अनेक झाडे जिर्ण झाली असून, ती केव्हाही कोसळून अपघात घडण्याची शक्यता असल्याने या मार्गावरील किमान २५ झाडे कमी करण्यात येणार असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरणाच्या नावाखाली अनेक वर्षांपासून असलेले झाडे तुटणार असल्याने ते पुन्हा उभे करण्यास खूप कालावधी लागणार आहे. ते तुटू नये याकरिता आपण जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करणार आहे.- प्रविण जोशी, सचिव, वसुंधरा वृक्षसंवर्धन संघटना, वाशिमवृक्षतोडीमुळे पशुपक्ष्यांचे घर उध्दवस्त होणार आहेत. शहरातील झाडे तुटू नये यासाठी संबधितांनी प्रयत्न करुन रस्ता रुंदीकरण, सौदर्यीकरण करावे. शासन एकीकडे कोटयवधी रुपये खर्च करुन वृक्षारोपण कार्यक्रम राबवित असतांना दुसरीकडे वृक्ष तोड करणे योग्य नाही. यावर फेरविचार होणे गरजेचे आहे.- प्रशांत जोशी, मानद वन्यजिव रक्षक, वाशिम.रस्त्याच्या मधोमध किंवा वाहतुकीच्या जागेत येणारी झाडेच काढावे लागणार आहेत. जवळपास असे २५ झाडांचा समावेश आहे. रस्ता रुंदीकरणासोबतच नवीन वृक्ष लागवड सुध्दा केल्या जाणार आहे. कोणतेही झाड नाहक कापलय जाणार नाही. - विजय घुगरे, नगर अभियंता (श्रेणी ‘क’), वाशिम नगरपरिषद, वाशिम