शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
3
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
4
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
5
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
6
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
7
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
8
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
10
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
11
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
12
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
13
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
14
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
16
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
17
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
18
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
19
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
20
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!

राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:58 IST

वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले असून शासनाच्या मूळ उद्देशाला तडे गेल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात वाशिमवनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्या जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतीक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे. चालू खरीप हंगामात या अतिक्रमीत जमिनीवर खरीपातील पिकांची पेरणी झाल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्याकरिता महसूल विभाग व वनविभागाकडून काहीअंशी प्रयत्न देखील झाले; मात्र ते पूर्णत: निष्फळ ठरले आहेत. राखीव वनक्षेत्रावर वनविभागाचाच हक्क!वन संरक्षण कायद्यातील कलम २० नुसार राखीव वन क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रावर केवळ वनविभागाचाच हक्क राहत असून त्या जमिनीवर अन्य कुणाचेही कुठलेच अधिकार राहत नाहीत. असे असताना जिल्ह्यात काही लोकांनी वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करित तब्बल ४७९४.१४ हेक्टर राखीव वन क्षेत्रात अतीक्रमण केले आहे.

पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे; मात्र वैयक्तीक फायद्यासाठी काही लोकांनी राखीव वन क्षेत्रात अतिक्रमण करून शेती वहितीखाली आणली आहे. अशा संबंधित अतिक्रमणधारकांना व त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरूद्ध लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.- सुमंत सोळंकेउपवनसंरक्षक, वाशिम वनविभाग

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग