शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
3
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
4
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
5
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
6
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
7
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
8
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
9
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
10
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
11
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
12
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
13
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
14
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
15
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
16
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
17
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
18
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
19
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
20
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 

राखीव वनक्षेत्रातील जमिनीवर खरीपाची पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2019 16:58 IST

वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सहाही तालुक्यांमध्ये शासनाच्या अधिसूचनेनुसार वनक्षेत्र म्हणून घोषित झालेल्या ४७९४.१४ हेक्टर जमीनीवर काही लोकांनी अतीक्रमण केले असून अनेकांनी चालू हंगामातही खरीपाच्या पिकांची त्यावर पेरणी केली आहे. हे अतीक्रमण हटविण्याकामी झालेले प्रशासकीय प्रयत्न पूर्णत: निष्फळ ठरले असून शासनाच्या मूळ उद्देशाला तडे गेल्याचे दिसून येत आहे.जिल्ह्यात वाशिमवनविभागांतर्गत वाशिम, कारंजा, मानोरा आणि मालेगाव असे चार वनपरिक्षेत्र असून ४१ हजार ९७१.६६ हेक्टर जमिनीवर वनक्षेत्राचा विस्तार झालेला आहे. दरम्यान, शासनस्तरावरून राबविण्यात येणाऱ्या मोहिमेंतर्गत मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड व्हावी, या उद्देशाने राखीव वनक्षेत्र घोषित करण्याच्या अधिसूचनेनुसार महसूल विभागाकडून ४७९४.१४ हेक्टर ई-क्लास जमीन वनविभागाच्या ताब्यात देण्यात आली. त्या जमिनीवर संबंधित त्या-त्या गावातील तसेच आसपासच्या काही लोकांनी अतीक्रमण करून जमीन वहितीखाली आणली आहे. चालू खरीप हंगामात या अतिक्रमीत जमिनीवर खरीपातील पिकांची पेरणी झाल्याचेही दिसून येत आहे. दरम्यान, हे अतिक्रमण हटविण्याकरिता महसूल विभाग व वनविभागाकडून काहीअंशी प्रयत्न देखील झाले; मात्र ते पूर्णत: निष्फळ ठरले आहेत. राखीव वनक्षेत्रावर वनविभागाचाच हक्क!वन संरक्षण कायद्यातील कलम २० नुसार राखीव वन क्षेत्र घोषित झालेल्या क्षेत्रावर केवळ वनविभागाचाच हक्क राहत असून त्या जमिनीवर अन्य कुणाचेही कुठलेच अधिकार राहत नाहीत. असे असताना जिल्ह्यात काही लोकांनी वन संरक्षण कायद्याची पायमल्ली करित तब्बल ४७९४.१४ हेक्टर राखीव वन क्षेत्रात अतीक्रमण केले आहे.

पर्यावरणाचे संतुलन कायम राखण्यासाठी वनक्षेत्रात वाढ होणे आवश्यक आहे; मात्र वैयक्तीक फायद्यासाठी काही लोकांनी राखीव वन क्षेत्रात अतिक्रमण करून शेती वहितीखाली आणली आहे. अशा संबंधित अतिक्रमणधारकांना व त्यांना सहकार्य करणाऱ्यांविरूद्ध लवकरच कारवाईची मोहीम हाती घेतली जाणार आहे.- सुमंत सोळंकेउपवनसंरक्षक, वाशिम वनविभाग

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग