शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

खरीप हंगामाची सुधारित पैसेवारी आली ४७ पैसे; जिल्ह्यातील ७९३ गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी

By दिनेश पठाडे | Updated: October 31, 2022 13:46 IST

सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज ५४ पैसेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता.

वाशिम : सन २०२२-२३ मधील खरीप पिकांची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन.एस यांनी सोमवारी जाहीर केली. त्यानुसार जिल्ह्यातील सहाही तालुक्यांची पैसेवारी ५० पेक्षा कमी आहे.  जिल्ह्याची एकूण पैसेवारी ४७ पैसे इतकी निघाली आहे. 

सततच्या पावसाने शेती पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असताना देखील नजर अंदाज ५४ पैसेवारी जाहीर केल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड रोष होता. त्यामुळे सुधारित पैसेवारीकडे शेतकऱ्यांच्या नजरा लागल्या होत्या. अखेर सुधारित पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतातील पीक परिस्थितीचा अभ्यास करण्यासाठी महसूल विभागाची यंत्रणा पैसेवारी जाहीर करते. यावरून पीक परिस्थितीचा अंदाज येतो. यासोबत रॅण्डमली पीक कापणी प्रयोग होतात. त्यावरून उत्पन्नाचा अंदाज येतो. 

सुधारित पैसेवारीच्या अहवालानुसार जिल्ह्यात ३ लाख १५ हजार २८० हेक्टर क्षेत्र पिकाखालील आहे. यातील प्रमुख पिकांची ३१ आॅक्टोबर रोजी सर्व तालुक्याचे तहसीलदार यांचे कडून प्राप्त प्रस्तावानुसार जिल्ह्यातील ७९३ महसुली गावाची सुधारित पैसेवारी जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी जाहीर केली आहे. यासर्व गावांची पैसेवारी ५० पेक्षा कमी निघाली आहे. जिल्ह्यात वेळोवेळी झालेल्या झालेल्या अतिवृष्टीमुळे खरिपातील मुख्य पीक असलेल्या सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे पीक उत्पादनात कमालीची घट झाल्याचे पहावयास मिळत आहे.

अशी आहे तालुकानिहाय पैसेवारीतालुका--पैसेवारीवाशिम--४७मालेगाव--४८रिसोड--४६मंगरुळपीर--४७कारंजा--४७मानोरा--४७

टॅग्स :washimवाशिम