शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

खरीप हंगामातील पिकांची वाढ समाधानकारक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2018 17:06 IST

वाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे.

ठळक मुद्देपाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या पावसाळ्यात सुरूवातीपासूनच वेळेवर पाऊस होत असल्याने पाणीटंचाई पूर्णत: निकाली निघण्यासोबतच खरीप हंगामातील पिकांची वाढ देखील अपेक्षित प्रमाणात होत आहे. खरीपासाठी पोषक वातावरण असल्याने किमान यंदातरी भरघोस उत्पादन हाती येईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना लागून आहे.गतवर्षी पर्जन्यमान घटल्याने जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांना खरीप हंगामापासून विशेष उत्पन्न घेता आले नाही. सोबतच २०१७ च्या रब्बी हंगामात उद्भवलेल्या विविध स्वरूपातील अडथळ्यांमुळे शेतकरी पुरते हतबल झाले. यंदा मात्र सुरूवातीपासूनच पिकांच्या वाढीसाठी पोषक वातावरण निर्माण झालेले असून पाऊसही अधूनमधून अपेक्षित प्रमाणात हजेरी लावत असल्याने पिकांची वाढ समाधानकारक होत आहे. त्यामुळे भरघोस पीक हाती येईल, अशी आशा शेतकऱ्यांना लागून आहे.  कृषी सेवा केंद्रांवर वाढली गर्दी!पिकांना गरजेपुरता तथा वेळेवर पाऊस होत असल्याने खरीपातील पिकांची वाढ अपेक्षित प्रमाणात होत आहे. यासोबतच पिकांमध्ये तन देखील मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याचा नाश करण्यासाठी शेतकऱ्यांकडून रासायनिक औषध फवारणीचे काम सुरू झाले आहे. सदर औषधी खरेदी करण्यासाठी कृषी सेवा केंद्रांवर गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती