शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

कारखेडा गाव झाले चुलमुक्त!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2020 16:14 IST

गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे.

- बबन देशमुखलोकमत न्यूज नेटवर्क मानोरा : महिलांची चुलीच्या धुरापासून मुक्तता करण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री उज्वला योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत सिलिंडर गॅस शेगडी पुरविण्यात आली. कारखेडा येथील जवळपास ४५० महिलांना या योजनेचा लाभ मिळाल्याने आणि स्वखर्चातून सिलिंडर रिफिलिंग नियमित सुरू असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त, धुरमुक्त झाले आहे. महिला, गावकऱ्यांच्या एकजूटीतून कारखेडा गावाने इतरांसमोर आदर्श निर्माण केला.चुलीच्या धुरापासून महिलांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते. धूर हा डोळ्यात जात असल्याने डोळ्याशी संबंधित आजारही जडतात. श्वास घेण्यास त्रासही जाणवते. चुलीच्या धुरापासून गोरगरीब महिलांची मुक्तता करण्यासाठी केंद्र सरकारने सन २०१८-१९ मध्ये पंतप्रधान उज्वला योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत पात्र महिलांना मोफत गॅस सिलिंडर, शेगडी पुरविण्यात येते. ६०० कुटुंबसंख्या आणि अडीच हजाराच्या आसपास लोकसंख्या असलेल्या कारखेडा येथेही उज्वला योजना राबविण्यात आली. या योजनेपूर्वी गावातील जवळपास १५० कुटुंबाकडे गॅस  सिलिंडर होते. या योजनेंतर्गत सन २०१८-१९ मध्ये ४५० च्या आसपास महिलांना गॅस सिलिंडरचा लाभ मिळाला. सिलिंडर रिफिलिंगकरीता शासनाकडून कोणतेही अनुदान मिळत नाही. तथापि, चुलीच्या धुरापासून होणारे दुष्परिणाम लक्षात घेता या योजनेंतर्गतच्या महिला लाभार्थी या स्वखर्चातून रिफिलिंग करतात. कारखेडा येथे दर आठवड्यातून एक दिवस पोहरादेवी येथून गॅस सिलिंडर रिफिलिंगसाठी एक वाहन येते. त्यामुळे महिला लाभार्थींना तालुक्याच्या ठिकाणी जाण्याची गरज भासत नाही. गॅस सिलिंडरचा नियमित वापर होत असल्याने कारखेडा गाव चुलमुक्त झाले आहे. चुलमुक्तीसाठी अनेकांचे सहकार्य लाभले आहे. तत्कालिन जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, तहसिलदार डॉ. सुनील चव्हाण, संजय महाराज, मनिष महाराज यांच्यासह अनेकांचे सहकार्य लाभले. गावात चुलमुक्त कार्यक्रम घेऊन महिलांचा सत्कारही केला होता.

टॅग्स :washimवाशिमgovernment schemeसरकारी योजना