शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:50 IST

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

प्रशासनाची उदासिनता : सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गटागटाने शेती करणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादित केले जात आहे. मात्र, त्यास जोपर्यंत पुरेसे ग्राहक मिळत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नाही. ही बाब लक्षात घेवून मध्यंतरी ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला, विषमुक्त अन्नधान्य विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांकडून मागणी नोंदवून वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्य शेतमालाचे उत्पादन घेण्यास इच्छुक २८ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून सुमारे १२०० शेतकरी त्यांच्या ५६० हेक्टर शेतीवर सेंद्रिय भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी सज्ज आहेत. सावरगाव जिरे, काजळांबा, खरोळा, डही यासारख्या काही गावांमधील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतमालाचे उत्पन्न काढले जात आहे. मात्र,  तुलनेने अधिक खर्च लागत असलेल्या सेंद्रिय शेतीतून उत्पादित शेतमाल विक्रीसाठी संबंधित शेतकºयांना अद्यापपर्यंत वाशिम जिल्ह्यात कुठेच हक्काची बाजारपेठ अथवा पुरेसे ग्राहक मिळालेले नाहीत. त्यानुषंगाने ‘आत्मा’च्या वतीने शेतकरी व ग्राहकांचा थेट संपर्क करून देत वाजवी दरात सेंद्रिय शेतमाल विक्रीची बाजारपेठ उभारण्यासाठी तद्वतच सेंद्रिय शेतमाल खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांची यादी तयार करण्यात आली. त्यास नागरिकांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, आॅनलाईन नोंदणी केलेल्या एकाही ग्राहकास सेंद्रिय शेतमाल विकत घेण्यासंबंधी कुणीच संपर्क साधत नसून इच्छूक ग्राहकांसाठी सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दाही सद्या थंडबस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमvegetableभाज्याagricultureशेती