शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दा थंडबस्त्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 17:50 IST

वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.

प्रशासनाची उदासिनता : सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गटागटाने शेती करणाºया जिल्ह्यातील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादित केले जात आहे. मात्र, त्यास जोपर्यंत पुरेसे ग्राहक मिळत नाहीत, तोपर्यंत विशेष फायदा होणार नाही. ही बाब लक्षात घेवून मध्यंतरी ‘आत्मा’ यंत्रणेच्या माध्यमातून सेंद्रीय भाजीपाला, विषमुक्त अन्नधान्य विक्रीसाठी इच्छुक ग्राहकांकडून मागणी नोंदवून वाशिममध्ये सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याची हालचाल सुरू झाली होती. मात्र, सद्या प्रशासनाच्या उदासिनतेमुळे तो मुद्दा थंडबस्त्यात असून सेंद्रिय शेतमाल उत्पादक शेतकरी संभ्रमात सापडले आहेत.जिल्ह्यात सेंद्रिय पद्धतीने भाजीपाला आणि अन्य शेतमालाचे उत्पादन घेण्यास इच्छुक २८ शेतकरी गट तयार करण्यात आले आहेत. यामाध्यमातून सुमारे १२०० शेतकरी त्यांच्या ५६० हेक्टर शेतीवर सेंद्रिय भाजीपाला व विषमुक्त अन्नधान्य उत्पादनासाठी सज्ज आहेत. सावरगाव जिरे, काजळांबा, खरोळा, डही यासारख्या काही गावांमधील शेतकºयांकडून मोठ्या प्रमाणात सेंद्रिय शेतमालाचे उत्पन्न काढले जात आहे. मात्र,  तुलनेने अधिक खर्च लागत असलेल्या सेंद्रिय शेतीतून उत्पादित शेतमाल विक्रीसाठी संबंधित शेतकºयांना अद्यापपर्यंत वाशिम जिल्ह्यात कुठेच हक्काची बाजारपेठ अथवा पुरेसे ग्राहक मिळालेले नाहीत. त्यानुषंगाने ‘आत्मा’च्या वतीने शेतकरी व ग्राहकांचा थेट संपर्क करून देत वाजवी दरात सेंद्रिय शेतमाल विक्रीची बाजारपेठ उभारण्यासाठी तद्वतच सेंद्रिय शेतमाल खरेदी करू इच्छिणाºया ग्राहकांची यादी तयार करण्यात आली. त्यास नागरिकांमधूनही उत्तम प्रतिसाद मिळाला. मात्र, आॅनलाईन नोंदणी केलेल्या एकाही ग्राहकास सेंद्रिय शेतमाल विकत घेण्यासंबंधी कुणीच संपर्क साधत नसून इच्छूक ग्राहकांसाठी सेंद्रिय शेतमाल बाजारपेठ उभारण्याचा मुद्दाही सद्या थंडबस्त्यात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमvegetableभाज्याagricultureशेती