शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:00 IST

नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.

वाशिम : राज्यात २० व्या पशूगणनेचे काम आधीच विलंबाने हाती घेण्यात आले. त्यातच विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात जवळपास एक वर्ष निघून गेले. आता राज्यातील जिल्हानिहाय नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.राज्यात दुध देणारी तसेच भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये होणे आवश्यक होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशूगणना पूर्ण करण्यास तब्बल ११ महिने लागले. दरम्यान, प्रगणकांनी गोळा केलेली सर्व माहिती वरिष्ठांकडे सादर केली असून त्याआधारे राज्यभरातील सर्व प्रकारच्या जनावरांची अद्ययावत माहिती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती आणि पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आहे. शासनस्तरावरूनच आता पशुधनाचा नेमका आकडा जाहीर होईल.- गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम