शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
3
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
4
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
5
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
6
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
7
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
8
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
9
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
10
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
11
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
12
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
13
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
14
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
15
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
16
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
17
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
18
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
20
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस

पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:00 IST

नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.

वाशिम : राज्यात २० व्या पशूगणनेचे काम आधीच विलंबाने हाती घेण्यात आले. त्यातच विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात जवळपास एक वर्ष निघून गेले. आता राज्यातील जिल्हानिहाय नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.राज्यात दुध देणारी तसेच भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये होणे आवश्यक होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशूगणना पूर्ण करण्यास तब्बल ११ महिने लागले. दरम्यान, प्रगणकांनी गोळा केलेली सर्व माहिती वरिष्ठांकडे सादर केली असून त्याआधारे राज्यभरातील सर्व प्रकारच्या जनावरांची अद्ययावत माहिती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती आणि पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आहे. शासनस्तरावरूनच आता पशुधनाचा नेमका आकडा जाहीर होईल.- गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम