शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:00 IST

नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.

वाशिम : राज्यात २० व्या पशूगणनेचे काम आधीच विलंबाने हाती घेण्यात आले. त्यातच विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात जवळपास एक वर्ष निघून गेले. आता राज्यातील जिल्हानिहाय नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.राज्यात दुध देणारी तसेच भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये होणे आवश्यक होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशूगणना पूर्ण करण्यास तब्बल ११ महिने लागले. दरम्यान, प्रगणकांनी गोळा केलेली सर्व माहिती वरिष्ठांकडे सादर केली असून त्याआधारे राज्यभरातील सर्व प्रकारच्या जनावरांची अद्ययावत माहिती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती आणि पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आहे. शासनस्तरावरूनच आता पशुधनाचा नेमका आकडा जाहीर होईल.- गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम