शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

पशूगणनेचा प्रश्न अडकला लालफितशाहीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2019 15:00 IST

नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.

वाशिम : राज्यात २० व्या पशूगणनेचे काम आधीच विलंबाने हाती घेण्यात आले. त्यातच विविध स्वरूपातील अडचणींमुळे ही प्रक्रिया पूर्ण करण्यात जवळपास एक वर्ष निघून गेले. आता राज्यातील जिल्हानिहाय नेमकी जनावरे किती, याची अद्ययावत माहिती तयार करण्यातही दिरंगाई केली जात असून हा प्रश्न लालफितशाहीत अडकला आहे.राज्यात दुध देणारी तसेच भाकड जनावरांची संख्या नेमकी किती आहे, कोणत्या वंशाच्या जनावरांचे प्रमाण कमी होत आहे किंवा वाढत आहे, याबाबत जाणून घेऊन त्याआधारे पशुसंवर्धनासाठी योजनांचे नियोजन करता येणे शक्य असते. त्यासाठी दर पाच वर्षांनी पशुगणना करण्यात येते. त्यानुसार, १९ वी पशुगणना २०१२ मध्ये झाली होती. त्यानंतर ती पाच वर्षांनंतर अर्थात २०१७ मध्ये होणे आवश्यक होते; मात्र विविध स्वरूपातील अडचणी व शासकीय उदासिनतेमुळे २० वी पशुगणना जानेवारी २०१९ पासून सुरू करण्यात आली. त्यासाठी राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये ठराविक प्रगणक नेमून त्यांना टॅब पुरविण्यात आले. यामाध्यमातून गोळा होणारी दैनंदिन माहिती साठविण्याकरिता दिल्लीत मुख्य सर्व्हरची व्यवस्था करण्यात आली; परंतु सर्व्हर डाऊन राहणे, दुर्गम भागात इंटरनेटची गती कमी असणे यासह इतर अडचणींमुळे पशूगणना पूर्ण करण्यास तब्बल ११ महिने लागले. दरम्यान, प्रगणकांनी गोळा केलेली सर्व माहिती वरिष्ठांकडे सादर केली असून त्याआधारे राज्यभरातील सर्व प्रकारच्या जनावरांची अद्ययावत माहिती मिळणे क्रमप्राप्त आहे. असे असताना हा तिढा अद्यापपर्यंत सुटलेला नाही. प्रगणकांकडून पशुधनासंबंधी गोळा करण्यात आलेली माहिती आणि पशुधन असलेल्या घरांची पुर्नसर्वेक्षण प्रक्रिया पूर्ण करून तसे अहवाल वरिष्ठांकडे सादर करण्यात आहे. शासनस्तरावरूनच आता पशुधनाचा नेमका आकडा जाहीर होईल.- गणेश पवारपशुधन विकास अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिम