शहरं
Join us  
Trending Stories
1
Big Breaking : ट्रम्प यांनी रशियाचा राग भारतावर काढला! २५% कर लादला; दंडही जाहीर केला
2
कुत्रा चावल्याने बकरीचा मृत्यू झाला, पण नंतर एक आख्ख कुटुंब रुग्णालयात दाखल झालं
3
शिक्षिकेचे सैतानी कृत्य! खराब हस्ताक्षरामुळे विद्यार्थ्याला दिले मेणबत्तीचे चटके, मालाड येथील घटना
4
ठाणे: १८ वर्षाच्या तरुणाने खड्ड्यामुळे गमावला जीव; जीमला निघाला पण रस्त्यातच झाला अपघात
5
बाप्पा पावला! कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी ४४ अतिरिक्त विशेष ट्रेन्सची घोषणा, पाहा वेळापत्रक
6
"२६ लोकांची हत्या झाली, राजीनामा पंडित नेहरू देणार की डोनाल्ड ट्रम्प?", संजय राऊतांचे सरकारवर टीकास्त्र
7
IND vs PAK, WCL 2025 Semi Final : भारतीय खेळाडूंनी पाक विरुद्ध सेमी फायनल खेळण्यासही दिला नकार
8
पृथ्वीला स्कॅन करणार, भूकंप-त्सुनामी होण्यापूर्वीच सांगणार; ISRO चे NISAR सॅटेलाईट लॉन्च
9
सांगलीतून अजून काही प्रवेश होतील का? मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "जो प्रवेश अपेक्षित..."
10
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
11
ताई चांगलं शिकवतात, ओरडत नाही, त्यांची बदली करु नका; तिसरीच्या विद्यार्थ्याचे शरद पवारांना पत्र
12
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
13
Jasprit Bumrah Miss Oval Test : जे आधी ठरलंय तसेच होणार! मग बुमराहची जागा कोण घेणार?
14
प्रा. ममता पाठक यांना जन्मठेपेची शिक्षा, पतीच्या खूनाचा आरोप; तो व्हिडिओ झालेला व्हायरल
15
दहशतवाद्यांनी कुंकूच पुसलं मग ऑपरेशनचं नाव 'सिंदूर' कशासाठी? जया बच्चन यांचा परखड सवाल
16
मालकिणीच्या हाताला झटका देऊन कुत्र्याची समोरून येणाऱ्या महिलेवर झडप, धडकी भरवणारा व्हिडीओ!
17
धुळ्यातील जोडपे कोकणात फिरायला आले अन् चिपळूणमधील वशिष्ठी नदीत मारल्या उड्या
18
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
19
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
20
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!

सिंचन प्रकल्प फायद्याऐवजी ठरतोय अडचणीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 16:38 IST

इंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकºयांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी (वाशिम) : मानोरा तालुक्यातील धानोरा भुसे येथे जि.प. लघू सिंचन विभागाने उभारलेला प्रकल्प शेतकऱ्यांसाठी फायद्याचा ठरण्याऐवजी अडचणीचा ठरत आहे. या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या चार गावांतील २८० हेक्टर क्षेत्रातील एका हेक्टर क्षेत्रात या प्रकल्पावरून पाण्याचा थेंबही मिळत नाही. उलट लाभ क्षेत्रात असल्याने जमिनीच्या खरेदीविक्री मात्र मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याने या क्षेत्रातील शेतकºयांनी लाभ क्षेत्रातून जमीन वगळण्याचीच मागणी केली आहे.जिल्हा परिषदेच्या लघू सिंचन विभागामार्फत गेल्या २० ते २५ वर्षांपूर्वी धानोरा भुसे येथे सिंचन प्रकल्पाची उभारणी केली. या प्रकल्पासाठी काही शेतकºयांची जमीनही अधिग्रहित करण्यात आली प्रकल्पाच्या व्याप्तीनुसार लाभक्षेत्र निश्चित करण्यात आले आणि लाभक्षेत्रातील शेतकºयांना पाणी सोडण्यासाठी लाखो रुपये खर्चून कालव्याची बांधणीही करण्यात आली; परंतु हा प्रकल्प कार्यान्वित झाला तेव्हापासून आजवरही या प्रकल्पाच्या लाभ क्षेत्रात असलेल्या चार गावांतील शेतकºयांच्या २८० हेक्टर क्षेत्राला थेंबभरही पाणी या प्रकल्पातून आजवर मिळाले नाही. शेतकºयांनी त्यांची ही समस्या कित्येकदा प्रशासनापुढे मांडली; परंतु धानोरा भुसे येथील शेतकरी वगळता इंझोरी, दापुरा, जामणी व उंबर्डा (लहान) या चार गावांतील एकाही शेतकºयाची समस्या अद्याप सोडविण्यात आलेली नाही. उलट लाभ क्षेत्रात जमीन असल्याने या शेतकºयांना जमीनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. लाभ क्षेत्रातील जमिनीच्या व्यवहारासाठी लागणाºया मुद्रांकाचे मुल्य दुप्पट असल्याने शेतकºयांना जमिनीचे व्यवहार करणेही कठीण झाले आहे. त्यामुळे एक, तर कालव्यातून सिंचनासाठी पाणी सोडावे किंवा नामधारी असलेले लाभक्षेत्र रद्द करून जमिनी लाभक्षेत्रातून वगळाव्या, अशी मागणीच उपरोक्त चारही गावातील शेतकºयांनी केली आहे.लघू सिंचन विभागाची शुन्य कार्यवाहीगेल्या अनेक वर्षांपासून धानोरा भुसे प्रकल्पांतर्गत येणाºया शेतकºयांची सिंचनासाठी पाणी देण्याची मागणी होत आहे. यासाठी लघू सिंचन विभागाने कालव्याची बांधणीही केली आहे; परंतु अद्याप हा कालवा प्रकल्पातील पाण्याने ओलासुद्धा झाला नाही. त्यामुळे एवढा खर्च केला तरी कशासाठी, हा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत. लघू सिंचन विभागाने आजवर शेतकºयांच्या मागणीची दखलही का घेतली नाही, हा प्रश्नही येथे उपस्थित होत आहे.

टॅग्स :washimवाशिमIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प