शहरं
Join us  
Trending Stories
1
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
2
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
3
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
4
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
5
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
6
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
7
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
8
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
9
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
10
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
11
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
12
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
13
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
14
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
15
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
16
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
17
दहशतवाद सहन करणार नाही..; पहलगाम हल्ल्यावरुन इस्रायलने पाकिस्तानला सुनावले
18
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
19
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
20
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट

 ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 13:51 IST

पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र १२ व १३ डिसेंबरला चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ठराविक २० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी पथक पोहचलेच नसल्याची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने १६ डिसेंबरला प्रकाशित वृत्ताच्या माध्यमातून उघड केली. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या.याशिवाय चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे १७, १८, २०, २१, २६ आणि २७ डिसेंबरला नियोजित सर्व ग्रामपंचायतींमध्ये चौकशीसाठी पथक पोहचले असून आता शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली. या ७ ग्रामपंचायतींमध्ये होणार उद्या चौकशी१२ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणाºया ‘रोहयो’ कामांच्या चौकशी प्रक्रियेदरम्यान ठराविक त्या-त्या तारखेस १० पथकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात आली. आता ३१ डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डव्हा, खिरडा, शिरसाळा, अमानी, झोडगा बु., केळी आणि गिव्हा कुटे या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांची चौकशी होणार आहे.

मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत क्षेत्रात सप्टेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार, १२ डिसेंबरपासून १० पथकांमार्फत चौकशीस सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी पूर्ण झाली असून ३१ डिसेंबरला उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत