शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

 ७९ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’ घोटाळ्याची चौकशी पुर्णत्वास!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2019 13:51 IST

पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : रोजगार हमी योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये अनियमिततता व गैरप्रकार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन कामांची सखोल चौकशी करण्यासाठी विभागीय आयुक्त पियूष सिंह यांच्या आदेशावरून यवतमाळ व बुलडाणा जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या १० विशेष पथकांची नेमणूक करण्यात आली. या पथकांनी २७ डिसेंबरपर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली आहे. ३१ डिसेंबरला शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून १२ डिसेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये ‘रोहयो’अंतर्गत झालेल्या विविध कामांची चौकशी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना करावयाची होती. प्रत्यक्षात मात्र १२ व १३ डिसेंबरला चौकशीच्या पहिल्या टप्प्यात ठराविक २० ग्रामपंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी पथक पोहचलेच नसल्याची वस्तूस्थिती ‘लोकमत’ने १६ डिसेंबरला प्रकाशित वृत्ताच्या माध्यमातून उघड केली. त्याची दखल घेऊन संनियंत्रण अधिकाºयांनी ग्रामस्तरीय अधिकाºयांना चौकशी पथक येतेवेळी हजर राहण्याच्या सूचना दिल्या.याशिवाय चौकशी पथक ठराविक ग्रामपंचायत क्षेत्रात पोहचून चौकशी करते किंवा कसे, यावरही विशेष ‘वॉच’ ठेवण्यात आला. त्यामुळे १७, १८, २०, २१, २६ आणि २७ डिसेंबरला नियोजित सर्व ग्रामपंचायतींमध्ये चौकशीसाठी पथक पोहचले असून आता शेवटच्या टप्प्यात उर्वरित ७ ग्रामपंचायतींची चौकशी केली जाणार असल्याची माहिती सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस.एम. तोटावार यांनी दिली. या ७ ग्रामपंचायतींमध्ये होणार उद्या चौकशी१२ ते ३१ डिसेंबरदरम्यान राबविण्यात येणाºया ‘रोहयो’ कामांच्या चौकशी प्रक्रियेदरम्यान ठराविक त्या-त्या तारखेस १० पथकांकडून वेगवेगळ्या ग्रामपंचायतींची चौकशी करण्यात आली. आता ३१ डिसेंबर रोजी मालेगाव तालुक्यातील डव्हा, खिरडा, शिरसाळा, अमानी, झोडगा बु., केळी आणि गिव्हा कुटे या ग्रामपंचायत क्षेत्रातील कामांची चौकशी होणार आहे.

मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायत क्षेत्रात सप्टेंबर २०१८ ते जून २०१९ या कालावधीत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींची दखल घेऊन विभागीय आयुक्तांनी चौकशीचे निर्देश दिले. त्यानुसार, १२ डिसेंबरपासून १० पथकांमार्फत चौकशीस सुरूवात करण्यात आली आहे. आतापर्यंत ७९ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी पूर्ण झाली असून ३१ डिसेंबरला उर्वरित ७ ग्रामपंचायतींमधील कामांची चौकशी केली जाणार आहे.- एस.एम. तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमgram panchayatग्राम पंचायत