शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

वाशिममध्ये 'स्क्रब टायफस' आजाराचा शिरकाव; आतापर्यंत दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह                                                                                   

By दिनेश पठाडे | Updated: September 6, 2022 16:12 IST

वाशिम जिल्ह्यात स्क्रब टायफस आजाराने शिरकाव केला आहे.

वाशिम : कोविड संसर्गाचे प्रमाण आटोक्यात आले आहे. हे चित्र सुखद असतानाच आता दुर्मिळ आजार असलेल्या स्क्रब टायफसने जिल्ह्यात शिरकाव केल्याने चिंता वाढली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात दोन रुग्णांचे स्क्रब टायफसचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. वाशिम जिल्ह्यात कारंजा शहरातील ४५ वर्षीय व मंगरुळपीर तालुक्यातील ग्रामीण भागातील एका ५० वर्षीय व्यक्ती अशा दोघांना गत महिन्यात स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले होते. एकाचा १७ ऑगस्ट तर दुसऱ्या व्यक्तीचा अहवाल २६ ऑगस्ट रोजी पॉझिटिव्ह आढळून आला. 

या रुग्णांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांना स्क्रब टायफसची लक्षणे असल्याने त्यांचे रक्तजल नमुन्याची खासगी प्रयोगशाळेत पाठविण्यात आली होती. त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. विविध आजाराची लक्षणे असलेल्या १०० जणांचे रक्तजल नमुने घेण्यात आले होते. त्यातील ७५ नमुने डेंग्यू व चिकनगुनिया आजाराच्या निदानासाठीची होते. तर १५ नमुने स्क्रब टायफस आजाराच्या तपासणीसाठी घेण्यात आली होती. १२ जणांना डेंग्यू, ४ जणांना चिकनगुनिया तर २ दोन जणांना स्क्रब टायफस झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हा एक जंतु संसर्ग आजार असून या आजाराचे लक्षणे हे देखील चिकनगुनिया सारखे असतात. हा आजार जलदगतीने वाढणारा आहे. योग्य वेळात आजारावर निदान झाले नाही तर ४० ते ५० टक्के मृत्यूची शक्यता बळावते. त्यामुळे स्क्रब टायफस होऊ नये, यासाठी नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य विभाग व जिल्हा हिवताप कार्यालयाकडून करण्यात आले आहे. 

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी केले आवाहन दरम्यान, उंदीर किंवा जंगलातील दाट गवतावरील एका प्रकारचा कीटक चावल्यावर यातील 'ओरिएंशिया सुसूगामुशी' नावाचा जिवाणू आपल्या शरीरात गेल्यावर हा आजार होतो. हा जिवाणू शरीरात गेल्यावर जवळपास ८ ते १० दिवसांनी ताप येणे, अंगावर पुरळ येणे, डोकेदुखी, अंगदुखी अशी लक्षणे दिसून येतात. त्यामुळे लक्षणे दिसताच नागरिकांनी जवळच्या आरोग्य केंद्रात संपर्क साधून उपचार घ्यावेत, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुहास कोरे, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.एस.पी. बोरसे यांनी केले आहे. 

 

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्याWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय