शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची धांदलघाई; वाहतूक खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2019 15:28 IST

वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामाची मुदत जवळ येत आहे. त्यामुळे कंत्राटदारांनी कामाला वेग दिला आहे. यामुळे महामार्गावर एकाचवेळी २ ते ३ मशीनचा वापर होत असून या मार्गावर सुरू असलेल्या वाहतूकीला त्याचा फटका बसत आहे. रविवारी मंगरुळपीर ते वाशिमदरम्यान सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे वारंवार वाहतुकीचा खोळंबा झाल्याने प्रवाशांसह वाहनधारकांनाही मोठा मन:स्ताप सहन करावा लागला.जिल्ह्यात गेल्या १५ महिन्यांपूर्वीपासून राष्ट्रीय महामार्गांची कामे सुरू करण्यात आली. जिल्ह्यातील वाशिम ते कारंजा, मालेगाव ते रिसोड, शेलुबाजार ते मानोरा आणि कारंजा ते मानोरा, अशी राष्ट्रीय महामार्गाची कामे करण्यात येत आहेत. ही कामे कार्यारंभ आदेशानंतर २ वर्षांत पूर्ण करण्याचे निर्देश आहेत. निविदा प्रक्रियेतच तशी तरतूद करण्यात आली आहे. त्यात पावसाळ्यात वारंवार या कामांत खोळंबा निर्माण झाला, तर त्यानंतर सप्टेंबरनंतर परतीचा पाऊस, तसेच आॅक्टोबरच्या अखेरनंतर नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत अवकाळी पावसाचा जोर राहिल्याने या कामांत पुन्हा खोळंबा निर्माण झाला. त्यामुळे कामे रखडली. आता या कामांसाठी खुप कमी कालावधी उरला असल्याने ही कामे पूर्ण करण्याची घाई संबंधित कंत्राटदार कंपन्या करीत आहेत. यासाठी अधिकाधिक मनुष्यबळ आणि मशीनचा वापर करून तातडीने खोदकाम आणि समतलीकरणाचे कामकंत्राटदारांकडून करण्यात येत आहे, तर दुसरीकडे एका बाजुने काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. एकाचवेळी दोन्ही प्रकारची कामे सुरू असल्याने या मार्गांवर वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत आहे. ठिकठिकाणी जेसीबी, पोकलन मशीन गौणखनिज पसरविण्याचे काम करण्यात येत असल्याने या मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसफेऱ्यांसह, मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, खासबी प्रवासी वाहने रस्त्यावर उभी राहत आहेत. जिल्ह्यात सुरू असलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या सर्वच कामांवर हा प्रकार पाहायला मिळत असून, रविवार १७ नोव्हेंबर रोजी वाशिम-मंगरुळपीर दरम्यान या प्रकाराचा अतोनात त्रास प्रवासी आणि वाहनधारकांनाही सहन करावा लागला. आता आणखी चार ते पाच महिने तरी हा त्रास कायम राहणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :washimवाशिमhighwayमहामार्ग