शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांना शो-कॉज नोटीस बजावण्याचे निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2019 18:26 IST

अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले.

वाशिम : प्राथमिक व माध्यमिक वर्गातील विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीप्रकरणी गटशिक्षणाधिकाऱ्यांसह समाजकल्याण विभागातील संबंधित अधिकारी, कर्मचा-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी २८ फेब्रुवारीच्या स्थायी समितीच्या सभेत दिले. समाजकल्याण विभागाच्या योजनांच्या अंमलबजावणीस दिरंगाई, वित्तीय अनियमितता यासह कृषी, पंचायत, शिक्षण विभागाशी संबंधित विविध मुद्द्यांवर जिल्हा परिषद सदस्यांनी अधिका-यांना धारेवर धरले.जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात पार पडलेल्या या सभेच्या पीठासीन अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख तर मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, सभापती विश्वनाथ सानप, सुधीर पाटील गोळे, यमुना जाधव, पानुताई जाधव आदींची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, उस्मान गारवे यांनी समाजकल्याण विभागातील विविध योजनांमधील प्रशासकीय दिरंगाईबाबत संबंधित अधिका-यांना धारेवर धरले.झेरॉक्स मशिन व अन्य काही योजनांचे प्रस्तावास दिरंगाई झाल्याचा जाब विचारला असता, सदर फाईल वित्त विभागात असल्याचे उत्तरे संबंधित अधिका-यांनी दिले. यावर मुख्य लेखा व वित्त अधिकारी जोशी यांना विचारणा केली असता, वित्त विभागाकडून दिरंगाई होत नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभागृहात संभ्रम निर्माण केल्याबद्दल तसेच दिशाभूल करणारी माहिती दिल्याबद्दल संबंधितांना नोटीस बजावण्याचे निर्देश हर्षदा देशमुख यांनी दिले. समाजकल्याण अधिकारी हे वाशिमला नियमित येत नसल्याचा मुद्दा उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उपस्थित केला. समाजकल्याण अधिका-यांकडून यवतमाळ येथील प्रभार काढून पूर्णवेळ वाशिम येथेच ठेवण्यात यावे, असा ठराव यावेळी घेण्यात आला.विद्यार्थ्यांच्या प्रलंबित शिष्यवृत्तीवरून उस्मान गारवे, चक्रधर गोटे, देवेंद्र ताथोड आदींनी प्रश्न उपस्थित केला असता, २५०० पैकी ६५० विद्यार्थ्यांच्या चुकीच्या बँक खात्याची दुरुस्ती करीत त्यांच्या खात्यात रक्कम जमा केल्याची माहिती अधिका-यांना दिली. समाजकल्याण विभागाने १० दिवसांपूर्वीदेखील हीच आकडेवारी सादर केल्याने जिल्हा परिषद अध्यक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त करीत प्रशासकीय दिरंगाई करणारे गटशिक्षणाधिकारी तसेच समाजकल्याण विभागाच्या संबंधित अधिका-यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले. यावेळी कृषी विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, शासन परिपत्रक व निर्णयाचे वाचन, पाणीटंचाई, दुष्काळसृदश परिस्थिती यासह विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र ताथोड, चक्रधर गोटे, शंकरराव बोरकर, विकास गवळी, उस्मान गारवे, सचिन रोकडे यांच्यासह विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.आठ महिन्यांपासून चार कोटी रुपये पडूनशिष्यवृत्ती योजनेंतर्गतचे चार कोटी रुपये गत आठ महिन्यांपासून बँकेत पडून असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. विशेष म्हणजे सदर चार कोटी रुपये हे चालू खात्यात असल्याने त्याचे व्याजही जिल्हा परिषदेला मिळू शकले नसल्याबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांसह सदस्य व मुख्य कार्यकारी अधिका-यांनी नाराजी व्यक्त केली. शिष्यवृत्ती योजनेसंदर्भातील रकमेबाबत समाजकल्याण विभागाने बँक अचानक का बदलण्यात आली, याचा जाब चक्रधर गोटे यांनी विचारला. कुणाच्या परवानगीने बँक खाते बदलण्यात आले असा सवाल विचारत याप्रकरणी सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी दिले.