शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत तपासून घेण्याच्या सूचना ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2018 15:04 IST

   वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.

ठळक मुद्देपावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

  वाशिम - वाशिम जिल्ह्यातील सर्व ग्राम पंचायत क्षेत्रातील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतांचे पाणी तपासुन घेण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी संबंधित यंत्रणेला दिले.पावसाळा सुरु झाला असुन यादरम्यान ग्रामिण भागातील पाण्याचे स्त्रोत मोठ्या प्रमाणात दुषित होतात. परिणामी गावात साथरोगांचा प्रादुर्भाव होतो. हे टाळण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी आरोग्य विभाग, पंचायत विभाग, जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग, ग्रामिण पाणी पुरवठा विभाग आणि भूजल सर्वेक्षण यंत्रणा या विभागाची बैठक घेऊन याबाबत सुचना दिल्या. ग्रामिण भागातील पिण्याच्या पाण्याच्या विहिरी, हातपंप, बोअर ईत्यादी सार्वजणिक स्त्रोतांची जैविक व रासायनिक पाणी नमुणे तपासणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यासाठी ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांनी तात्काळ कार्यवाही करावी. तसेच तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता संनियंत्रण समितीची दरमहा बैठक घेऊन पाणी गुणवत्ता विषयक बाबींचा पाठपुरावा करण्याचे निर्देशही मीना यांनी दिले. या कामात विलंब झाल्यास व लोकांच्या आरोग्यास बाधा निर्माण झाल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी दिला.  ग्रामपंचायतींनी करावयाची कामे १) नियमित पाणी तपासणी करावी.२) पाण्याचे नियमित शुद्धिकरण करावे.३)  दर्जेदार (३४ टक्के क्लोरीन असलेली) ब्लिचिंग पावडरची खरेदी व पुरेसा साठा उपलब्ध ठेवावा.४)  पाण्याच्या स्त्रोतांचा परिसर स्वच्छ ठेवावा.

 दुषित पाणी नमुन्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर !एप्रिल महिन्यात  २१ टक्के पाणी नमुने जैविकदृष्ट्या दुषित आढळले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत व आरोग्य) यांच्यासह ग्रामसेवक व आरोग्य सेवक यांची जिल्हा स्तरावर तातडीची सभा बोलवुन याबाबत आढावा घेतला. तसेच याबाबत संबंधितांची चांगलीच कानउघडणी केली होती. परिणामी संबंधित यंत्रणेमार्फत याबाबत तात्काळ कार्यवाही करण्यात आली. त्यामुळे मे महिन्यातील अहवालानुसार दुषित पाणी नमुण्याची टक्केवारी २१ वरुन २.५५ टक्क्यावर आली आहे. यापुढेही असेच दक्ष राहुन काम केल्यास पिण्याचे स्त्रोत सुरक्षित राहतील व लोकांचे आरोग्य चांगले राहिल, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिपक सेलोकर यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषदWaterपाणी