शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
3
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
4
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
5
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
6
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
7
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
8
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
9
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
10
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
11
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
12
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
13
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
14
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
15
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
16
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
17
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
18
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
19
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
20
२०३० पर्यंत मुंबई रेबिजमुक्त करणार; पालिकेचा संकल्प, जनजागृती करणार

धुक्यामुळे पिवळ्या पडलेल्या सोयाबीन पिकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 16:28 IST

तलाठी व कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी या शिवाराला भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: शेतकरी यंदाच्या हंगामात विविध संकटांनी बेजार झाले असून, गेल्या आठवड्यात आलेल्या पावसानंतर पडलेल्या धुक्यामुळे वाशिम तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील शेकडो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीनचे पीक पिवळे पडून सुकल्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या संदर्भात शेतकऱ्यांनी माहिती देऊनही कृषी किंवा महसूल विभागाकडून या नुकसानाची पाहणी करण्यात आली नव्हती. लोकमतने १९ सप्टेंबरच्या अंकात  शेकडो हेक्टरमधील सोयाबीन सुकले  या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच तलाठी व कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी या शिवाराला भेट देऊन सोयाबीन पिकाची पाहणी केली.वाशिम तालुक्यातील खंडाळा खु. येथे जवळपास ४०० हेक्टर क्षेत्रात खरीप पिकांची पेरणी झाली आहे. यात तूर, मुग, उडिद, कपाशी आणि सोयाबीन पिकाचा समावेश आहे. तथापि, एकूण क्षेत्रापैकी ८० टक्के क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. या भागांत पावसाळ्याच्या सुरुवातीला कमी पाऊस पडल्याने पीक संकटात सापडले होते. त्यानंतर आॅगस्टमध्ये आलेल्या जोरदार पावसाचा या पिकाला मोठा आधार झाला. हे पीक आता शेंगा, फुलावर असताना गेल्या काही दिवसांपासून सतत पावसाची रिपरिप सुरू झाल्याने या पिकावर मोठ्या प्रमाणात किडीचा प्रादूर्भाव झाला. त्यामुळे शेतकºयांना कीटकनाशकासाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागला. त्यानंतर पुन्हा गेल्या आठवड्यात पावसाने रिपरिप सुरु केली आता पाऊस थांबल्यानंतर खंडाळा खुर्द परिसरात मोठ्या प्रमाणात धुके पडले आहे. या धुक्यामुळे सोयाबीनचे पीक पूर्णपणे पिवळे पडले आहे. त्यामुळे शेंगाही सुकत असून, आता या पिकातून उत्पादनाची कोणतीच आशा शेतकºयांना राहिलेली नाही. त्यामुळे पिकासाठी कर्ज काढून केलेला खर्च पाण्यात गेला असून, शेतकºयांवर आता कर्जाचा डोंगर वाढणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. दरम्यान, गावचे सरपंच आणि शेतकºयांनी या नैसर्गिक आपत्तीची पाहणी करण्याची मागणी तलाठी, कृषी सहाय्यकांकडे केली, तसेच वाशिमच्या तहसीलदारांना या प्रकाराची माहिती देऊनही पिकाची पाहणी करण्यात आली नव्हती. लोकमतने या संदर्भात १९ सप्टेंंबर रोजी वृत्त प्रकाशित केल्यानंतर तलाठी, कृषी सहाय्यकांनी शुक्रवारी खंडाळा खु. येथे भेट देऊन पिवळ्या पडलेल्या पिकाची पाहणी केली.

टॅग्स :washimवाशिमagricultureशेतीFarmerशेतकरी