शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
3
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
4
Yavatmal Accident: गाडी शिकताना नियंत्रण सुटलं अन्...; एकाच कुटुंबातील ४ जण ठार
5
बॉयफ्रेंडसोबत मिळून केली आईची हत्या, मग रचलं जीवन संपवल्याचं नाटक, मुलीचं भयानक कृत्य  
6
उल्हासनगरमध्ये भाजपला मोठे खिंडार! उद्धवसेनेच्या नेत्याच्या प्रवेशावरून अंतर्गत वाद चव्हाट्यावर
7
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
8
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
9
Suzuki ने लॉन्च केले Access चे CNG व्हेरिएंट; जाणून घ्या मायलेज अन् किंमत...
10
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
11
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
12
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
13
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
14
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
15
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
16
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
17
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
18
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
19
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
20
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?

‘रोहयो’ घोटाळ्याच्या चौकशीचा फार्स!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 15:36 IST

गावांमध्ये चौकशीसाठी पथक येणे गरजेचे होते; प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश गावांमध्ये पथक पोहचलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली.

- सुनील काकडे  लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींमार्फत करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाला. त्यात मालेगाव तालुका अग्रेसर ठरला असून, या तालुक्यातील ८६ ग्राम पंचायत क्षेत्रातील ‘रोहयो’च्या कामांची चौकशी करण्यासाठी १० विशेष पथक गठीत करण्यात आले आहेत. १२ डिसेंबरपासून या पथकांनी ठरवून दिलेल्या ग्रामपंचायतींमध्ये चौकशी करणे क्रमप्राप्त आहे. प्रत्यक्षात मात्र १२ व १३ डिसेंबरला अनेक ग्रामपंचायतींमध्ये पथक फिरकलेच नसल्याने ही प्रक्रिया फोल ठरून भ्रष्टाचार उघड होण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.मालेगाव तालुक्यात रोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या बहुतांश कामांचा दर्जा निकृष्ट असून अनेक कामे कागदोपत्रीच उरकण्यात आली आहेत. यासंदर्भातील तक्रारींची दखल घेऊन जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या पथकाने वाघळूद, ब्राम्हणवाडा यासह इतर काही गावांमधील ‘रोहयो’च्या कामांची चौकशी केली असता, त्यात अनयिमितता व गैरव्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले.दरम्यान, मालेगाव तालुक्यात इतरही ग्रामपंचायतींमध्ये रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये प्रचंड घोटाळा झाला असून विशेष तपासणी व सखोल चौकशी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे पत्रव्यवहार केला होता. त्यावरून मालेगाव तालुक्यातील ८६ ग्रामपंचायतींमध्ये झालेल्या रोहयोच्या कामांची चौकशी करण्याचे आदेश विभागीय आयुक्तांनी पारित केले. त्यासाठी बुलडाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांचे १० विशेष पथक गठीत करण्यात आले. त्यानुसार, १२ डिसेंबरला मारसूळ, कवरदरी, किन्हीराजा, जोडगव्हाण, नागरतास, करंजी, मुंगळा, शेलगाव बगाडे, ब्राम्हणवाडा, मेडशी तसेच १३ डिसेंबरला गांगलवाडी, वाडी रामराव, सोनाळा, पांगरी धनकुटे, बोर्डी, शेलगाव बोंदाडे, रेगाव, शिरपूर, सुकांडा, भौरद या प्रस्तावित गावांमध्ये चौकशीसाठी पथक येणे गरजेचे होते; प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश गावांमध्ये पथक पोहचलेच नसल्याची माहिती प्राप्त झाली. यावरून ३१ डिसेंबरपर्यंत चौकशीकामी प्रस्तावित ६६ ग्रामपंचायतींमधील ‘रोहयो’तील कामांच्या चौकशीवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून ही प्रक्रिया बहुतांशी तकलादू ठरत असल्याचे ग्रामीण भागात बोलले जात आहे.विशेष चौकशी पथकांचीच चौकशी करण्याची ओढवली वेळरोजगार हमी योजनेअंतर्गत झालेल्या विविध कामांमध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. त्यावरून विभागीय आयुक्त पियूष सिंह यांनी मालेगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या कारभाराची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले. त्यासाठी प्रथम अकोला जिल्ह्यातील अधिकारी व कर्मचाºयांचे १० पथक गठीत करून ३ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात होणार होती; मात्र अकोला जिल्हा परिषदेची निवडणूक असल्याने चौकशीस स्थगिती देत बुलडाणा आणि यवतमाळ या जिल्ह्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांचे पथक गठीत करून १२ डिसेंबरपासून चौकशी प्रक्रियेस सुरूवात करण्याच्या सूचना होत्या; मात्र १२ व १३ डिसेंबरला अनेक ग्रामपंचायतींमध्ये पथक आढळून आले नसल्याने विशेष पथकांचीच चौकशी करण्याची वेळ ओढवल्याची चर्चा होत आहे.

मुख्य कार्यकारी अधिकाºयांच्या निर्देशानंतरही दोषींवर फौजदारी दाखल करण्यास विलंबमालेगाव तालुक्यातीलच वाघळूद ग्रामपंचायतीअंतर्गत ‘रोहयो’च्या कामांमध्ये गंभीर स्वरूपाची आर्थिक अनियमितता, गैरव्यवहार, खोटे दस्तावेज तयार करणे, शासनाची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे सिद्ध झाले. चौकशी समितीच्या अहवालानुसार त्यास जबाबदार असलेले मालेगाव पंचायत समितीचे तत्कालिन गटविकास अधिकारी, शाखा अभियंता, पंचायत समितीचे कृषी अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, कंत्राटी तांत्रीक सहायक, सहायक कार्यक्रम अधिकारी, क्लार्क कम डाटा एन्ट्री आॅपरेटर, सरपंच, ग्रामरोजगार सेवक आदिंविरूद्ध फौजदारी गुन्हे दाखल करावे. तसेच रक्कम वसूलीची कार्यवाही करून तसा अहवाल विनाविलंब सादर करावा, असे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांनी मालेगावच्या गटविकास अधिकाºयांना ४ आॅक्टोबर २०१९ रोजी दिले. त्यावरून गटविकास अधिकाºयांनी ६० पानांची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे दाखल केली; मात्र विविध प्रकारच्या त्रुटी काढून संबंधितांविरूद्ध अद्यापपर्यंत फौजदारी दाखल झालेली नाही.

विभागीय आयुक्तांच्या आदेशावरून बुलडाणा आणि यवतमाळ या दोन्ही जिल्ह्यांमधील अधिकारी, कर्मचाºयांच्या विशेष पथकाने रोहयोतील कामांच्या चौकशीस प्रारंभ केला आहे. १० पैकी २ पथकांमधील अधिकाºयांनी आपल्याशी संपर्क देखील केला होता. प्रत्यक्षात पथक गावात पोहचल्यानंतर त्यांना ‘रोहयो’अंतर्गत झालेली कामे दाखविण्यासाठी जबाबदार व्यक्ती देखील हजर असायला हवा. त्यात काहीअंशी अडचण जात आहे.- एस.एम. तोटावारसनियंत्रण अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, वाशिम

 

 

टॅग्स :washimवाशिमfraudधोकेबाजी