शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

नरखेड-वाशिम रेल्वेमार्गासाठी अमरावतीच्या खासदारांचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2019 12:05 IST

नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम:  वाशिम ते कन्याकुमारी या उत्तर दक्षिण टोकाला जोडणाऱ्या बहुप्रतिक्षीत नरखेड-वाशिम या नवीन रेल्वे मार्गाची त्रिसदस्यीय समितीव्दारे पाहणी करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भ-मराठवाड्याच्या विकासाला चालना देणाऱ्या या रेल्वेमार्ग निर्मितीच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी या संदर्भात रेल्वेमंत्र्यांना पत्र लिहून या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे. नकारात्मक सर्वेक्षणामुळे ३० वर्षांपासून मागे पडलेल्या नरखेड ते वाशिम व्हाया कारंजा-मंगरुळपीर या रेल्वेमार्गाच्या सर्वेक्षणाला पुन्हा नव्याने सुरुवात झाली आहे. भविष्यात वाशिम ते अमरावती हा रेल्वेमार्ग अस्तित्त्वात आला तर तो पश्चिम विदर्भ व मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग ठरून उद्योग क्षेत्रासाठी भरभराटीचा ठरणार आहे.  मागील ३० वर्षापासून नरखेड-वाशिम रेल्वेमार्गाचा मुद्दा मागे पडला होता; परंतु ९ जुलै रोजी रेल्वे अधिकारी यांच्या एका सर्वेक्षण पथकाने जिल्ह्यात भेट देऊन या मार्गासंदर्भातील काही कागदपत्रे गोळा करून कृती समितीच्या सदस्यांशी चर्चाही केली. यामुळे या मार्गासाठी पुढाकार घेणारयासह जिल्ह्यातील युवा मंडळीत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मंगरूळपीर येथील तालुका रेल्वे कृती समितीच्यावतीने उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांच्यामार्फत १५ जुलै रोजी रेल्वेमंत्र्यांकडे निवेदन पाठवित हा रेल्वे मार्ग पूर्ण झाल्यास वाशिम जिल्ह्यातील शेतकरयाना  देशातील उत्तर दक्षिण अशा दोन्हीकडच्या बाजारपेठा उपलब्ध होणार असल्याने या रेल्वे मार्गाचे काम जलद गतीने पूर्ण करावे, अशी मागणी केली आहे, तर या मार्गाच्या निर्मितीसाठी सकारात्मक पद्धतीने पाठपुरावा करण्यासाठी तालुका रेल्वे कृती समितीच्या अध्यक्षपदी राम ठाकरे यांच्यासह इतर सदस्यांची निवडही करण्यात आली. या रेल्वेमार्गाची मागणी जोर धरत असतानाच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी रेल्वेमंत्र्यांना पत्र सादर करून विदर्भ-मराठवाड्याच्या विकासास चालना देणाऱ्या या मार्गाच्या निर्मितीसाठी सहकार्य करण्याची मागणी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमrailwayरेल्वेnavneet kaur ranaनवनीत कौर राणा