शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
2
Video: दोन वर्षाचा नातू आणि आजी अडकली पुरात, वाचवण्यासाठी खासदार ओमराजे निंबाळकर उतरले पाण्यात
3
आभाळ फाटले, अतिवृष्टीचा विक्रम! ५३२० गावांतील पिकांचा चिखल; संपूर्ण आठवडा पावसाचा...
4
ट्रम्प यांना आणखी एक धक्का! फ्रान्स पॅलेस्टिनी राष्ट्राला मान्यता देणार, मॅक्रॉन यांची मोठी घोषणा
5
₹५००० च्या SIP नं कसा बनेल ₹५ कोटींचा फंड? कमालीची आहे पद्धत, एकदा समजलात तर पैशांचं टेन्शन होईल दूर
6
१२८ किलोची वजनदार पत्नी अंगावर पडून पतीचा मृत्यू; सोशल मीडियावर पुन्हा घटना व्हायरल 
7
Stock Markets Today: वीकली एक्स्पायरीच्या दिवशी शेअर बाजाराची सुस्त सुरुवात, निफ्टी ३० अंकांनी वाढून उघडला; ऑटो स्टॉक्समध्ये गुंतवणूकदारांची खरेदी
8
कंपनी मालकीन कर्मचाऱ्याच्या प्रेमात पडली, घटस्फोटासाठी कोट्यवधि रुपये मोजले; प्रकरण न्यायालयात पोहोचले
9
VIRAL : धडकी भरवणारी 'सफर'! अफगाणिस्तानातून विमानाच्या चाकात लपून भारतात पोहोचला १३ वर्षांचा मुलगा
10
अल्पवयीन मुलीच्या गुप्तांगाला स्पर्श करणे म्हणजे बलात्कार नव्हे; सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा
11
अपुऱ्या झोपेमुळे स्मृतिभ्रंशाचा मोठा धोका; ५ वर्षाच्या अभ्यासानंतर समोर आला धक्कादायक रिपोर्ट
12
इस प्यार को क्या नाम दूं? भावोजीसोबत मेहुणी पळाली; जाताना १ लाख रोख अन् २ लाखांचे दागिनेही घेऊन गेली; पुढे काय झालं?
13
स्क्रीनवर सोज्वळ, खऱ्या आयुष्यात बिकिनी? सीतेच्या भूमिकेत दिसणाऱ्या साई पल्लवीवर होतेय टीका
14
ट्रम्प यांच्या एच-1 बी शुल्क आदेशानंतर भारतीय प्रवासी एमिरेट्सच्या विमानातून उतरले, विमान ३ तास उशीरा
15
Mumbai Robbery: मोबाईल आणि ब्रँडेड घड्याळांच्या दुकानात दरोडा; चार सराईत गुन्हेगारांना अटक!
16
मराठवाड्यात पुन्हा पावसाचा कहर; पाच जणांचा मृत्यू, धाराशिव, बीड, छत्रपती संभाजीनगरमध्ये जलप्रलय
17
आजचे राशीभविष्य, २३ सप्टेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मित्रांकडून लाभ होईल
18
एच-१बी व्हिसाला टक्कर, आता चीनचा के-व्हिसा; कुशल कर्मचाऱ्यांसाठी  चीनने उघडले आपले दार
19
आजपासून ओला, उबरचालक आकारणार सरकारमान्य भाडे; अधिक भाडे घेतल्यास कंपन्यांवर कारवाई होणार
20
कुजबुज! ठाकरे बंधूंसाठी शरद पवारांची माघार? मुख्यमंत्र्यांनाच पडला परिवहन मंत्र्यांचा विसर

वाशिम जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांत वाढ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2018 18:37 IST

प्रशासनाने त्याची लगेचच दखल घेतली असून, विविध ठिकाणाहून पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांची संख्या वाढली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले, तर टँकरची संख्या १६ वरून वाढून २५ वर गेली आहे. पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांत वाढ झाली आणि आलेल्या प्रस्तावांनाही जिल्हास्तरावरून तडकाफडकी मंजुरी देण्यात आली.

वाशिम: पाणीटंचाई उपाय योजनांच्या अंमलबजावणी संदर्भात प्रशासनाची उदासीनता असल्याने जनतेचे पाण्याअभावी हाल सुरू होते. या पृष्ठभूमीवर लोकमतने ९ मे रोजीच्या अंकात ‘पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडेच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करून जनतेची समस्या उजागर केली. प्रशासनाने त्याची लगेचच दखल घेतली असून, विविध ठिकाणाहून पाणीटंचाई निवारणाच्या उपाय योजनांची संख्या वाढली आहे. त्यातच आलेल्या प्रस्तावांना तातडीने मंजुरीही देण्यात येत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले, तर टँकरची संख्या १६ वरून वाढून २५ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या समस्येवर नियंत्रणासाठी प्रशासनाने ४.४८ कोटी रुपयांच्या उपाय योजनांचा कृती आराखडा तयार केला असला तरी ९ मेपर्यंत पाणीटंचाई असलेल्या बहुतांश गावांत प्रशासनाकडून अद्याप आवश्यक उपाय योजना करण्यात आल्या नव्हत्या. विशेष म्हणजे या संदर्भात प्रस्ताव पाठविण्यात उदासीनता होती, तसेच प्रस्तावांना मंजुरातीलाही विलंब लागत असल्याने जनतेचे पाण्याअभावी हाल सुरू होते.   प्रशासकीय आकडेवारीनुसार सद्यस्थितीत जिल्ह्यातील ५१० गावांत पाणीटंचाई आहे. या पाणीटंचाईच्या निवारणासाठी जिल्हा प्रशासनाने ४ कोटी ४८ लाख ५० हजार रुपयांचा कृती आराखडा तयार केला आहे. या आराखड्यानुसार ५ नळ योजनांची दुरुस्ती ७४ गावांसाठी टँकर आणि ४९९ गावांसाठी विहिर अधिग्रहण करावयाचे होते. कृती आराखड्याचा कालावधी १ आॅक्टोबर २०१७ ते ३० जून २०१७ या चार महिन्यांचा असताना मे महिन्याचा पहिला पंधरवाडा अर्ध्याहून अधिक उलटला तरी अद्याप निम्म्या योजनांचीही अंमलबजावण झाली नव्हती. प्रशासनाच्या माहितीनुसार या आराखड्यातील उपाय योजनांपैकी  ६१.६० लाख रुपये खर्चाच्या १३२ विहिरींचे अधिग्रहण झाले होते, तर ८८.७७ लाख रुपये खर्चाच्या १६ गावांत टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत होता. त्याशिवाय ७.३१ लाख रुपये खर्चाच्या ३ नळ योजनांची दुरुस्ती करण्यात आली होती.  उपाय योजनांच्या अंमलबजावणीची ही आकडेवारी केवळ २९ टक्के होती. उपाय योजनांच्या अंमलबजावणीत होत असलेल्या दिरंगाईकडे लक्ष वेधण्यासाठी लोकमतने ‘पाणीटंचाई निवारणासाठी प्रशासनाचे प्रयत्न तोकडेच!’ या मथळ्याखाली वृत्त प्रकाशित करताच तालुकास्तरावरून पाणीटंचाई निवारणाच्या प्रस्तावांत वाढ झाली आणि आलेल्या प्रस्तावांनाही जिल्हास्तरावरून तडकाफडकी मंजुरी देण्यात आली. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात १३६ गावांसाठी १५१ विहिरींचे अधिग्रहण झाले आहे, अर्थात अधिग्रहित विहिरींची संख्या १९ ने वाढली. त्याशिवाय टँकरची संख्या ९ ने वाढून २५ झाली आहे. अद्यापही ३४६ गावांतील उपाय योजनांची अंमलबजावणी प्रलंबित आहे.  टँकर, विहिरींचे नवे प्रस्ताव जिल्हास्तरावरजिल्ह्यात पाणीटंचाई गावांच्यावतीने पंचायत समित्या आणि तहसील कार्यालयांमार्फत टँकरने पाणी पुरवठा करण्यासह विहिरींचे अधिग्रहण करण्याबाबत नवे प्रस्ताव पाठविण्यात आलेले आहेत. जिल्हा प्रशासनाच्या माहितीनुसार १३ मे रोजी विहिर अधिग्रहणाचे ३ प्रस्ताव, तर टँकरचे ८ प्रस्ताव प्राप्त असून, या प्रस्तावांना १५ मे रोजीच मंजुरी देऊन संबंधित गावांची समस्या निकाली काढण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात येणार आहे. तथापि, संबंधित गावांसाठी विहिरी अधिग्रहण करताना पडताळणी करण्यात येणार असून, टँकरची गरज असेल, तरच तातडीने टँकर सुरू करण्यात येणार असल्याचे अधिकाºयांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणीWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय