शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

दिव्यांगांच्या उत्पन्न मर्यादेत वाढ; पण प्रणालीत सुधारणा नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 18:28 IST

सेतू सुविधा केंद्रांमधील संगणकीय प्रणालीत सुधारणा झाली नसल्याचे कारण समोर करत पात्र लाभाथींचे प्रस्ताव ‘रिजेक्ट’ केले जात असल्याने पात्र लाभार्थी उत्पन्नातील वाढीव मर्यादा व वाढीव मानधनापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सामाजीक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार दिव्यांग लाभार्थींच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादेत वाढ करण्यासह मासिक अनुदानही वाढविण्यात आले. मात्र, सेतू सुविधा केंद्रांमधील संगणकीय प्रणालीत सुधारणा झाली नसल्याचे कारण समोर करत पात्र लाभाथींचे प्रस्ताव ‘रिजेक्ट’ केले जात असल्याने पात्र लाभार्थी उत्पन्नातील वाढीव मर्यादा व वाढीव मानधनापासून वंचित राहत असल्याचे दिसून येत आहे.३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयान्वये संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील ४० ते ७९ टक्के दिव्यांग व्यक्तींच्या मानधनात वाढ करून ८०० रुपये प्रतिमाह; तर ८० टक्के व त्यापेक्षा अधिक दिव्यांग व्यक्तींना प्रतिमाह १ हजार रुपये वाढीव मानधन दिले जाणार आहे. त्यासाठी राज्य पुरस्कृत विशेष सहाय्य योजनांकरिता वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा २१ हजारांवरून ५० हजार करण्यात आली आहे. हा शासन निर्णय ९ आॅक्टोबर २०१८ पासून अंमलात येईल, अशा स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या; परंतु सेतू सुविधा केंद्रांमधील संगणकीय प्रणालीत उत्पन्न मर्यादेत सुधारणा करण्याची सोय अद्याप न केल्याने नव्याने दाखल होणारे प्रस्ताव ‘रिजेक्ट’ केले जात आहेत. यामुळे वाढीव मानधनापासूनही दिव्यांग बांधव वंचित राहत आहेत.

३ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार अद्याप एकाही दिव्यांग लाभार्थीस वाढीव अनुदान मिळालेले नाही. यामुळे दिव्यांगांची हेळसांड होत आहे. हा प्रश्न विनाविलंब निकाली न निघाल्यास नाईलाजास्तव मोेठे आंदोलन उभारावे लागेन.- मनीष डांगेराज्य उपाध्यक्ष, राष्ट्रीय विकास अपंग महासंघ

टॅग्स :washimवाशिम