शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:19 IST

चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गणित विषयाचा पेपर २५ जुलै रोजी झाला असून, या पेपरमध्ये दोन गुणांचा प्रश्न चुकीचा असल्याचा दावा गणित विषयाचे प्रा. पी.एन. देशमुख यांनी केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन गुण देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी केली. लोकमतने या संदर्भात २६ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सुरू असून, २५ जुलै रोजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर झाला. प्रश्नपत्रिकेतील १३ व्या क्रमांकाचा पर्यायी प्रश्न चुकीचा असल्याची बाब रिसोड येथील परीक्षा केंद्रावर गणित विषयाचे प्रा.पी.एन देशमुख यांच्या निदर्शनात आली. या पर्यायी प्रश्नाला २ गुण असून, हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन गुणाचे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमधून वर्तविली जात आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या या प्रश्नाचे दोन गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी प्रा. देशमुख यांनी केली होती. या संदर्भात लोकमतनेही २६ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन माध्यमिक परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल परिक्षा मंडळाने घेतली असून, त्वरित याबाबत माहिती घेतली व   या चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक, तपासणीस यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान  टळले आहे.  

इयत्ता बारावीच्या पुरवणी परिक्षेतील गणित विषयातील चुकीच्या प्रश्नाबाबत राज्यातील सर्व परीक्षा तपासनीसांना राज्य परिक्षा मंडळातर्फे सूचना देण्यात आल्या असून, या चुकीच्या प्रश्नामुळे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना दोन गुण देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. - परेश खर्चे परिक्षा मंडळ कर्मचारी, अमरावती

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल