शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

बारावीच्या पुरवणी परीक्षेतील चुकीच्या प्रश्नामुळे होणारे नुकसान टळले; विद्यार्थ्यांना मिळणार दोन गुण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2019 18:19 IST

चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड (वाशिम) : इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेतील गणित विषयाचा पेपर २५ जुलै रोजी झाला असून, या पेपरमध्ये दोन गुणांचा प्रश्न चुकीचा असल्याचा दावा गणित विषयाचे प्रा. पी.एन. देशमुख यांनी केला. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दोन गुण देण्यात यावे, अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांनी केली. लोकमतने या संदर्भात २६ जुलै रोजी वृत्त प्रकाशित करून परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक ,तपासणीस यांना सूचना परिक्षा मंडळाने दिल्या आहेत. त्याचा लाभ राज्यभरातील विद्यार्थ्यांंना मिळणार आहे. दहावी, बारावीची पुरवणी परीक्षा सुरू असून, २५ जुलै रोजी इयत्ता बारावीचा गणित विषयाचा पेपर झाला. प्रश्नपत्रिकेतील १३ व्या क्रमांकाचा पर्यायी प्रश्न चुकीचा असल्याची बाब रिसोड येथील परीक्षा केंद्रावर गणित विषयाचे प्रा.पी.एन देशमुख यांच्या निदर्शनात आली. या पर्यायी प्रश्नाला २ गुण असून, हा प्रश्न चुकीचा असल्यामुळे विद्यार्थ्यांचे दोन गुणाचे नुकसान होण्याची भीती विद्यार्थ्यांसह प्राध्यापकांमधून वर्तविली जात आहे. प्रश्नपत्रिकेतील चुकीच्या या प्रश्नाचे दोन गुण विद्यार्थ्यांना देण्यात यावे, अशी मागणी प्रा. देशमुख यांनी केली होती. या संदर्भात लोकमतनेही २६ जुलै रोजीच्या अंकात वृत्त प्रकाशित करुन माध्यमिक परिक्षा मंडळाचे लक्ष वेधले. त्याची दखल परिक्षा मंडळाने घेतली असून, त्वरित याबाबत माहिती घेतली व   या चुकीच्या प्रश्नाचे २ गुण विद्यार्थ्यांना देण्यासंदर्भात  परीक्षक, तपासणीस यांना सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान  टळले आहे.  

इयत्ता बारावीच्या पुरवणी परिक्षेतील गणित विषयातील चुकीच्या प्रश्नाबाबत राज्यातील सर्व परीक्षा तपासनीसांना राज्य परिक्षा मंडळातर्फे सूचना देण्यात आल्या असून, या चुकीच्या प्रश्नामुळे नुकसान होऊ नये म्हणून विद्यार्थ्यांना दोन गुण देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले आहेत. - परेश खर्चे परिक्षा मंडळ कर्मचारी, अमरावती

टॅग्स :washimवाशिमHSC Exam Resultबारावी निकाल