शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

वाशिम जिल्ह्यात संततधार पाऊस; रिठद गावाला पुराचा वेढा; संपर्क तुटला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2020 11:24 IST

रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. दरम्यान रिसोड तालुक्यातील रिठद गावाला अढळ नदीच्या पुराच्या पाण्याने वेढा घातला असून, गावाचा संपर्क तुटला. शिरपूर परिसरातील जवळपास ३० एकर जमिन पाण्याखाली गेल्याने पिकांचे नुकसान झाले.यावर्षी जून महिन्याच्या सुरूवातीपासनूच कधी-अधिक प्रमाणात पाऊस पडत आहे. १४ जूनपर्यंत जिल्ह्यात दमदार पाऊस झाला. त्यानंतर जवळपास ११ दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ आली. २५ ते २७ जून दरम्यान पाऊस झाल्याने पिकांना संजीवणी मिळाली. जुलै महिन्याच्या सुरूवातीलाही पाऊस आल्याने शेतकरी सुखावला. दरम्यान ४ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास वाशिम, रिसोड, मालेगावसह जिल्ह्यात सर्वदूर संततधार पाऊस झाला. रिठद परिसरात पावसाचा सर्वाधिक जोर असल्याने गावाजवळून वाहणाºया अढळ नदीला पूर आला. पुराने गावाला वेढा घातल्याने जवळपास ३ ते ४ तास गावाचा संपर्क तुटला. नदीकाठ परिसरातील शेकडो एकर शेतातही पुराचे पाणी साचल्याने पिकांचे नुकसान झाले. शिरपूर परिसरातही पावसाचा जोर अधिक होता. रिसोड शहरातही गुरूवार, शुक्रवारी सायंकाळनंतर पाऊस झाल्याने काही दुकानांमध्ये पाणी शिरले.वाशिम शहरातही पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले. खड्डयांमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांची गैरसोय झाली. या पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला. चमूतर्फे पाहणीसंततधार पावसामुळे रिठद, शिरपूरसह अन्य ठिकाणी सोयाबीन व अन्य पिकांचे नुकसान झाले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नियमानुसार भरपाई मिळावी याकरीता ४ जुलै रोजी शेतकºयांनी भ्रमणध्वनीवरून कृषी अधिकाºयांकडे पाहणी करण्याची मागणी केली. सोमवारपासून नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाणार आहे.

जिल्ह्यात पावसामुळे जेथे पिकांचे नुकसान होत आहे ्रकिंवा पिकांचे नुकसान झाल्याच्या शेतकºयांच्या तक्रारी आल्या, तेथील नुकसानाची पाहणी महसूल व कृषी विभागाच्या चमूतर्फे केली जात आहे. ४ जुलै रोजीच्या पावसाने ज्या भागात पिकांचे नुकसान झाले, तेथे पाहणी करून पंचनामे केले जाणार आहे.- एस.एम. तोटावारजिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी.

टॅग्स :washimवाशिमfloodपूर