शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

पीकविमा काढलेल्या शेतकऱ्यांकडून अवैध वसुली!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 11:16 IST

जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यात प्रधानमंत्री पीक योजनेतंर्गत पीकविमा काढणाºया शेतकऱ्यांकडून अवैध वसुली करण्यात येत आहे. प्रत्यक्षात पीकविमा काढणाºया केंद्रचालकाला पीकविमा कंपनीकडून प्रत्येकी २४ रुपये शुल्क अदा होत असून, शेतकºयांना मोफत पीकविमा भरता येणार असल्याची जाहीर प्रसिद्धी प्रशासन आणि पीकविमा कंपनीच्या जिल्हा समन्वयकांनी केली आहे.जिल्ह्यांत यंदाच्या खरीप हंगामात पीकविमा योजना राबविण्यास शासनाने मंजुरी दिली असून, या योजनेंतर्गत शेतकºयांकडून १ जुलैपासूनच पीकविमा भरून घेतला जात आहे. शेतकºयांना नजिक चे आपले सरकार सेवा केंद्र, किंवा सेतू केंद्र संबंधित बँक, सेवासोसायटीत पीकविमा काढता येतो. या योजनेची मुदत अवघ्या १२ दिवसांवर आली असताना शेतकरी पीकविमा काढण्याची घाई करीत आहेत. तथापि, पीकविमा भरणाºया शेतकºयांकडून काही केंद्रांत अवैध वसुली केली जात आहे. डिजिटल सातबारासाठी ५० रुपये, तर परिश्रम म्हणून १५ ते २० रुपयांसह १०० रुयांपर्यत शेतकºयांकडून वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे आपले सरकार सेवा केंद्रांवर शेतकºयांना माहितीसाठी फलकही लावले नाहीत. त्यामुळे शेतकºयांची दिशाभूल होत आहे. १० दिवसांपूर्वी पीक विमा कंपनीचे जिल्हा समन्वयक आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाºयांनी केलेल्या पाहणीतही हा प्रकार आढळून आला होता. आधीच नैसर्गिक संकटांचा सामना करणाºया शेतकºयांकडून अशा प्रकारे अवैध वसुली होत असल्याने प्रशासनाप्रती रोष व्यक्त होत आहे.

जिल्ह्यातील शेतकºयांना मोफत पीकविमा काढता येतो. त्यासाठी आपले सरकार सेवा केंद्रावर आॅनलाईन पद्धतीने फॉर्म भरला जातो. डिजिटल सातबारा आणि आवश्यक कागदपत्रे जोडून ही प्रक्रिया पार पाडली जाते. तथापि, कोठे अवैध वसुली होत असेल, तर चौकशी करून कारवाई करू.-एस. एम. तोटावार,जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारीआपले सरकार ई-सेवा केंद्रांत पीकविमा भरणे सुरू आहे. यासाठी बँक पासबूक, आधार कार्डची झेरॉक्ससाठी पंधरा रूपये, तर डिजिटल सातबारासाठी ५० रुपये लागत असल्याचे सांगितले जाते. - गजानन कोरकणे,शेतकरी, भर जहॉगिर

टॅग्स :washimवाशिमAgriculture Sectorशेती क्षेत्रCrop Insuranceपीक विमा