शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

आदर्श शेती : पार्डीच्या शेतकऱ्याने घेतला रब्बी तुरीचा आधार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 16:31 IST

पार्डी ताड येथील खुशाल गावंडे या शेतकऱ्याने रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली आहे.

ठळक मुद्देयोग्य नियोजनामुळे बहरले तुरीचे पीक

लोकमत न्यूज नेटवर्कपार्डी ताड (वाशिम): येथील शेतकरी खुशाल गावंडे यांनी रब्बीच्या हंगामात हरभरा किंवा गहू पिकाची पेरणी करून जोखीम पत्करण्यापेक्षा रब्बी तुरीचा आधार घेतला आहे. दोन एकरात पेरलेली रब्बीची तूर योग्य नियोजनामुळे चांगलीच बहरली असून, या पिकातून १५ क्विंटल उत्पन्न होण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मंगरूळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथील शेतकरी खुशाल गावंडे  हे आपल्या शेतीत वेगवेगळे प्रयोग करून फेरपालट पद्धतीच्या आधारे भरघोस उत्पादन घेतात. त्यांनी यापूर्वी, गहू, हरभरा, सोयाबीन, उडिद, मुग आणि ज्वारी या पिकांच्या आधारे मोठ्या प्रमाणात उत्पादनही घेतले आहे. त्यांनी मागील वर्षांपासून एक वेगळा प्रयत्न करताना रब्बीच्या तुरीचे उत्पन्न घेण्यास सुरुवात केली आहे. मागील वर्षी त्यांनी अवघ्या २० गुंठे क्षेत्रात रब्बीची तूर पेरली आणि त्यामधून तब्बल ३.७५ क्विंटलचे उत्पादन घेतले. यंदा त्यांनी सोयाबीन आणि उडिद,मुगाची काढणी झाल्यानंतर एकूण शेतापैकी दोन एकर क्षेत्रावर रब्बीची तूर पेरली आहे. यंदा पाऊस कमी झाल्यामुळे गहू पिकाला पाणी देणे शक्य होणार नाही, तर कमी थंडीमुळे हरभरा पिकातून फारसे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा नसल्याने त्यांनी हा प्रयोग केला आहे. हरभरा आणि गहू या दोन्ही पिकापेक्षा रब्बीच्या तुरीला कमी खर्च लागतो. ही बाब लक्षात घेऊन त्यांनी रब्बीची तूर पेरली आहे. तीन फुट अंतरावर ओळीने पेरणी करून तुषार सिंचनाद्वारे तुरीला पाणी दिले. खत आणि किटकनाशकांचा प्रभावी वापर करून त्यांनी ही तुर वाढविली आहे. सद्यस्थितीत ही तूर तीन फुट उंच वाढली असून, या पिकातून किमान १५ क्विंटल उत्पन्न मिळण्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी