शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना कधी डिस्चार्ज मिळणार? नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात; काय आहे अपडेट?
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
5
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
6
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
7
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
8
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
9
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
10
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
11
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
12
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
13
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
14
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
15
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
16
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
17
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
18
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
19
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
20
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ८१ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:20 IST

अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या ४० अशा एकूण ८१ विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने लवकरच सन्मानित केले जाणार आहे.  या योजनेत अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार राज्यातून व विभागातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाºया इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला जातो. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. सन २०१८-१९ या वर्षात इतर मागास प्रवर्गातील ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ४० असे एकूण ८१ विद्यार्थी या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या मान्यतेअभावी गुणवंत पुरस्कार प्रदान करण्याची प्रक्रिया रखडली होती. शेवटी १७ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेस शासनाची मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाही सुलभ झाली आहे. राज्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी एक लाख रुपये तर विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी ५१ हजार रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे. इतर मागास प्रवर्ग या गटात अमरावती विभागातील विद्यार्थीनी व विद्यार्थी राज्यात प्रथम आल्याने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा पुरस्कार तर उर्वरीत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून अमरावती विभागातील दहावीतील दोन व बारावीतील दोन अशा चार विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.पुरस्कार वितरणाची तारीख अद्याप निश्चित झाली नसून, लवकरच तारीख निश्चित होण्याचा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे. राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कार योजनेत वाशिम जिल्ह्यातील एकही विद्यार्थी नाही, याची थोडीफार खंत आहे. मात्र, अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याचे समाधानही आहे.- तानाजी नरळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी