शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

राज्यातील ८१ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार सन्मान !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 18:20 IST

अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षात राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्गाच्या ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गाच्या ४० अशा एकूण ८१ विद्यार्थी, विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने लवकरच सन्मानित केले जाणार आहे.  या योजनेत अमरावती विभागातील दहावीतील चार व बारावीतील चार अशा आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या ४ मार्च २०१७ च्या शासन निर्णयानुसार राज्यातून व विभागातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम येणाºया इतर मागासवर्ग प्रवर्गातील तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या गुणवंत विद्यार्थी व विद्यार्थिनींना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्कार प्रदान केला जातो. रोख रक्कम, स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गुणवंत विद्यार्थ्यांना सन्मानित केले जाते. सन २०१८-१९ या वर्षात इतर मागास प्रवर्गातील ४१ आणि विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील ४० असे एकूण ८१ विद्यार्थी या पुरस्कारासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. शासनाच्या मान्यतेअभावी गुणवंत पुरस्कार प्रदान करण्याची प्रक्रिया रखडली होती. शेवटी १७ फेब्रुवारी रोजी या प्रक्रियेस शासनाची मान्यता मिळाल्याने पुढील कार्यवाही सुलभ झाली आहे. राज्यातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी एक लाख रुपये तर विभागातून प्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थिनीला प्रत्येकी ५१ हजार रुपये अशी पुरस्काराची रक्कम आहे. इतर मागास प्रवर्ग या गटात अमरावती विभागातील विद्यार्थीनी व विद्यार्थी राज्यात प्रथम आल्याने त्यांना प्रत्येकी एक लाख रुपयाचा पुरस्कार तर उर्वरीत विद्यार्थ्यांना ५१ हजार रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे. विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातून अमरावती विभागातील दहावीतील दोन व बारावीतील दोन अशा चार विद्यार्थ्यांचा सन्मान केला जाणार आहे.पुरस्कार वितरणाची तारीख अद्याप निश्चित झाली नसून, लवकरच तारीख निश्चित होण्याचा विश्वास शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहे. राज्यातून व विभागीय परीक्षा मंडळातून इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षेत सर्वप्रथम आलेल्या इतर मागास प्रवर्ग व विमुक्त जाती, भटक्या जमाती प्रवर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनींना स्व. वसंतराव नाईक गुणवत्ता पुरस्काराने सन्मानित केले जाते. या पुरस्कार योजनेत वाशिम जिल्ह्यातील एकही विद्यार्थी नाही, याची थोडीफार खंत आहे. मात्र, अमरावती विभागातील आठ विद्यार्थ्यांचा समावेश आहे, याचे समाधानही आहे.- तानाजी नरळेमाध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी